शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

गुंतवणुकदारांचा अर्थव्यवस्थेवरील विश्वास डगमगला; प्रियंका गांधींचा मोदी सरकारला टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 3:48 PM

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

ठळक मुद्देकाँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.'झगमगाट दाखवून आणि रोज पाच ट्रिलियन- पाच ट्रिलियन बोलून किंवा माध्यमांच्या हेडलाईन मॅनेज केल्याने आर्थिक सुधारणा होत नाहीत''भाजपा सरकार मात्र या सत्याचा स्वीकार करत नाही. आर्थिक महाशक्तीच्या दिशेने जात असताना मंदीचा गतिरोधक लागला आहे.'

नवी दिल्ली - काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. तसेच टेक्सासमधील ह्युस्टन येथे होणाऱ्या एका कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. मोदी यांच्या या कार्यक्रमावरून प्रियंका गांधी यांनी मोदींवर टीका केली आहे. परदेशात कार्यक्रम प्रायोजित करून गुंतवणुकदार येत नाही. गुंतवणुकदारांचा विश्वास डगमगला आहे असं प्रियंका यांनी म्हटलं आहे. 

'झगमगाट दाखवून आणि रोज पाच ट्रिलियन- पाच ट्रिलियन बोलून किंवा माध्यमांच्या हेडलाईन मॅनेज केल्याने आर्थिक सुधारणा होत नाहीत. परदेशात कार्यक्रम प्रायोजित करून गुंतवणुकदार येत नाही. गुंतवणुकदारांचा विश्वास डगमगला आहे' असं ट्वीट प्रियंका गांधी यांनी बुधवारी (18 सप्टेंबर) आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून केलं आहे. 

प्रियंका गांधी यांनी यासोबतच आणखी एक ट्वीट केलं आहे. यामध्ये 'भाजपा सरकार मात्र या सत्याचा स्वीकार करत नाही. आर्थिक महाशक्तीच्या दिशेने जात असताना मंदीचा गतिरोधक लागला आहे. यात सुधारणा न करता झगमगाट काही कामाचा नाही' असं म्हटलं आहे. तसेच यासोबतच मंदीकीमार हा हॅशटॅगही वापरला आहे. याआधीही काही दिवसांपूर्वी प्रियंका यांनी क्रिकेट मॅचचा व्हिडीओ पोस्ट करून मोदी सरकारवर हल्लाबोल केला होता. 

क्रिकेट मॅचमधील कॅचचा व्हिडिओ पोस्ट करुन मोदी सरकारवर टीका केली होती. 'क्रिकेट या खेळात जेव्हा कॅच पकडायचा असतो तेव्हा चेंडूवर नजर आणि खेळ खेळण्याची भावना मनात असणं गरजेचं आहे. कॅच सुटला म्हणून गुरुत्वाकर्षण, गणित आणि ओला-उबर अशी कारणं द्यायची नसतात' असं म्हणत प्रियंका गांधी यांनी एक व्हिडीओ आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केला होता. यासोबतच भारतीय अर्थव्यवस्थेसाठी जनहितार्थ जारी असं देखील त्यांनी म्हटलं होतं. 

प्रियंका गांधी यांनी याआधीही मोदी सरकारच्या वाईट कामगिरीमुळे देशात आर्थिक मंदी आली आहे अशी टीका केली होती. तसेच ऐतिहासिक स्वरुपाची मंदी आल्याचे सरकारने कबुल करावे असेही त्यांनी म्हटले होते. देशात मंदी आल्याचे व तिचा सामना करण्यासाठी सरकार उपाययोजना करत असल्याचे प्रत्येक जण पाहतो आहे. मात्र तरीही मोदी सरकार खरी वस्तुस्थिती सांगण्यास तयार नाही. प्रसारमाध्यमांद्वारे खोटे चित्र रंगवून सरकारला सत्य फार काळ झाकता येणार नाही. शेकडो वेळा खोटे बोलले की ती गोष्ट कालांतराने लोकांना खरी वाटायला लागते असे प्रत्येक वेळेस होत नाही. जून महिन्याअखेर संपलेल्या तिमाहीत देशाचा जीडीपी विकासदर 5 टक्क्यांपर्यंत खाली घसरला. या दरात गेल्या सहा वर्षांत इतकी घसरण कधीही झाली नव्हती. देशामधील वाहननिर्मिती क्षेत्राला मंदीचा मोठा फटका बसला असल्याचं प्रियंका गांधी यांनी म्हटलं होतं.  

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीEconomyअर्थव्यवस्थाBJPभाजपाcongressकाँग्रेस