शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Assam floods: आसाममध्ये महापूर! २१ लाखांहून अधिक लोकांना बसला मोठा फटका, ६२ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2024 14:01 IST

Assam floods: पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. परिस्थिती सतत बिघडत असताना गुरुवारी आणखी सहा जणांचा मृत्यू झाला. राज्यातील २९ जिल्ह्यांतील २१ लाखांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे.

आसाममध्ये मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. परिस्थिती सतत बिघडत असताना गुरुवारी आणखी सहा जणांचा मृत्यू झाला. राज्यातील २९ जिल्ह्यांतील २१ लाखांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे. अधिकृत बुलेटिनमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. बुलेटिननुसार, राज्यातील प्रमुख नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत. 

आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (ASDMA) च्या रिपोर्टनुसार, जीव गमावलेल्या सहा लोकांपैकी चार गोलाघाटचे रहिवासी होते तर दिब्रुगड आणि चराईदेवमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. रिपोर्टनुसार, यावर्षी पूर, भूस्खलन आणि वादळामुळे मृतांची संख्या ६२ वर पोहोचली आहे. २९ जिल्ह्यांतील एकूण २११३२०४ लोकांना पुराचा फटका बसला आहे, तर ५७०१८ हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेली आहे. 

रिपोर्टनुसार, सर्वाधिक प्रभावित जिल्ह्यांमध्ये धुबरीचा समावेश आहे, जिथे ६४८८०६ लोक प्रभावित झाले आहेत. तर दरांगमध्ये १९०२६१, कछारमध्ये १४५९२६, बारपेटा येथे १३१०४१ आणि गोलाघाटमध्ये १०८५९४ लोकांना पुराचा फटका बसला आहे. सध्या ३९,३३८ बाधित लोक ६९८ मदत छावण्यांमध्ये आश्रय घेत आहेत. बुलेटिननुसार, विविध एजन्सींनी बोटींचा वापर करून एक हजारांहून अधिक लोक आणि ६३५ प्राण्यांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे.

कामरूप (महानगर) जिल्ह्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे, जेथे ब्रह्मपुत्र, दिगारू आणि कोलोंग नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत. काझीरंगामध्ये आतापर्यंत ३१ प्राण्यांचा बुडून मृत्यू झाला असून ८२ जणांना पुराच्या पाण्यातून वाचवण्यात यश आलं आहे. एका अधिकाऱ्याने गुरुवारी ही माहिती दिली. 

अधिकाऱ्याने सांगितले की, २३ हरणांचा बुडून मृत्यू झाला तर १५ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. वन अधिकाऱ्यांनी इतर प्राण्यांसह ७३ हरीण, सांबर आणि एक स्कोप उल्लू यांची सुटका केली आहे. सध्या २० जनावरांवर उपचार सुरू आहेत तर ३१ इतर प्राण्यांना उपचारानंतर सोडण्यात आलं आहे असं अधिकाऱ्याने सांगितलं आहे.  

टॅग्स :Assamआसामfloodपूर