शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
3
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
4
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
5
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
6
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
7
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
8
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
9
"त्याला उचकी आली आणि...", 'अशी ही बनवा बनवी'मधील शंतनूचं असं झालं निधन, पत्नीचा खुलासा
10
Prithvi Shaw: सपना गिल विनयभंग प्रकरणात न्यायालयाने पृथ्वी शॉला ठोठावला १०० रुपयांचा दंड!
11
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
12
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
13
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
14
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
15
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
16
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
17
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
18
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
19
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
20
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर

Assam floods: आसाममध्ये महापूर! २१ लाखांहून अधिक लोकांना बसला मोठा फटका, ६२ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2024 14:01 IST

Assam floods: पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. परिस्थिती सतत बिघडत असताना गुरुवारी आणखी सहा जणांचा मृत्यू झाला. राज्यातील २९ जिल्ह्यांतील २१ लाखांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे.

आसाममध्ये मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. परिस्थिती सतत बिघडत असताना गुरुवारी आणखी सहा जणांचा मृत्यू झाला. राज्यातील २९ जिल्ह्यांतील २१ लाखांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे. अधिकृत बुलेटिनमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. बुलेटिननुसार, राज्यातील प्रमुख नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत. 

आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (ASDMA) च्या रिपोर्टनुसार, जीव गमावलेल्या सहा लोकांपैकी चार गोलाघाटचे रहिवासी होते तर दिब्रुगड आणि चराईदेवमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. रिपोर्टनुसार, यावर्षी पूर, भूस्खलन आणि वादळामुळे मृतांची संख्या ६२ वर पोहोचली आहे. २९ जिल्ह्यांतील एकूण २११३२०४ लोकांना पुराचा फटका बसला आहे, तर ५७०१८ हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेली आहे. 

रिपोर्टनुसार, सर्वाधिक प्रभावित जिल्ह्यांमध्ये धुबरीचा समावेश आहे, जिथे ६४८८०६ लोक प्रभावित झाले आहेत. तर दरांगमध्ये १९०२६१, कछारमध्ये १४५९२६, बारपेटा येथे १३१०४१ आणि गोलाघाटमध्ये १०८५९४ लोकांना पुराचा फटका बसला आहे. सध्या ३९,३३८ बाधित लोक ६९८ मदत छावण्यांमध्ये आश्रय घेत आहेत. बुलेटिननुसार, विविध एजन्सींनी बोटींचा वापर करून एक हजारांहून अधिक लोक आणि ६३५ प्राण्यांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे.

कामरूप (महानगर) जिल्ह्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे, जेथे ब्रह्मपुत्र, दिगारू आणि कोलोंग नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत. काझीरंगामध्ये आतापर्यंत ३१ प्राण्यांचा बुडून मृत्यू झाला असून ८२ जणांना पुराच्या पाण्यातून वाचवण्यात यश आलं आहे. एका अधिकाऱ्याने गुरुवारी ही माहिती दिली. 

अधिकाऱ्याने सांगितले की, २३ हरणांचा बुडून मृत्यू झाला तर १५ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. वन अधिकाऱ्यांनी इतर प्राण्यांसह ७३ हरीण, सांबर आणि एक स्कोप उल्लू यांची सुटका केली आहे. सध्या २० जनावरांवर उपचार सुरू आहेत तर ३१ इतर प्राण्यांना उपचारानंतर सोडण्यात आलं आहे असं अधिकाऱ्याने सांगितलं आहे.  

टॅग्स :Assamआसामfloodपूर