शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

Assam floods: आसाममध्ये महापूर! २१ लाखांहून अधिक लोकांना बसला मोठा फटका, ६२ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2024 14:01 IST

Assam floods: पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. परिस्थिती सतत बिघडत असताना गुरुवारी आणखी सहा जणांचा मृत्यू झाला. राज्यातील २९ जिल्ह्यांतील २१ लाखांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे.

आसाममध्ये मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. परिस्थिती सतत बिघडत असताना गुरुवारी आणखी सहा जणांचा मृत्यू झाला. राज्यातील २९ जिल्ह्यांतील २१ लाखांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे. अधिकृत बुलेटिनमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. बुलेटिननुसार, राज्यातील प्रमुख नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत. 

आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (ASDMA) च्या रिपोर्टनुसार, जीव गमावलेल्या सहा लोकांपैकी चार गोलाघाटचे रहिवासी होते तर दिब्रुगड आणि चराईदेवमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. रिपोर्टनुसार, यावर्षी पूर, भूस्खलन आणि वादळामुळे मृतांची संख्या ६२ वर पोहोचली आहे. २९ जिल्ह्यांतील एकूण २११३२०४ लोकांना पुराचा फटका बसला आहे, तर ५७०१८ हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेली आहे. 

रिपोर्टनुसार, सर्वाधिक प्रभावित जिल्ह्यांमध्ये धुबरीचा समावेश आहे, जिथे ६४८८०६ लोक प्रभावित झाले आहेत. तर दरांगमध्ये १९०२६१, कछारमध्ये १४५९२६, बारपेटा येथे १३१०४१ आणि गोलाघाटमध्ये १०८५९४ लोकांना पुराचा फटका बसला आहे. सध्या ३९,३३८ बाधित लोक ६९८ मदत छावण्यांमध्ये आश्रय घेत आहेत. बुलेटिननुसार, विविध एजन्सींनी बोटींचा वापर करून एक हजारांहून अधिक लोक आणि ६३५ प्राण्यांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे.

कामरूप (महानगर) जिल्ह्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे, जेथे ब्रह्मपुत्र, दिगारू आणि कोलोंग नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत. काझीरंगामध्ये आतापर्यंत ३१ प्राण्यांचा बुडून मृत्यू झाला असून ८२ जणांना पुराच्या पाण्यातून वाचवण्यात यश आलं आहे. एका अधिकाऱ्याने गुरुवारी ही माहिती दिली. 

अधिकाऱ्याने सांगितले की, २३ हरणांचा बुडून मृत्यू झाला तर १५ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. वन अधिकाऱ्यांनी इतर प्राण्यांसह ७३ हरीण, सांबर आणि एक स्कोप उल्लू यांची सुटका केली आहे. सध्या २० जनावरांवर उपचार सुरू आहेत तर ३१ इतर प्राण्यांना उपचारानंतर सोडण्यात आलं आहे असं अधिकाऱ्याने सांगितलं आहे.  

टॅग्स :Assamआसामfloodपूर