शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

आधी राम मंदिराचे निमंत्रण नाकारले, आता दिला खुलासा; खरगे म्हणाले, 'कोणाला दुखावण्याचा हेतू नव्हता'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2024 08:40 IST

राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला काँग्रेसमधील प्रमुख नेत्यांना निमंत्रण देण्यात आले आहे.

२२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार असून या सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. या सोहळ्याचे देशातील अनेक दिग्गजांना मिळाले आहे. काँग्रेस पक्षातील प्रमुख नेत्यांनाही निमंत्रण मिळाले आहे. दरम्यान, दोन दिवसापूर्वी काँग्रेसने सोहळ्याचे निमंत्रण नाकारले. यावरुन आता आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, पक्षातही एका गटात नाराजी असल्याचे दिसत आहे. याबाबत आता काँग्रेस पक्ष स्पष्टीकरण देत आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शुक्रवारी सांगितले की, हा निर्णय आणि त्यामागे कोणाच्याही भावना किंवा धर्माला दुखावण्याचा हेतू नाही. 

अयोध्येतील राम मंदिरातील रामलला यांच्या प्रतिमेच्या अभिषेक कार्यक्रमाला पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि लोकसभेतील पक्षनेते अधीर रंजन चौधरी उपस्थित राहणार नाहीत, कारण  भाजप आणि आरएसएसने या सोहळ्याचे आयोजन केले आहे. यामुळे उपस्थित राहणार नसल्याचे काँग्रेसने बुधवारी स्पष्ट केले. निवडणुकीच्या फायद्यासाठी 'अर्ध-निर्मित मंदिरा'चे उद्घाटन केले जात आहे, असा आरोपही केला होता. तेव्हापासून भाजप सातत्याने काँग्रेसवर हल्लाबोल करत आहे.

अयोध्येतील मंदिराची उभारणी विनासंकट व्हावी, म्हणून वर्षभरापासून रामनिवास मंदिरात होतोय यज्ञ

शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना काँग्रेस अध्यक्ष खरगे म्हणाले, "आम्ही आधीच सांगितले आहे की, जर कोणाला अयोध्येला जायचे असेल त्यांना हवे तेव्हा जायचे आहे" मात्र, भाजप कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याच्या आमच्या निर्णयावरून सातत्याने आमच्यावर निशाणा साधला जात आहे. हे अन्यायकारक आहे. आमच्या निर्णयाचा हेतू कोणत्याही व्यक्ती किंवा धर्माच्या भावना दुखावण्याचा नव्हता."

खरगे म्हणाले, "आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारू इच्छितो की, त्यांनी महागाई आणि बेरोजगारी रोखण्यासाठी कोणती पावले उचलली आहेत? त्यांनी आमच्या सीमा सुरक्षित करण्यासाठी उचललेल्या पावलांची यादी करावी अशी आमची इच्छा आहे. या अशा समस्या आहेत ज्यांचा थेट परिणाम देशावर होतो. लोक काँग्रेस 'भाजपच्या षडयंत्रात' पडणार नाही आणि बेरोजगारीचा मुद्दा उचलून धरणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे निमंत्रण वैयक्तिक असून त्याबाबत बोलणार असल्याचे खरगे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते म्हणाले, "ज्यांची श्रद्धा आहे ते आज, उद्या किंवा परवा त्यांना वाटेल तेव्हा अयोध्येला जाऊ शकतात." मी हे आधीच स्पष्ट केले आहे. हे भाजपचे षड्यंत्र आहे आणि ते या मुद्द्यावर वारंवार टीका करत आहेत.' त्यांच्या पक्षाने कधीही कोणत्याही धर्माला किंवा धार्मिक नेत्याला दुखावले नाही, असंही खरगे म्हणाले.

अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहण्याचे काँग्रेसच्या तीन प्रमुख नेत्यांना पाठवलेले निमंत्रण नाकारण्याच्या विरोधी पक्षाच्या निर्णयावर भाजपने गुरुवारी टीका केली असून, यामुळे भारताची संस्कृती आणि हिंदू धर्म नष्ट होईल, असा दावा करत प्रत्येक पक्षाचा स्वाभाविक विरोध उघड झाला आहे.

खरगे, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि लोकसभेतील पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांनी प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण 'आदरपूर्वक नाकारले' आणि हा कार्यक्रम भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आयोजित केला असल्याचा आरोप केला होता. 

टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेcongressकाँग्रेसRam Mandirराम मंदिरBJPभाजपा