शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

आधी राम मंदिराचे निमंत्रण नाकारले, आता दिला खुलासा; खरगे म्हणाले, 'कोणाला दुखावण्याचा हेतू नव्हता'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2024 08:40 IST

राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला काँग्रेसमधील प्रमुख नेत्यांना निमंत्रण देण्यात आले आहे.

२२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार असून या सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. या सोहळ्याचे देशातील अनेक दिग्गजांना मिळाले आहे. काँग्रेस पक्षातील प्रमुख नेत्यांनाही निमंत्रण मिळाले आहे. दरम्यान, दोन दिवसापूर्वी काँग्रेसने सोहळ्याचे निमंत्रण नाकारले. यावरुन आता आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, पक्षातही एका गटात नाराजी असल्याचे दिसत आहे. याबाबत आता काँग्रेस पक्ष स्पष्टीकरण देत आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शुक्रवारी सांगितले की, हा निर्णय आणि त्यामागे कोणाच्याही भावना किंवा धर्माला दुखावण्याचा हेतू नाही. 

अयोध्येतील राम मंदिरातील रामलला यांच्या प्रतिमेच्या अभिषेक कार्यक्रमाला पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि लोकसभेतील पक्षनेते अधीर रंजन चौधरी उपस्थित राहणार नाहीत, कारण  भाजप आणि आरएसएसने या सोहळ्याचे आयोजन केले आहे. यामुळे उपस्थित राहणार नसल्याचे काँग्रेसने बुधवारी स्पष्ट केले. निवडणुकीच्या फायद्यासाठी 'अर्ध-निर्मित मंदिरा'चे उद्घाटन केले जात आहे, असा आरोपही केला होता. तेव्हापासून भाजप सातत्याने काँग्रेसवर हल्लाबोल करत आहे.

अयोध्येतील मंदिराची उभारणी विनासंकट व्हावी, म्हणून वर्षभरापासून रामनिवास मंदिरात होतोय यज्ञ

शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना काँग्रेस अध्यक्ष खरगे म्हणाले, "आम्ही आधीच सांगितले आहे की, जर कोणाला अयोध्येला जायचे असेल त्यांना हवे तेव्हा जायचे आहे" मात्र, भाजप कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याच्या आमच्या निर्णयावरून सातत्याने आमच्यावर निशाणा साधला जात आहे. हे अन्यायकारक आहे. आमच्या निर्णयाचा हेतू कोणत्याही व्यक्ती किंवा धर्माच्या भावना दुखावण्याचा नव्हता."

खरगे म्हणाले, "आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारू इच्छितो की, त्यांनी महागाई आणि बेरोजगारी रोखण्यासाठी कोणती पावले उचलली आहेत? त्यांनी आमच्या सीमा सुरक्षित करण्यासाठी उचललेल्या पावलांची यादी करावी अशी आमची इच्छा आहे. या अशा समस्या आहेत ज्यांचा थेट परिणाम देशावर होतो. लोक काँग्रेस 'भाजपच्या षडयंत्रात' पडणार नाही आणि बेरोजगारीचा मुद्दा उचलून धरणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे निमंत्रण वैयक्तिक असून त्याबाबत बोलणार असल्याचे खरगे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते म्हणाले, "ज्यांची श्रद्धा आहे ते आज, उद्या किंवा परवा त्यांना वाटेल तेव्हा अयोध्येला जाऊ शकतात." मी हे आधीच स्पष्ट केले आहे. हे भाजपचे षड्यंत्र आहे आणि ते या मुद्द्यावर वारंवार टीका करत आहेत.' त्यांच्या पक्षाने कधीही कोणत्याही धर्माला किंवा धार्मिक नेत्याला दुखावले नाही, असंही खरगे म्हणाले.

अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहण्याचे काँग्रेसच्या तीन प्रमुख नेत्यांना पाठवलेले निमंत्रण नाकारण्याच्या विरोधी पक्षाच्या निर्णयावर भाजपने गुरुवारी टीका केली असून, यामुळे भारताची संस्कृती आणि हिंदू धर्म नष्ट होईल, असा दावा करत प्रत्येक पक्षाचा स्वाभाविक विरोध उघड झाला आहे.

खरगे, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि लोकसभेतील पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांनी प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण 'आदरपूर्वक नाकारले' आणि हा कार्यक्रम भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आयोजित केला असल्याचा आरोप केला होता. 

टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेcongressकाँग्रेसRam Mandirराम मंदिरBJPभाजपा