शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 20:54 IST

Assam Rifles Truck Attacked In Manipur: इम्फाळहून बिष्णुपूरला जात असताना आसाम रायफल्सच्या ताफ्यावर अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला.

Assam Rifles Truck Attacked In Manipur: काही दिवसांपूर्वीच मणिपूरच्या दोन्ही गटांमध्ये सामंजस्य करण्यात, तणाव मिटविण्यात यश आले होते. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मणिपूर दौरा ठरविण्यात आला होता. अलीकडेच पंतप्रधान मोदी मणिपूरला जाऊन आले. त्यांची पाठ फिरत नाही तोच पुन्हा एकदा हिंसाचार उसळल्याचे पाहायला मिळाले. ही घटना ताजी असतानाच मणिपूरमध्ये आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात आसाम रायफल्स तुकडीतील दोन जवानांना हौतात्म्य आले असून, अनेक जण जखमी झाले आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी मणिपूरच्या बिष्णुपूर जिल्ह्यात अज्ञात हल्लेखोरांनी सुरक्षा दलांवर हल्ला केला. यात दोन जवानांना हौतात्म्य आले आणि अनेक जण जखमी झाले. सायंकाळी ५.५० च्या सुमारास, नंबोल सबल भागाजवळ आसाम रायफल्सच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या टाटा ४०७ वाहनावर अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला. हा ताफा इम्फाळहून बिष्णुपूरला जात होता.

आसाम रायफल्स आणि स्थानिक पोलिकांची संयुक्त शोधमोहीम

जखमींना तत्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेवर बोलताना संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की, या घटनेनंतर परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी फॉरेन्सिक तपासणी केली असून, गस्त वाढवण्यात आली आहे. तसेच स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला अचानक झाला. अज्ञात बंदूकधाऱ्यांनी ताफ्यावर जोरदार गोळीबार केला. हल्लेखोरांची अद्याप ओळख पटलेली नाही. त्यांचा शोध सुरू आहे. या घटनेनंतर, आसाम रायफल्स आणि स्थानिक पोलिसांनी परिसरात संयुक्त शोध मोहीम सुरू केली आहे.

दरम्यान, हा हल्ला पूर्वनियोजित कटाचा भाग असावा, असा कयास सुरक्षा यंत्रणांचा आहे. तसेच ताफ्याच्या मार्गावर काही सुरक्षा त्रुटी होत्या का, याचाही तपास केला जात आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परिसरात सुरक्षा वाढवण्याचे आदेश दिले आहेत. जखमींना त्वरित आणि प्रभावी वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी आरोग्य विभागालाही सतर्क करण्यात आले आहे. मणिपूरचे माजी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी एक्सवर पोस्ट करून या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.

 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारIndian Armyभारतीय जवानAssamआसामHome Ministryगृह मंत्रालय