शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
4
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
5
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
6
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
7
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
8
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
9
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
10
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
11
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
12
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
13
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
14
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
15
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
16
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
17
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
18
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
19
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
20
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."

तणाव आणखी वाढणार! आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांच्याविरोधात मिझोरममध्ये FIR

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2021 09:43 IST

आसाम आणि मिझोरम दोन्ही राज्यांमध्ये तणावाचे वातावरण असून, आता त्यात भर पडण्याची शक्यता आहे.

गुवाहाटी: गेल्या अनेक दिवसांपासून आसाम आणि मिझोरमच्या सीमेवर संघर्ष सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे दोन्ही राज्यांमध्ये तणावाचे वातावरण असून, आता त्यात भर पडण्याची शक्यता आहे. कारण आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांच्याविरोधात मिझोरममध्ये FIR दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. याआधी दोन्ही राज्यांच्या पोलिसांनी एकमेकांविरोधात समन्स बजावल्याचे समजते. (fir registered against assam cm himanta biswa sarma in mizoram over border clash)

२६ जुलै रोजी आसाम आणि मिझोराम सीमेवर दोन्ही राज्यांचे पोलीस आणि सुरक्षादल एकमेकांसमोर येऊन झालेल्या गोळीबार आणि झटापटीत काही पोलिसांचा मृत्यू झाला होता. यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांनाही सुरुवात झाली. यावरून मिझोरम पोलिसांनी आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांच्याविरोधात FIR दाखल केला असून, झटापट, हत्येचा प्रयत्न, गुन्हेगारी कट कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची सांगितले जात आहे. याशिवाय २०० अज्ञात पोलिसांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आता TATA देणार मुकेश अंबानींना टक्कर; ‘या’ कंपन्यांसोबत करणार 5G क्रांती!

राहुल गांधींचे टीकास्त्र

इशान्येकडील आसाम आणि मिझोरम या दोन राज्यांत सीमावादावरून झालेल्या हिंसाचाराच्या घटनेवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. या घटनेत मृत्यू झालेल्या लोकांच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करतो. याचबरोबर जखमी लोक लवकरात लवकर बरे होतील यासाठी प्रार्थना करतो. या घटनेमुळे पुन्हा एकदा गृहमंत्र्यांचे अपयश समोर आले आहे. देशातील नागरिकांत द्वेष आणि अविश्वास निर्माण करण्याचे काम ते करत आहेत. यामुळे भारत आता खराब परिस्थितीचा सामना करत आहे, असे राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हणत एक व्हिडिओही शेअर केला आहे.

दरम्यान, आसाम-मिझोरामच्या सीमेवर आपल्या सीमेचे रक्षण करत असताना आसाम पोलीस दलाचे ६ शूर पोलीस शहीद झाले आहेत, हे सांगताना मला अतिशय दु:ख होतंय. माझ्या सहवेदना त्यांच्या संतप्त कुटुंबियांच्या सोबत आहेत, असे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी ट्विटमध्ये म्हटले. आसाम-मिझोरामच्या सीमेवर झालेल्या हिंसाचारासाठी दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एकमेकांच्या पोलिसांना जबाबदार धरलेय. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसAssamआसामmizoram-pcमिजोरमPoliticsराजकारण