शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

अनुराग कश्यप-तापसी पन्नूच्या ठिकाणांवर IT चे छापे, निर्मला सीतारमण यांनी अशी दिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2021 17:57 IST

आयकर विभागाने बुधवारी टॅक्स चोरीप्रकरणात निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नूसह अनेक बॉलीवुड कलाकारांच्या घरावर छापे टाकले. यादरम्यान अनुराग कश्यप आणि तापसी यांची पुण्यात चौकशीही झाली होती.

ठळक मुद्देबॉलिवुड दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू यांच्या ठिकाणांवर आयकर विभागाने केलेल्या कारवाईवरून देशभरात राजकारण सुरू आहे.अनुराग कश्यप आणि तापसी यांची पुण्यात चौकशीही झाली होती.आयकर विभागाच्या माहितीनुसार दोन मोठ्या फिल्म प्रोडक्शन, अभिनेत्री तापसी पन्नू आणि दोन व्यवस्थापन कंपन्यांवर छापे टाकण्यात आले आहेत.

नवी दिल्ली - बॉलिवुड दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू यांच्या ठिकाणांवर आयकर विभागाने केलेल्या कारवाईवरून देशभरात राजकारण सुरू आहे. काही लोक ही कारवाई योग्य असल्याचे म्हणत आहेत, तर काहींनी ही कारवाई चुकीची असल्याचे म्हटले आहे. यासंदर्भात जेव्हा अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala sitharaman) यांना विचारण्यात आले, तेव्हा त्या म्हणाल्या, आमचे सरकार असताना जेव्हा अशा प्रकारची कारवाई होते, तेव्हा त्यावर प्रश्न उपस्थित केले जाते. मात्र, 2013 मध्ये जेव्हा कलाकार मंडळींवर कारवाई झाली, तेव्हा कुणीही प्रश्न उपस्थित केला नव्हता. (Finance minister Nirmala sitharaman says about it action against anurag kashyap taapsee pannu)

तापसी-अनुरागनंतर तपासाची व्याप्ती आणखी वाढली, रिलायन्स एंटरटेनमेन्टसह 4 कंपन्यांवर ITच्या धाडी

निर्मला सीतारमण म्हणाल्या, ''मी कुठल्याही प्रकरणाचा उल्लेख करणार नाही आणि कुणाचे नावही घेणार नाही. मात्र, आमच्या सरकारच्या काळात अशा प्रकारची कारवाई होते, तेव्हा प्रश्न उपस्थित होतात. मात्र, 2013 मध्ये या लोकांवर कारवाई झाली होती. तेव्हा कुणीही कुठल्याही प्रकारचा प्रश्न उपस्थित केला नाही.''

सीतारण म्हणाल्या, ''हे दुटप्पी धोरण नाही? जे होत आहे, ते बरोबर आहे, की चूक याचा विचार आपण मुळापर्यंत जाऊन करायला नको? की, आमच्या सरकारने छापेमारी केली आहे. त्यामुळे फक्त प्रश्नच उपस्थित करायचे?''

बुधवारी झाली होती छापेमारी -आयकर विभागाने बुधवारी टॅक्स चोरीप्रकरणात निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नूसह अनेक बॉलीवुड कलाकारांच्या घरावर छापे टाकले. यादरम्यान अनुराग कश्यप आणि तापसी यांची पुण्यात चौकशीही झाली होती.

"…त्याचीच किंमत तापसी आणि अनुरागला चुकवावी लागतेय", सामनातून मोदी सरकारवर निशाणा

याप्रकरणावरून राजकारणही सुरू झाले आहे, या कारवाईवरून काँग्रेस आणि एनसीपीने केंद्र सरकारवर बदला घेत असल्याचा आरोप केला. तर आयकर विभागाने कायद्याच्या चौकटीतच कारवाई केली असल्याचे सरकारने म्हटले आहे.

350 कोटी रुपयांच्या कर चोरीची शंका -आयकर विभागाच्या माहितीनुसार दोन मोठ्या फिल्म प्रोडक्शन, अभिनेत्री तापसी पन्नू आणि दोन व्यवस्थापन कंपन्यांवर छापे टाकण्यात आले आहेत. छापेमारीत मुंबई, पुणे, दिल्ली, हैदराबाद येथील घर आणि कार्यालयांचा समावेश होता. एकूण मिळून तब्बल 28 ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. यात मिळकत (income) आणि शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर अफरातफर झाल्याचे पुरावे आयकर विभागाच्या हाती लागले आहेत. आयकर विभागाला या प्रकरणात एकूण मिळून 350 कोटी रुपयांच्या कर चोरीची शंका आहे. 

बापरे! ३५० कोटींची अफरातफर; तापसी पन्नू आणि अनुराग कश्यप प्रकरणात मोठे पुरावे हाती!असं आहे प्रकरण -2011 मध्ये अनुराग कश्यप, मधू मनटेना, विक्रमादित्य मोटवाने आणि विकास बहल यांनी फॅम्टम फिल्म्सची स्थापना केली होती. मात्र, ऑक्टोबर 2018 मध्ये ही कंपनी बंद करण्यात आली होती. सूत्रांचे म्हणणे आहे, की कपंनी आणि यांच्यावतीने फाईल केलेले रिटर्न जुळत नाहीत. हा थेट टॅक्सचोरीचाच संकेत आहे. 

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनnirmala sitharamanनिर्मला सीतारामनTaapsee Pannuतापसी पन्नूAnurag Kashyapअनुराग कश्यप