शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

‘भूसंपादन’विरुद्ध लढा

By admin | Updated: April 19, 2015 01:20 IST

राहुल गांधी यांनी शनिवारी भूसंपादन विधेयकाला आम्ही सर्व शक्तिनिशी विरोध करू आणि हे विधेयक मागे घेण्याची आपली मागणी मान्य करून घेण्यास सरकारला बाध्य केले जाईल, अशी ग्वाही दिली.

नवी दिल्ली : दोन महिन्यांची आत्मचिंतन रजा आटोपून परतल्यानंतर प्रथमच लोकांना सामोरे जाणारे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी भूसंपादन विधेयकाला आम्ही सर्व शक्तिनिशी विरोध करू आणि हे विधेयक मागे घेण्याची आपली मागणी मान्य करून घेण्यास सरकारला बाध्य केले जाईल, अशी ग्वाही दिली.राहुल गांधी यांनी किसान रॅलीच्या पूर्वसंध्येला आपल्या निवासस्थानी विविध राज्यांतून आलेले शेतकरी आणि त्यांच्या प्रतिनिधींसोबत दोन सत्रांमध्ये चर्चा केली. विविध मुद्यांवर हितगूज केले आणि शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. आपला पक्ष केंद्रातील भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (रालोआ) भूसंपादन विधेयकासह शेतकऱ्यांच्या हिताशी संबंधित सर्व मुद्यांवर निर्णायक लढा देईल, असे वचन गांधी यांनी यावेळी दिल्याचे पक्ष नेत्यांनी सांगितले. ही लढाई केवळ एक दिवस, एक महिना अथवा एक वर्षात संपणार नाही. शेतकऱ्यांच्या मागण्यांपुढे सरकारला नांगी टाकावी लागेल आणि तोपर्यंत हा लढा सुरूच राहील. चर्चेला उपस्थित शेतकरी नेत्यांच्या सांगण्यानुसार, राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या भूसंपादन कायद्याबद्दल त्यांचे विचार जाणून घेतले. याशिवाय अवकाळी पाऊस आणि गारपिटीने पिकांचे किती नुकसान झाले आणि सरकारने त्यांच्या उत्पादनांना काय किंमत दिली याबाबतही विचारणा केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)उद्ध्वस्त पीक दाखविलेबैठकीनंतर राहुल गांधी यांनी बाहेर मोठ्या संख्येने प्रतीक्षा करीत असलेल्या शेतकऱ्यांची भेट घेतली आणि तब्बल ४० मिनिटे त्यांच्याशी हितगूज केले. यावेळी काही शेतकऱ्यांनी त्यांना अवकाळी आणि गारपिटीमुळे उद्ध्वस्त झालेल्या पिकाचा नमुना दाखविला. कडेकोट सुरक्षा बंदोबस्तातही काही वयोवृद्ध शेतकरी राहुल यांना प्रेमाने जवळ घेत आशीर्वाद देत होते. ..आणि शेतकऱ्यांमध्ये मिसळले राहुलच्चर्चासत्रासाठी आलेल्या शेतकऱ्यांमध्ये राहुल गांधी मिसळले. त्यांनी आपलेपणाने शेतकऱ्यांशी हितगुज केले. चर्चासत्रादरम्यान हरियाणाच्या भिवानी येथून आलेल्या काही वयोवृद्ध शेतकऱ्यांनी गांधींना त्यांचे लक्ष आपल्याकडे वेधण्याकरिता ‘चौधरी राहुलजी’असे संबोधित केले.च्रविवारी होणाऱ्या किसान रॅलीत या मुद्यावर सविस्तर बोलण्याचा निर्णय राहुल गांधी यांनी घेतला आहे. च्राहुल गांधी लोकसभेतही हा मुद्दा उपस्थित करू शकतात. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सोमवारपासून सुरू होत आहे. च्‘काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासमक्ष शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांचा प्रतिध्वनी रविवारी रामलीला मैदानावर ऐकायला मिळेल. सोमवारपासून संसदेचे सत्र सुरू होत आहे. च्भूसंपादन, पिकांचे नुकसान आदी शेतकऱ्यांचे मुद्दे संसदेत आणि संसदेबाहेरही उपस्थित केले जातील. असे काँग्रेसचे सरचिटणीस शकील अहमद यांनी सांगितले.च्येथे मोठ्या संख्येत उपस्थित असलेल्या माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत मात्र गांधी बोलले नाही.