शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
2
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
3
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
4
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
5
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
6
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
7
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
8
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
9
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
10
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
11
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
12
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
13
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
14
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
15
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
16
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान
17
भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?
18
Sanjay Singh : “पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”
19
'आम्ही तुमच्यासोबत आहोत', ऑपरेशन सिंदूरनंतर सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांचा सरकारला पाठिंबा

‘भूसंपादन’विरुद्ध लढा

By admin | Updated: April 19, 2015 01:20 IST

राहुल गांधी यांनी शनिवारी भूसंपादन विधेयकाला आम्ही सर्व शक्तिनिशी विरोध करू आणि हे विधेयक मागे घेण्याची आपली मागणी मान्य करून घेण्यास सरकारला बाध्य केले जाईल, अशी ग्वाही दिली.

नवी दिल्ली : दोन महिन्यांची आत्मचिंतन रजा आटोपून परतल्यानंतर प्रथमच लोकांना सामोरे जाणारे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी भूसंपादन विधेयकाला आम्ही सर्व शक्तिनिशी विरोध करू आणि हे विधेयक मागे घेण्याची आपली मागणी मान्य करून घेण्यास सरकारला बाध्य केले जाईल, अशी ग्वाही दिली.राहुल गांधी यांनी किसान रॅलीच्या पूर्वसंध्येला आपल्या निवासस्थानी विविध राज्यांतून आलेले शेतकरी आणि त्यांच्या प्रतिनिधींसोबत दोन सत्रांमध्ये चर्चा केली. विविध मुद्यांवर हितगूज केले आणि शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. आपला पक्ष केंद्रातील भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (रालोआ) भूसंपादन विधेयकासह शेतकऱ्यांच्या हिताशी संबंधित सर्व मुद्यांवर निर्णायक लढा देईल, असे वचन गांधी यांनी यावेळी दिल्याचे पक्ष नेत्यांनी सांगितले. ही लढाई केवळ एक दिवस, एक महिना अथवा एक वर्षात संपणार नाही. शेतकऱ्यांच्या मागण्यांपुढे सरकारला नांगी टाकावी लागेल आणि तोपर्यंत हा लढा सुरूच राहील. चर्चेला उपस्थित शेतकरी नेत्यांच्या सांगण्यानुसार, राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या भूसंपादन कायद्याबद्दल त्यांचे विचार जाणून घेतले. याशिवाय अवकाळी पाऊस आणि गारपिटीने पिकांचे किती नुकसान झाले आणि सरकारने त्यांच्या उत्पादनांना काय किंमत दिली याबाबतही विचारणा केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)उद्ध्वस्त पीक दाखविलेबैठकीनंतर राहुल गांधी यांनी बाहेर मोठ्या संख्येने प्रतीक्षा करीत असलेल्या शेतकऱ्यांची भेट घेतली आणि तब्बल ४० मिनिटे त्यांच्याशी हितगूज केले. यावेळी काही शेतकऱ्यांनी त्यांना अवकाळी आणि गारपिटीमुळे उद्ध्वस्त झालेल्या पिकाचा नमुना दाखविला. कडेकोट सुरक्षा बंदोबस्तातही काही वयोवृद्ध शेतकरी राहुल यांना प्रेमाने जवळ घेत आशीर्वाद देत होते. ..आणि शेतकऱ्यांमध्ये मिसळले राहुलच्चर्चासत्रासाठी आलेल्या शेतकऱ्यांमध्ये राहुल गांधी मिसळले. त्यांनी आपलेपणाने शेतकऱ्यांशी हितगुज केले. चर्चासत्रादरम्यान हरियाणाच्या भिवानी येथून आलेल्या काही वयोवृद्ध शेतकऱ्यांनी गांधींना त्यांचे लक्ष आपल्याकडे वेधण्याकरिता ‘चौधरी राहुलजी’असे संबोधित केले.च्रविवारी होणाऱ्या किसान रॅलीत या मुद्यावर सविस्तर बोलण्याचा निर्णय राहुल गांधी यांनी घेतला आहे. च्राहुल गांधी लोकसभेतही हा मुद्दा उपस्थित करू शकतात. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सोमवारपासून सुरू होत आहे. च्‘काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासमक्ष शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांचा प्रतिध्वनी रविवारी रामलीला मैदानावर ऐकायला मिळेल. सोमवारपासून संसदेचे सत्र सुरू होत आहे. च्भूसंपादन, पिकांचे नुकसान आदी शेतकऱ्यांचे मुद्दे संसदेत आणि संसदेबाहेरही उपस्थित केले जातील. असे काँग्रेसचे सरचिटणीस शकील अहमद यांनी सांगितले.च्येथे मोठ्या संख्येत उपस्थित असलेल्या माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत मात्र गांधी बोलले नाही.