शहरं
Join us  
Trending Stories
1
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
2
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
3
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
4
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
5
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
6
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
7
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
8
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
9
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
10
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
11
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
12
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
13
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
14
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
15
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
16
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
17
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
18
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
19
2026 Prediction: २०२६ मध्ये 'या' ५ राशींवर शनीची वक्रदृष्टी; आर्थिक, मानसिक चिंता वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 20:22 IST

Fatehpur Tomb News: उत्तर प्रदेशातील फतेहपूरमध्ये असलेल्या एका मकबऱ्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न झाला. हिंदू संघटनेशी संबंधित कार्यकर्त्यांनी मकबऱ्यावर भगवे झेंडे लावण्याचाही प्रयत्न केला. 

उत्तर प्रदेशातील फतेहपूरमध्ये एक घटना घडली. या घटनेने १९९२ मध्ये अयोध्येत झालेल्या बाबरी मशीद विध्वंसाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. फतेहपूरमध्ये एक मकबरा आहे. या मकबऱ्याच्या ठिकाणी मंदिर असल्याचा दावा करत काही हिंदू संघटनांचे कार्यकर्ते घुसले. त्यांनी मकबऱ्या भगवे झेंडे लावण्याचा प्रयत्न केला. पण, पोलिसांनी वेळीच त्यांना अडवल्याने तणावाला कारणीभूत होईल अशी घटना टळली. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

फतेहपूरच्या अबूनगर भागात हा मकबरा आहे. हा मकबरा आहे, नवाब अब्दुल समद यांचा. त्या जागी मंदिर असल्याचा दावा आता केला जात आहे. ११ ऑगस्ट रोजी या मकबऱ्यामध्ये घुसण्याचाही प्रयत्न झाला. या मकबऱ्याच्या चर्चेमुळे नवाब अब्दुल समद यांच्याबद्दलही चर्चा सुरू झाली. 

कोण होते नवाब अब्दुल समद?

मुस्लीम पक्षकारांनी सांगितलेल्या माहितीप्रमाणे, हा मकबरा ५०० वर्षे जुना आहे. हा मकबरा अकबराच्या नातवाने बांधला होता. स्थानिकांनी सांगितले की, या जागेची नोंद कागदोपत्री आहे. शासकीय दस्तऐवजांमध्ये मकबरा मांगी म्हणून जागेची नोंद आहे. 

या मकबऱ्यामध्ये अबू मोहम्मद आणि नवाब अब्दुल समद यांचे थडगे आहे. अब्दुल सम खान हे लाहौरमधील एक सुभेदार होते. मुगलाच्या सैन्यामध्ये त्यांचा आदर केला जायचा. १८ व्या शतकात ज्या प्रांतिक लढाया झाल्या, त्यात अब्दुल समद यांचीही भूमिका राहिलेली आहे. त्यांच्याच नावाने फतेहपूरमध्ये हा मकबरा बनवला गेला होता. इथेच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले गेले आहेत. 

वाद कसा वाढला?

८ ऑगस्ट रोजी हिंदू संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना अर्ज दिला. या अर्जामध्ये म्हटले होते की, फतेहपूरमध्ये अब्दुल समदचा मकबरा हा मूळ मकबरा नाहीये. ते एक शिवमंदिर आहे. कारण आतील भिंतींवर त्रिशुळ, बेलपत्र, कमळाचे फूल आणि शिवाचे प्रतिक बनवलेले आहे. 

११ ऑगस्ट रोजी या जागेची साफसफाई करून तिथेच जन्माष्टमी साजरी केली जाईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटलेले होते. त्यासाठी परवानगीही मागितली होती. पण, जिल्हाधिकाऱ्यांनी याला परवानगी नाकारली. असे काही केल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशाराही अधिकाऱ्यांनी दिला. 

हिंदू संघटनांनी दिलेल्या अर्जानंतर फतेहपूरमध्ये पोलीस आणि प्रशासन सतर्क झाले होते. त्यानंतर या मकबऱ्याच्या परिसरात बॅरिकेटिंग केले गेले. त्यानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष मुखलाल पाल यांनी मकबऱ्यामध्ये जाऊन पूजा आणि आरती करणारच अशी भूमिका घेतली आणि त्यामुळे तणाव वाढला. 

मकबऱ्या घुसून पूजा आणि...

११ ऑगस्ट रोजी पोलीस बंदोबस्त असतानाही हिंदू संघटनांचे कार्यकर्ते मकबऱ्यामध्ये घुसले. बॅरिकेटवरू आतमध्ये गेल्यावर त्यांनी भगवे झेंडे फडकावण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर मकबऱ्यामध्ये पूजा आणि आरतीही केली. त्यामुळे तणाव वाढला आणि पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यानंतर प्रकरण इतके चिघळले की, १० पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना बोलवण्यात आले होते. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस