शहरं
Join us  
Trending Stories
1
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
2
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
3
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
4
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
5
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
6
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
7
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
8
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
9
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
10
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
11
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
12
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
13
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
14
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
15
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
16
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
17
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
18
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
19
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
20
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी

Farmers Protest : संयुक्त किसान मोर्चाचा मोठा निर्णय, आता संसद भवनापर्यंत शेतकरी मोर्चा काढणार! 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 8:06 PM

farmers will march till parliament house in first week of may : मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकरी संसदेपर्यंत मोर्चा काढणार असल्याची घोषणा संयुक्त किसान मोर्चाने केली आहे.

ठळक मुद्देकेंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या चार महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या नव्या तीन कृषी कायद्याच्या निषेधार्थ दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असेलल्या शेतकरी संघटनांनी मोठी घोषणा केली आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकरी संसदेपर्यंत मोर्चा काढणार असल्याची घोषणा संयुक्त किसान मोर्चाने केली आहे. या मोर्चाचा दिवस व तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे. (farmers will march till parliament house in first week of may)

केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या चार महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. सिंघु, टिकरी आणि गाजीपूरच्या सीमेवर शेतकरी ठाण मांडून बसले आहेत. शेतकरी संघटनांनी आज बैठक घेऊन असा निर्णय घेतला की, शेतकरी आपल्या मागण्या घेऊन संसदेच्या दिशेने वाटचाल करतील. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकरी संसदेपर्यंत मोर्चा काढतील.

("शेतकरी संघटनांनी ठरवलं तर आंदोलन लवकर संपू शकतं, केंद्र सरकार पुन्हा चर्चेसाठी तयार")

नव्या कृषी कायद्यांबाबत तोडगा काढण्यासाठी 1 डिसेंबर 2020 पासून सरकार आणि शेतकरी संघटना यांच्यात चर्चेच्या फेऱ्या सुरू झाल्या. एकामागून एक, सरकार आणि सुमारे 40 शेतकरी संघटनांच्या नेत्यांमध्ये 11 फेऱ्या झाल्या. मात्र, या सर्व बैठकांमध्ये कोणताही तोडगा निघाला नाही. शेतकरी आपल्या मागण्यांर ठाम आहेत. 

दरम्यान, गेल्या शनिवारी (27 मार्च) पंजाबमधील मलोट शहरात पत्रकार परिषद घेणाऱ्या भाजपा (BJP) आमदारालाही शेतकऱ्यांच्या संतापाचा सामना करावा लागला. शेतकऱ्यांनी भाजपा आमदार अरुण नारंग (Arun Narang) यांना बेदम मारहाण करत त्यांचे कपडे फाडले आणि नंतर तोंडाला काळं फासल्याची घटना समोर आली आहे. 

( संतप्त शेतकऱ्यांकडून भाजपा आमदाराला बेदम मारहाण; कपडे फाडले, शाई फेकली अन् तोंडाला फासलं काळं)

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपा आमदार अरुण नारंग राज्य सरकार विरोधात पत्रकार परिषद घेण्यासाठी शनिवारी मलोट येथे आले होते. मात्र ते येण्याच्या आधीपासूनच संतप्त शेतकरी भाजपा कार्यालयात त्यांची वाट पाहत होते. नारंग आपल्या कारने या ठिकाणी पोहचताच शेतकऱ्यांनी त्यांच्याभोवती गर्दी केली आणि त्यांच्यावर शाई फेकली. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्या कारलाही काळं फासलं आहे. अखेर पोलिसांनी यामध्ये हस्तक्षेप करत आमदार अरुण नारंग यांना शेतकऱ्यांच्या गर्दीतून बाहेर काढले. अरुण नारंग पंजाबमधील अबोहरमधून भाजपा आमदार आहेत.  

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनdelhiदिल्लीFarmerशेतकरी