शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

Farmers Protest : संयुक्त किसान मोर्चाचा मोठा निर्णय, आता संसद भवनापर्यंत शेतकरी मोर्चा काढणार! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2021 20:06 IST

farmers will march till parliament house in first week of may : मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकरी संसदेपर्यंत मोर्चा काढणार असल्याची घोषणा संयुक्त किसान मोर्चाने केली आहे.

ठळक मुद्देकेंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या चार महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या नव्या तीन कृषी कायद्याच्या निषेधार्थ दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असेलल्या शेतकरी संघटनांनी मोठी घोषणा केली आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकरी संसदेपर्यंत मोर्चा काढणार असल्याची घोषणा संयुक्त किसान मोर्चाने केली आहे. या मोर्चाचा दिवस व तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे. (farmers will march till parliament house in first week of may)

केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या चार महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. सिंघु, टिकरी आणि गाजीपूरच्या सीमेवर शेतकरी ठाण मांडून बसले आहेत. शेतकरी संघटनांनी आज बैठक घेऊन असा निर्णय घेतला की, शेतकरी आपल्या मागण्या घेऊन संसदेच्या दिशेने वाटचाल करतील. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकरी संसदेपर्यंत मोर्चा काढतील.

("शेतकरी संघटनांनी ठरवलं तर आंदोलन लवकर संपू शकतं, केंद्र सरकार पुन्हा चर्चेसाठी तयार")

नव्या कृषी कायद्यांबाबत तोडगा काढण्यासाठी 1 डिसेंबर 2020 पासून सरकार आणि शेतकरी संघटना यांच्यात चर्चेच्या फेऱ्या सुरू झाल्या. एकामागून एक, सरकार आणि सुमारे 40 शेतकरी संघटनांच्या नेत्यांमध्ये 11 फेऱ्या झाल्या. मात्र, या सर्व बैठकांमध्ये कोणताही तोडगा निघाला नाही. शेतकरी आपल्या मागण्यांर ठाम आहेत. 

दरम्यान, गेल्या शनिवारी (27 मार्च) पंजाबमधील मलोट शहरात पत्रकार परिषद घेणाऱ्या भाजपा (BJP) आमदारालाही शेतकऱ्यांच्या संतापाचा सामना करावा लागला. शेतकऱ्यांनी भाजपा आमदार अरुण नारंग (Arun Narang) यांना बेदम मारहाण करत त्यांचे कपडे फाडले आणि नंतर तोंडाला काळं फासल्याची घटना समोर आली आहे. 

( संतप्त शेतकऱ्यांकडून भाजपा आमदाराला बेदम मारहाण; कपडे फाडले, शाई फेकली अन् तोंडाला फासलं काळं)

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपा आमदार अरुण नारंग राज्य सरकार विरोधात पत्रकार परिषद घेण्यासाठी शनिवारी मलोट येथे आले होते. मात्र ते येण्याच्या आधीपासूनच संतप्त शेतकरी भाजपा कार्यालयात त्यांची वाट पाहत होते. नारंग आपल्या कारने या ठिकाणी पोहचताच शेतकऱ्यांनी त्यांच्याभोवती गर्दी केली आणि त्यांच्यावर शाई फेकली. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्या कारलाही काळं फासलं आहे. अखेर पोलिसांनी यामध्ये हस्तक्षेप करत आमदार अरुण नारंग यांना शेतकऱ्यांच्या गर्दीतून बाहेर काढले. अरुण नारंग पंजाबमधील अबोहरमधून भाजपा आमदार आहेत.  

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनdelhiदिल्लीFarmerशेतकरी