शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

कृषी आंदोलन : SCच्या निर्णयानंतरही शेतकरी नाराजच; कारण सांगत म्हणाले - आंदोलन सुरूच राहणार 

By श्रीकृष्ण अंकुश | Published: January 12, 2021 5:42 PM

सरन्यायाधीश एस. ए. बोबडे, जस्टिस ए. एस. बोपन्ना आणि जस्टिस व्ही. रामासुब्रमन्यन यांच्या खंडपीठाने सर्वांची बाजू ऐकल्यानंतर, कायद्यांच्या अंमलबजावणीला पुढील आदेशापर्यंत स्थगिती राहील, असे म्हटले आहे.

ठळक मुद्देसर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे अनेक शेतकरी नेत्यांनी स्वागत केले आहे. तर काही शेतकरी नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.शेतकरी नेते म्हणाले, जोवर कायदे परत घेतले जात नाही, तोवर आंदोलन सुरूच राहील.आज आंदोलनाचा 48वा दिवस आहे.

नवी दिल्ली : कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर आजही शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. आज आंदोलनाचा 48वा दिवस आहे. यातच सर्वोच्च न्यायालयाने या तीनही कायद्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती आणली आहे. एवढेच नाही, तर शेतकऱ्यांच्या शंका आणि त्यांच्या तक्रारींवर विचार करण्यासाठी एक उच्च स्तरीय समितीचीही स्थापना केली आहे.

सरन्यायाधीश एस. ए. बोबडे, जस्टिस ए. एस. बोपन्ना आणि जस्टिस व्ही. रामासुब्रमन्यन यांच्या खंडपीठाने सर्वांची बाजू ऐकल्यानंतर, कायद्यांच्या अंमलबजावणीला पुढील आदेशापर्यंत स्थगिती राहील, असे म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या या समितीत भारतीय किसान यूनियनचे भूपिन्दर सिंग मान, शेतकारी संघटनेचे अनिल घनवट, डॉ. प्रमोद जोशी आणि कृषी अर्थतज्ज्ञ अशोक गुलाटी यांचा समावेश आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे अनेक शेतकरी नेत्यांनी स्वागत केले आहे. तर काही शेतकरी नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शेतकरी नेते म्हणाले, जोवर कायदे परत घेतले जात नाही, तोवर आंदोलन सुरूच राहील. जवळपास, 40 आंदोलक शेतकरी संघटनांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाने पुढील नियोजन करण्यासाठी बैठक बोलावली आहे.

भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत म्हणाले, माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या समितीतील सर्व सदस्य हे खुली बाजार व्यवस्था अथवा कायद्याचे समर्थक राहिले आहेत. अशोक गुलाटी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीनेच हे कायदे आणण्याची शिफारस केली होती. देशातील शेतकरी या निर्णयामुळे नाराज आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या कुठल्याही समितीसमोरील कार्यवाहीत भाग घेण्याची आपली इच्छा नाही. मात्र, यासंदर्भातील औपचारिक निर्णय मोर्चा घेईल, असे शेतकरी नेत्यांनी म्हटले आहे. मोर्चाचे वरिष्ठ नेते अभिमन्यू कोहाड म्हणाले, ‘‘कृषी कायद्यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीचे आम्ही स्वागत करतो. मात्र, हे कायदे पूर्णपणे मागे घेण्यात यावेत, अशी आमची इच्छा आहे.’’

सर्वोच्या न्यायालयाने दिलेल्या आजच्या निर्णयापूर्वी, शेतकरी आणि सरकार यांच्यात आठ वेळा चर्चा झाली, मात्र त्यातून कसल्याही प्रकारचा तोडगा निघाला नाही. आता 15 जानेवारीला पुढील बैठक होणार आहे. 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरीSupreme Courtसर्वोच्च न्यायालय