शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Farmers Protest: “दोघेही काठ्या उचलू, हरलो तर आयुष्यभर गुलामी करेन”; शेतकरी नेत्याचे CM खट्टरांना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2021 08:54 IST

Farmers Protest: हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरून विरोधकांकडून सातत्याने टीका केली जात आहे.

ठळक मुद्देशेतकरी नेत्याचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना खुले आव्हानकाठ्यांनी संघर्षाला आम्ही तयार आहोतया संघर्षात पराभूत झालो, तर तुमची आयुष्यभर गुलामी करेन

चंदीगड: लखीमपूर खिरी येथे झालेल्या हिंसाचारावरून योगी आणि मोदी सरकारविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. यातच हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरूनही विरोधकांकडून सातत्याने टीका केली जात आहे. यानंतर खट्टर यांची मुख्यमंत्रीपदावरून उचलबांगडी होऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. यानंतर एका शेतकरी नेत्याने मुख्यमंत्री खट्टर यांना खुले आव्हान दिले आहे. काठ्यांनी संघर्षाला आम्ही तयार आहोत, या संघर्षात पराभूत झालो, तर तुमची आयुष्यभर गुलामी करेन, असे शेतकरी नेत्याने म्हटले आहे. (farmer leader challenged haryana cm manohar lal khattar over his statement)

दुसरीकडे लखीमपूर खिरी येथील दुर्घटना आणि हिंसाचार प्रक्षोभक वक्तव्यामुळे झाल्याचे म्हटले जात आहे. यानंतरही आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असून, सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही पक्षांचे नेते विधानांवर मर्यादा आणत नसल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, शेतकऱ्यांना काठ्यांचीच भाषा कळते, त्यांना जशास तसे उत्तर द्या, असे खळबळजनक विधान मुख्यमंत्री खट्टर यांनी केले होते. यानंतर आता एका शेतकरी नेत्याने त्यांना खुले आव्हान दिले आहे. 

दोघेही काठ्या उचलू, हरलो तर आयुष्यभर गुलामी करेन

जर हिंमत असेल, तर मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी स्वतः पुढे येऊन संघर्ष करावा. दोघेही काठ्या उचलू. या लढाईत पराभूत झालो, तर आयुष्यभर तुमची गुलामी करेन, असे आव्हान दिले आहे. मुख्यमंत्री खट्टर यांनी तारीख जाहीर करावी. तुम्ही गुंड तयार करा. आम्ही शेतकऱ्यांना तयार करतो. एका दिवसात काय तो सोक्षमोक्ष लावून टाकू. मात्र, पहिला वार आम्ही करणार नाही. पण आमच्यावर वार केला, तर ते चांगले होणार नाही, असे गुरनाम सिंग चढूनी यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, लाठ्या-काठ्या उचला. आक्रमक शेतकऱ्यांना तुम्हीही त्याच भाषेत उत्तर द्या. शेतकऱ्यांना काठीचीच भाषा कळते. प्रत्येक भागात १००, ५०० ते एक हजार कार्यकर्त्यांची फळी उभी करा. तेच शेतकऱ्यांना जशास तसे उत्तर देतील. दोन-चार महिने कारागृहात राहून बाहेर आलात की तुम्हीही नेते व्हाल. जामिनाची काळजी करू नका, असे वादग्रस्त विधान मुख्यमंत्री खट्टर यांनी अलीकडेच केले होते. यानंतर संयुक्त किसान मोर्चा आणि काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी खट्टर यांच्यावर जोरदार निशाणा साधला.  

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनLakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचारHaryanaहरयाणाBJPभाजपाPoliticsराजकारण