शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

Farmers Protest: “दोघेही काठ्या उचलू, हरलो तर आयुष्यभर गुलामी करेन”; शेतकरी नेत्याचे CM खट्टरांना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2021 08:54 IST

Farmers Protest: हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरून विरोधकांकडून सातत्याने टीका केली जात आहे.

ठळक मुद्देशेतकरी नेत्याचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना खुले आव्हानकाठ्यांनी संघर्षाला आम्ही तयार आहोतया संघर्षात पराभूत झालो, तर तुमची आयुष्यभर गुलामी करेन

चंदीगड: लखीमपूर खिरी येथे झालेल्या हिंसाचारावरून योगी आणि मोदी सरकारविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. यातच हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरूनही विरोधकांकडून सातत्याने टीका केली जात आहे. यानंतर खट्टर यांची मुख्यमंत्रीपदावरून उचलबांगडी होऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. यानंतर एका शेतकरी नेत्याने मुख्यमंत्री खट्टर यांना खुले आव्हान दिले आहे. काठ्यांनी संघर्षाला आम्ही तयार आहोत, या संघर्षात पराभूत झालो, तर तुमची आयुष्यभर गुलामी करेन, असे शेतकरी नेत्याने म्हटले आहे. (farmer leader challenged haryana cm manohar lal khattar over his statement)

दुसरीकडे लखीमपूर खिरी येथील दुर्घटना आणि हिंसाचार प्रक्षोभक वक्तव्यामुळे झाल्याचे म्हटले जात आहे. यानंतरही आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असून, सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही पक्षांचे नेते विधानांवर मर्यादा आणत नसल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, शेतकऱ्यांना काठ्यांचीच भाषा कळते, त्यांना जशास तसे उत्तर द्या, असे खळबळजनक विधान मुख्यमंत्री खट्टर यांनी केले होते. यानंतर आता एका शेतकरी नेत्याने त्यांना खुले आव्हान दिले आहे. 

दोघेही काठ्या उचलू, हरलो तर आयुष्यभर गुलामी करेन

जर हिंमत असेल, तर मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी स्वतः पुढे येऊन संघर्ष करावा. दोघेही काठ्या उचलू. या लढाईत पराभूत झालो, तर आयुष्यभर तुमची गुलामी करेन, असे आव्हान दिले आहे. मुख्यमंत्री खट्टर यांनी तारीख जाहीर करावी. तुम्ही गुंड तयार करा. आम्ही शेतकऱ्यांना तयार करतो. एका दिवसात काय तो सोक्षमोक्ष लावून टाकू. मात्र, पहिला वार आम्ही करणार नाही. पण आमच्यावर वार केला, तर ते चांगले होणार नाही, असे गुरनाम सिंग चढूनी यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, लाठ्या-काठ्या उचला. आक्रमक शेतकऱ्यांना तुम्हीही त्याच भाषेत उत्तर द्या. शेतकऱ्यांना काठीचीच भाषा कळते. प्रत्येक भागात १००, ५०० ते एक हजार कार्यकर्त्यांची फळी उभी करा. तेच शेतकऱ्यांना जशास तसे उत्तर देतील. दोन-चार महिने कारागृहात राहून बाहेर आलात की तुम्हीही नेते व्हाल. जामिनाची काळजी करू नका, असे वादग्रस्त विधान मुख्यमंत्री खट्टर यांनी अलीकडेच केले होते. यानंतर संयुक्त किसान मोर्चा आणि काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी खट्टर यांच्यावर जोरदार निशाणा साधला.  

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनLakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचारHaryanaहरयाणाBJPभाजपाPoliticsराजकारण