शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

२५ दिवस, १३०० किमी पायपीट, ८ रुग्णालयं पालथी! ९ वर्षांच्या मुलाचा मृत्यू, कुटुंबाची धडपड व्यर्थ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2022 15:59 IST

आपल्या चिमुरड्याला वाचवण्यासाठी कुटुंबाने प्रयत्नांची पराकाष्टा केली. मात्र, अखेर त्याची प्राणज्योत मालवली.

जालौर: अलीकडेच राजस्थानमधील जालौर जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली. एका दलित विद्यार्थ्याला शिक्षकाने केलेल्या मारहाणीत जीव गमवावा लागला. ही घटना सायला पोलीस क्षेत्रातील सुराणा गावातील एका खाजगी शाळेतील आहे. जिथे शिक्षकाने दलित विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली होती, त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. अनेक दिवसांची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली आणि उपचारादरम्यान त्याने जीव सोडला. त्या विद्यार्थाने शाळेतील शिक्षकांसाठी असलेल्या मडक्यातून पाणी प्यायल्याने ही घटना घडल्याचा आरोप केला जात आहे.

राजस्थानच्या जालौरमधील या घटनेची देशभरात चर्चा झाली. शिक्षकाच्या मारहाणीनंतर विद्यार्थ्याची प्रकृती खालावली. २० जुलैला मारहाण झाल्यानंतर जवळपास २५ दिवस उपचारांसाठी पीडित विद्यार्थी आणि त्याच्या कुटुंबीयांची भटकंती सुरू होती. इंद्र कुमार मेघवाल असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. इंद्र कुमारची प्रकृती सुधारावी यासाठी कुटुंबीयांनी गेल्या २५ दिवसांत जवळपास १ हजार ३०० किमीचा प्रवास केला. राजस्थान आणि गुजरातमधील आठ रुग्णालयांमध्ये इंद्र कुमार यांच्यावर उपचार झाले. १३ ऑगस्टला अहमदाबादमधील रुग्णालयात इंद्र कुमारचा मृत्यू झाला.

उच्चवर्णीय शिक्षकाने इंद्र कुमारला मारहाण केल्याचा आरोप

शाळेत असलेल्या माठातील पाणी प्यायल्याने उच्चवर्णीय शिक्षकाने इंद्र कुमारला मारहाण केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला. मारहाणीत विद्यार्थ्याला अंतर्गत जखमा झाल्या होत्या. दलित कुटुंबातील ९ वर्षांच्या इंद्र कुमारला २० जुलैला मारहाण झाली. सुराणा गावात हा प्रकार घडला. सुराणा गावातील सरस्वती विद्यामंदिर शाळेत इयत्ता तिसरीत इंद्र कुमार शिकत होता. मयत इंद्र कुमारचे काका किशोर कुमार यांनी शाळेचे संचालक छैल सिंग यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. जातीवाचक शिव्या देऊन अपमानित केले आणि त्यानंतर मारहाण करून हत्या केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.  

दरम्यान, कुटुंबातील सदस्यांनी इंद्र कुमारला जालौरपासून १३ किमीवर असलेल्या बगोडा येथील रुग्णालयात नेले होते. वेदना कमी झाल्यावर त्याला घरी आणले. मात्र एक-दोन दिवसांत त्रास पुन्हा वाढला. इंद्रला घरापासून ५० किमीवर असलेल्या आस्था मल्टिस्पेशॅलिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुसऱ्या दिवशी वेदना कमी झाल्याने त्याला डिस्चार्ज मिळाला. पुन्हा त्रास वाढल्याने इंद्र कुमारला घरापासून १५५ किमीवर असलेल्या दिसामध्ये दाखल करण्यात आले होते. अशी एकानंतर एक २५ रुग्णालये फिरल्यानंतरही अखेर १३ ऑगस्ट रोजी इंद्र कुमारची प्राणज्योत मालवली. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानPoliceपोलिस