शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
7
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
8
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
9
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
10
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
11
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
12
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
13
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
14
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
15
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
16
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
17
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
18
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
19
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
20
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत

शेअर मार्केटमधून पैसा काढण्यासाठी 'एक्झिट पोल'चा खेळ ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2019 10:19 IST

एक्झिट पोलमुळे विरोधकांच्या मोर्चेबांधणीची गती मंदावली आहे. विरोधक संभ्रमात आहेत. त्यामुळे निवडणुकीचा निकाल एक्झिट पोलच्या विपरीत लागल्यास विरोधकांना हालचालींना वेळ मिळणार नाही. तर एक्झिट पोलच्या आडून इतर गोष्टी साध्य करण्याची उठाठेव सुरू असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यासाठी एवघा एक दिवस शिल्लक आहे. निवडणुकीसंदर्भात आलेल्या एक्झिट पोलनुसार एनडीएला बहुमत मिळणार आहे. एक्झिट पोलमुळे विरोधकांना धडकी भरली आहे. तर सत्ताधारी भाजपच्या गोटात आनंदोत्सव सुरू झाला आहे. मात्र एक्झिट पोलमध्ये दाखविण्यात आलेल्या निकालांवर आता प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे. तसेच अनेक गोष्टी साध्य करण्यासाठी एक्झिट पोलचा वापर सुरू असल्याची शक्यता विविध पक्षांच्या नेत्यांकडून व्यक्त होत आहे.

एक्झिट पोलमुळे विरोधकांच्या मोर्चेबांधणीची गती मंदावली आहे. विरोधक संभ्रमात आहेत. त्यामुळे निवडणुकीचा निकाल एक्झिट पोलच्या विपरीत लागल्यास विरोधकांना हालचालींना वेळ मिळणार नाही. तर एक्झिट पोलच्या आडून इतर गोष्टी साध्य करण्याची उठाठेव सुरू असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

सत्तेत असलेल्या नरेंद्र मोदी सरकारकडून इव्हीएममध्ये काही तरी घोळ करण्यात येणार आहे. त्यासाठी एक्झिट पोलच्या माध्यमातून तसं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. या पार्श्वभूमीवर २२ विरोधी पक्षांनी प्रत्येक विधानसभा मतदार संघात ५० टक्के व्हीव्हीपॅट पावत्यांची मागणी केली आहे.

तसेच शेअर मार्केटसाठी देखील एक्झिट पोलचा पर्याय शोधण्यात आला असेल, असा दावा करण्यात येत आहे. एक्झिट पोल आल्यानंतर शेअर बाजाराने अचानक मुसंडी मारली. त्यामुळे एक्झिट पोलचा वापर शेअर मार्केटमधून पैसा काढण्यासाठी करण्यात येत असल्याचा दावा विरोधक करत आहेत. तर अनेकांनी एक्झिट पोल करणाऱ्या कंपन्यांना मॅनेज केल्याचा दावा केला आहे. पैशांच्या मोबदल्यात एक्झिट पोलचा निकाल बदलल्याचा संशय व्यक्त होत आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९exit pollमतदानोत्जतर जनमत चाचणीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसshare marketशेअर बाजार