शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
2
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
3
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
4
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
5
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
6
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
7
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
8
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
9
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
10
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
11
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
12
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
13
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
14
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अंबानी-अदानी-मस्क-झुकरबर्ग यांनाही मागे टाकलं...
15
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
16
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
17
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
18
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
19
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
20
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा

‘काम थांबले पाहिजे’ असे प्रत्येक जण म्हणतो, पण ‘काम सुरू करा,’ असे कोणीही म्हणत नाही- नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2019 6:24 AM

देशाचा विकासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असला पाहिजे, असे गडकरी यांनी म्हटले.

नवी दिल्ली : विविध रस्ते प्रकल्पांच्या मार्गात जमीन अधिग्रहण आणि पर्यावरण मंजुरी यासारखे अडथळे निर्माण होत असल्याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी लोकसभेत तीव्र नाराजी व्यक्त केली. देशाचा विकासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असला पाहिजे, असे गडकरी यांनी म्हटले.गडकरी यांनी प्रश्नोत्तरांच्या तासात सांगितले की, सर्व खासदारांनी आपल्या मतदारसंघात सुरू असलेल्या रस्ते प्रकल्पाबद्दल जागरूक राहिले पाहिजे. रस्ते आणि पुलांच्या बांधकामाच्या मार्गात येणारे अडथळे दूर करण्यास खासदारांनी मदत केली पाहिजे; पण आपल्याकडे ‘काम थांबले पाहिजे.’असे प्रत्येक जण म्हणतो, पण ‘काम सुरू करा,’ असे मात्र कोणीही म्हणत नाही.रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री गडकरी यांनी सांगितले की, जमीन अधिग्रहण आणि पर्यावरण मंजुरी हा रस्त्यांच्या मार्गातील सर्वांत मोठा अडथळा आहे. मी पर्यावरणवादीच आहे. तथापि, पर्यावरण आणि विकास सोबतच चालले पाहिजेत.शक्यता दर्शक अभ्यास, प्रकल्पाची व्यवहार्यता, प्राधान्यस्थिती आणि निधीची उपलब्धता यांचा पूर्ण अभ्यास करूनच प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे.३४,८०० कि.मी. रस्ते बांधले जाणारगडकरी यांनी सांगितले की, भारत सरकारने, आॅक्टोबर २०१७ मध्ये ‘भारतमाला योजना टप्पा-१’ला मंजुरी दिली. या प्रकल्पात ३४,८०० कि. मी. रस्ते बांधले जाणार आहेत. त्यांचा अंदाजित खर्च ५,३५,००० कोटी रुपये आहे. यात ९ हजार कि.मी.चा आर्थिक कॉरिडॉर आहे. ६ हजार कि.मी. अंतर्गत कॉरिडॉर आणि फिडर रोड आहेत.याशिवाय ५ हजार कि.मी. राष्ट्रीय कॉरिडॉर कार्यक्षमता सुधारणा, २ हजार कि.मी. सीमा व आंतरराष्ट्रीय जोडणी रस्ते, २ हजार कि.मी. किनारपट्टी व बंदर जोडणी रस्ते आणि ८०० कि.मी. एक्स्प्रेस वे यात आहेत.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी