शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

दृष्टी गेली तरी तेवत ठेवले ज्ञानाचे अग्निहोत्र; महापंडित जगद्गुरू रामभद्राचार्य यांना ज्ञानपीठ पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2024 07:29 IST

२०२३ सालासाठीचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालेले जगद्‌गुरू रामभद्राचार्य हे संस्कृत महापंडित असून त्यांनी आजवर अनमोल अशी साहित्यसेवा केली आहे.

नवी दिल्ली : २०२३ सालासाठीचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालेले जगद्‌गुरू रामभद्राचार्य हे संस्कृत महापंडित असून त्यांनी आजवर अनमोल अशी साहित्यसेवा केली आहे. ते दोन महिन्यांचे असताना दुर्दैवाने दृष्टिहीन झाले, पण त्याने खचून न जाता त्यांनी आयुष्यभर ज्ञानाचे अग्निहोत्र सतत तेवत ठेवले आहे. संस्कृत भाषेच्या शिक्षणातून त्यांनी भारतीय संस्कृतीची मूल्ये सर्व जगाला समजावून सांगण्याचे महत्त्वाचे काम केले आहे.

उत्तर प्रदेशमधील चित्रकूट येथे राहणारे जगद्‌गुरू रामभद्राचार्य यांचा जन्म १९५० साली झाला. ते रामानंद संप्रदायाचे असून त्यांनी चित्रकूट येथे संत तुलसीदास यांच्या नावे तुलसी पीठ या धार्मिक व सामाजिक संस्थेची स्थापना केली आहे. ते सध्या या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आहेत. त्यांनी स्थापन केलेल्या जगद्‌गुरू रामभद्राचार्य विकलांग विश्वविद्यालयात दिव्यांग विद्यार्थ्यांनाच शिक्षण दिले जाते. तिथे त्यांच्यासाठी पदवी अभ्यासक्रम चालविण्यात येतात.

अफाट स्मरणशक्तीची मिळाली देणगी

• जगद्‌गुरू रामभद्राचार्य यांचे मूळ नाव गिरिधर मिश्र असून त्यांनी जौनपूर येथील आदर्श गौरीशंकर संस्कृत महाविद्यालयात औपचारिक शिक्षण घेतले आहे.

■ तिथे त्यांनी संस्कृत, हिंदी, इंग्रजी, गणित, भूगोल, इतिहास या विषयांचा अभ्यास केला. एकदा गोष्ट ऐकली की, ती कायमची लक्षात ठेवण्याची अफाट स्मरणशक्ती त्यांना लाभली आहे.

त्यामुळे ते कधीही ब्रेल लिपी शिकले नाहीत किंवा लेखनासाठी अन्य साधनांचा आधार घेतला नाही. जे शिकले ते त्यांनी लक्षात ठेवले व त्याआधारे अनेक पुस्तकेही लिहिली.

ईश्वराच्या सगुण, निर्गुण रुपाबद्दल केले विवेचन

संयुक्त राष्ट्रांच्या वतीने आयोजित विश्व शांती शिखर संमेलनात जगद्गुरू रामभद्राचार्य यांचा समावेश होता. भारत व हिंदू या शब्दांची संस्कृत व्याख्या तसेच ईश्वराचे सगुण, निर्गुण रूप या मुद्द्यांविषयी त्यांनी या संमेलनातील आपल्या भाषणात विवेचन केले होते.

शंभरावर पुस्तके लिहिली

• जगद्‌गुरु रामभद्राचार्य हे २२ भाषांमध्ये पारंगत आहेत. त्यांनी संस्कृत. हिंदी, अवधी, मैथिलीसहित अनेक भाषांमध्ये काव्यरचना केली आहे. तसेच १०० हून अधिक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.

त्यामध्ये चार महाकाव्य (दोन संस्कृत व 3 दोन हिंदी भाषेतील), रामचरितमानसवर हिंदीतून केलेले भाष्य, अष्टाध्यायीबाबत काव्यात्मक संस्कृत ग्रंथ, प्रस्थानत्रयी (ब्रह्मसूत्र, भगवद्गीता, प्रधान उपनिषदांवर संस्कृतमधून केलेले विवेचन) अशा अनेक पुस्तकांचा समावेश आहे.

संत तुलसीदास यांच्या काव्यावर ● अधिकारवाणीने बोलू शकणाऱ्या व्यक्तींमध्ये जगद्‌गुरू रामभद्राचार्य अग्रस्थानी आहेत. रामायण, महाभारतावरील रामभद्राचार्याच्या निरुपणाचे कार्यक्रम भारतातील अनेक देशांत तसेच विदेशांतही आयोजिण्यात आले होते.

● तसेच त्यांच्या निरुपणाचे कार्यक्रम विविध वाहिन्यांवरही प्रसारित होत असतात. त्यांना २०१५ साली केंद्र सरकारने पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते.