शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
2
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
3
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
4
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
5
Asia Cup 2025: मोहसिन नक्वींच्या हकालपट्टीची मागणी; पाकिस्तानातच जोर धरू लागली...
6
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
7
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
8
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
9
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
10
टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!
11
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही! कंपन्या फसवणूक करत असल्याच्या ३००० हून अधिक तक्रारी दाखल
12
Video: भारताविरोधातील पराभव सहन झाला नाही; पाकिस्तानी खेळाडूने रडत रडत बनवला व्हिडिओ अन्...
13
इंजिनियरचं धक्कादायक कृत्य, आधी पत्नीची हत्या केली, त्यानंतर मित्राला केला व्हिडीओ कॉल आणि ...
14
IndiGo Bomb Threat: इंडिगोच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, दिल्ली विमानतळावर 'इमर्जन्सी'!
15
जेव्हा पाकिस्तान सरकारनं आपल्याच क्रिकेटर्सना चुना लावला; दिलेले चेकच बाऊन्स झाले; किती होती रक्कम? 
16
१ ऑक्टोबरपासून बदलणार इंट्राडे ट्रेडिंगचे नियम, गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
17
जीएसटी: २.२९ लाख रुपयांना लाँच झालेली ही बाईक, आता मिळतेय १.५५ लाख रुपयांना...
18
प्रेम विवाह: लग्नानंतर तुमची जोडी यशस्वी ठरेल की नाही? कुंडलीतील 'या' योगावरून मिळते उत्तर!
19
"आम्ही १५ वर्षांपासून वेगळे राहतोय...", गोविंदाच्या पत्नीचा मोठा खुलासा, सुनिता अहुजा म्हणाली...
20
संरक्षण, इन्फ्रा ते फायनान्स! 'हे' ५ शेअर्स करणार श्रीमंत! तुमच्या पोर्टफोलिओसाठी उत्तम पर्याय, टार्गेट प्राईस जाहीर

दृष्टी गेली तरी तेवत ठेवले ज्ञानाचे अग्निहोत्र; महापंडित जगद्गुरू रामभद्राचार्य यांना ज्ञानपीठ पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2024 07:29 IST

२०२३ सालासाठीचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालेले जगद्‌गुरू रामभद्राचार्य हे संस्कृत महापंडित असून त्यांनी आजवर अनमोल अशी साहित्यसेवा केली आहे.

नवी दिल्ली : २०२३ सालासाठीचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालेले जगद्‌गुरू रामभद्राचार्य हे संस्कृत महापंडित असून त्यांनी आजवर अनमोल अशी साहित्यसेवा केली आहे. ते दोन महिन्यांचे असताना दुर्दैवाने दृष्टिहीन झाले, पण त्याने खचून न जाता त्यांनी आयुष्यभर ज्ञानाचे अग्निहोत्र सतत तेवत ठेवले आहे. संस्कृत भाषेच्या शिक्षणातून त्यांनी भारतीय संस्कृतीची मूल्ये सर्व जगाला समजावून सांगण्याचे महत्त्वाचे काम केले आहे.

उत्तर प्रदेशमधील चित्रकूट येथे राहणारे जगद्‌गुरू रामभद्राचार्य यांचा जन्म १९५० साली झाला. ते रामानंद संप्रदायाचे असून त्यांनी चित्रकूट येथे संत तुलसीदास यांच्या नावे तुलसी पीठ या धार्मिक व सामाजिक संस्थेची स्थापना केली आहे. ते सध्या या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आहेत. त्यांनी स्थापन केलेल्या जगद्‌गुरू रामभद्राचार्य विकलांग विश्वविद्यालयात दिव्यांग विद्यार्थ्यांनाच शिक्षण दिले जाते. तिथे त्यांच्यासाठी पदवी अभ्यासक्रम चालविण्यात येतात.

अफाट स्मरणशक्तीची मिळाली देणगी

• जगद्‌गुरू रामभद्राचार्य यांचे मूळ नाव गिरिधर मिश्र असून त्यांनी जौनपूर येथील आदर्श गौरीशंकर संस्कृत महाविद्यालयात औपचारिक शिक्षण घेतले आहे.

■ तिथे त्यांनी संस्कृत, हिंदी, इंग्रजी, गणित, भूगोल, इतिहास या विषयांचा अभ्यास केला. एकदा गोष्ट ऐकली की, ती कायमची लक्षात ठेवण्याची अफाट स्मरणशक्ती त्यांना लाभली आहे.

त्यामुळे ते कधीही ब्रेल लिपी शिकले नाहीत किंवा लेखनासाठी अन्य साधनांचा आधार घेतला नाही. जे शिकले ते त्यांनी लक्षात ठेवले व त्याआधारे अनेक पुस्तकेही लिहिली.

ईश्वराच्या सगुण, निर्गुण रुपाबद्दल केले विवेचन

संयुक्त राष्ट्रांच्या वतीने आयोजित विश्व शांती शिखर संमेलनात जगद्गुरू रामभद्राचार्य यांचा समावेश होता. भारत व हिंदू या शब्दांची संस्कृत व्याख्या तसेच ईश्वराचे सगुण, निर्गुण रूप या मुद्द्यांविषयी त्यांनी या संमेलनातील आपल्या भाषणात विवेचन केले होते.

शंभरावर पुस्तके लिहिली

• जगद्‌गुरु रामभद्राचार्य हे २२ भाषांमध्ये पारंगत आहेत. त्यांनी संस्कृत. हिंदी, अवधी, मैथिलीसहित अनेक भाषांमध्ये काव्यरचना केली आहे. तसेच १०० हून अधिक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.

त्यामध्ये चार महाकाव्य (दोन संस्कृत व 3 दोन हिंदी भाषेतील), रामचरितमानसवर हिंदीतून केलेले भाष्य, अष्टाध्यायीबाबत काव्यात्मक संस्कृत ग्रंथ, प्रस्थानत्रयी (ब्रह्मसूत्र, भगवद्गीता, प्रधान उपनिषदांवर संस्कृतमधून केलेले विवेचन) अशा अनेक पुस्तकांचा समावेश आहे.

संत तुलसीदास यांच्या काव्यावर ● अधिकारवाणीने बोलू शकणाऱ्या व्यक्तींमध्ये जगद्‌गुरू रामभद्राचार्य अग्रस्थानी आहेत. रामायण, महाभारतावरील रामभद्राचार्याच्या निरुपणाचे कार्यक्रम भारतातील अनेक देशांत तसेच विदेशांतही आयोजिण्यात आले होते.

● तसेच त्यांच्या निरुपणाचे कार्यक्रम विविध वाहिन्यांवरही प्रसारित होत असतात. त्यांना २०१५ साली केंद्र सरकारने पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते.