शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
2
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
3
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
4
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
5
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
6
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
7
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
8
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
9
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
10
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
11
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
12
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
13
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
14
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
15
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
16
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
17
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
18
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
19
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
20
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...

देशात रोजगाराची कमी नाही, पण कुशल तरुणांची उणीव; केंद्रीयमंत्र्यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 3:48 PM

गंगवार यांनी देशात रोजगार नसल्याची बाबच फेटाळून लावली आहे. मात्र त्यांनी युवकांमध्ये स्किल नसल्याचे सांगत आपल्याच सरकारच्या स्किल इंडिया प्रोग्रामची स्थिती सांगितल्याची चर्चा सुरू झाली आहे.

नवी दिल्ली - देशावर सध्या आर्थिक मंदीचे सावट आहे. त्यामुळे विविध क्षेत्रातील रोजगार जात आहेत. निर्मिती क्षेत्रातील अनेक तरुणांना आणि कामगारांना आपला रोजगार गमवावा लागत आहे. वाहन क्षेत्रातील स्थिती अधिकच बिकट झाली आहे. अशा स्थितीत केंद्रीयमंत्री संतोष गंगवार यांनी अजबच तर्क मांडला आहे.

केंद्रीयमंत्री गंगवार यांनी बेरोजगार युवकांसंदर्भात अजब विधान केले आहे. ते बरेलीतील एका कार्यक्रमात बोलत होते. गंगवार म्हणाले की, देशात रोजगाराची काही कमतरता नाही. मात्र उत्तर भारतातील युवकांमध्ये स्किल अर्थात कौशल्य नाही. त्यामुळे या तरुणांना रोजगार देणे शक्य नाही. मी याच मंत्रालयाचे काम पाहतो, त्यामुळे मी सांगू शकतो की रोजगाराची कमतरता नसून ज्या कंपन्या रोजगार देण्यासाठी येतात, त्यांना युवकांमध्ये हवं ते कौशल्य दिसत नसल्याचे त्यांनी नमूद केले.

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने मागील पाच वर्षात कौशल्य विकास योजनेवर (स्कील इंडिया) हजारो कोटी रुपये खर्च केले आहे. मात्र गंगवार यांच्या वक्तव्याने स्किल इंडियाचं काय झालं असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच मग स्कील इंडिया कार्यक्रमातून शिकलेल्या विद्यार्थ्यांच काय झालं, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट आहे. हे आपण समजू शकतो, परंतु, रोजगार नाही हे म्हणणे चुकीचे असल्याचे गंगवार पुढे म्हणाले.

दरम्यान देशात बेरोजगारीने मागील ४५ वर्षांचा विक्रम मोडीत काढल्याची आकडेवारी काही दिवसांपूर्वीच जाहीर झाली होती. तर देशाचा आर्थिक विकासदर देखील ८ वरून पाचवर आला आहे. अशा स्थितीत काँग्रेसकडून सत्ताधारी भाजपवर हल्लाबोल करण्यात येत आहे. मात्र गंगवार यांनी देशात रोजगार नसल्याची बाबच फेटाळून लावली आहे. मात्र त्यांनी युवकांमध्ये स्किल नसल्याचे सांगत आपल्याच सरकारच्या स्किल इंडिया प्रोग्रामची स्थिती सांगितल्याची चर्चा सुरू झाली आहे.