शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक निकाल धक्कादायक नाहीत

By admin | Updated: March 13, 2017 00:58 IST

पाच राज्यांमधील निवडणूक निकाल जाहीर होण्याआधीच एक्झिट पोलने त्याचे दिशानिर्देशन केले होते.

निवडणूक विश्लेषणअवधेश कुमार

पाच राज्यांमधील निवडणूक निकाल जाहीर होण्याआधीच एक्झिट पोलने त्याचे दिशानिर्देशन केले होते. जे लोक वास्तविक परिस्थिती समजून न घेता आपल्या राजकीय विचारांनुसार आकलन करीत होते, त्यांनाच या निवडणूक निकालांमुळे आश्चर्याचा धक्का बसला असेल. देशातील सर्वांत मोठे राज्य उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला अभूतपूर्व विजय मिळाल्यामुळे बहुतांश लोक चकित झाले आहेत. परिवार आणि पक्षातील अंतर्गत कलह तसेच कायदा व सुव्यवस्था परिस्थिती ढासळलेल्या राज्यातील सरकारला दुसरा पर्याय उपलब्ध असलेली जनता दुसऱ्यांदा सत्ता का बरे सोपविणार, याचा जराही विचार हे लोक करीत नाहीत. सत्तेत असताना नेते नेहमीच आपली क्षमता आणि लोकप्रियतेचे आवश्यकतेपेक्षा जास्त आकलन करीत असतात आणि त्यांच्या सभोवतालचे लोक त्यांना आणखी हरभऱ्याच्या झाडावर चढविण्याची भूमिका बजावतात.अखिलेश यादव यांच्यासोबत नेमके असेच घडले. त्यांचे सर्वांत मोठे सल्लागार रामगोपाल यादव यांनी त्यांना ‘पंतप्रधानपदाची लायकी असलेले’ नेते म्हणण्यापर्यंत मजल मारली. निवडणुकीत जय-पराजय होतच राहतो. परंतु अखिलेश यादव यांनी ज्या प्रकारे संपूर्ण पक्षाला आपल्या एकछत्री अंमलाखाली आणले आणि स्वत: व पत्नी डिम्पल यादव यांना मुख्य प्रचारक बनविले, त्यावरून या दोघांचीच लोकप्रियता जास्त असल्याने आपल्याला विजयासाठी इतरांची गरजच नाही, असा भ्रम त्यांना झाला होता, असे दिसते. याबाबतीत त्यांनी आपल्या पित्यालाही निवडणूक प्रचारापासून वानप्रस्थ घेण्यास भाग पाडले.काँग्रेससोबत समाजवादी पार्टीची युती करण्यामागे कोणताही तार्किक आधार नव्हता. या युतीमुळे मुस्लीम मतांचे विभाजन टाळता येईल, असा विचार करणे चुकीचे होते. कारण काँग्रेस गेल्या २८ वर्षांपासून आपला जनाधार मिळविण्यासाठी संघर्ष करीत आहे. मुस्लीम काँग्रेससोबत असते तर २००७ व २०१२ मध्ये काँग्रेसची दुर्दशा झाली नसती. अशा परिस्थितीत अखिलेश यादव यांच्या नेतृत्वात सपाचा विजय झाला असता तर आश्चर्य वाटले असते.लोकांना सपाला विजयी करायचे नव्हते तर त्यांच्याकडे दोन पर्याय होते, ते म्हणजे भाजपा किंवा बसपा. लोकांनी बसपाचे सरकार २००७ ते २०१२ पर्यंत पाहिले आहे. या बसपाच्या शासनकाळात असे काहीही घडले नाही की ज्यामुळे लोकांना बसपाचे आकर्षण वाटावे. दुसरीकडे भाजपा होती, जिने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात परिवर्तनाचा नारा दिला आणि हा नारा लोकांना भावला. उत्तर प्रदेश्जवळ सर्वकाही आहे, पण चांगले सरकार नाही, असे मोदी सांगत तेव्हा लोकांना ते पटत असे. त्यामुळे एक मानसशास्त्रीय स्थिती निर्माण झाली. तसेही १८ ते ३० वर्षांच्या युवकांनी केंद्रातील भाजपा सरकारचे काम पाहिले आहे.लोकांना परिवर्तन करायचे होते तर त्यांना बसपापेक्षा भाजपा चांगला पर्याय वाटला. त्यावरून लोकांचा मोदींवरील विश्वास कायम आहे आणि त्यांची लोकप्रियताही कायम आहे हे सिद्ध झाले.