शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
7
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
8
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
9
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
10
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
11
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
12
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
13
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
14
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
15
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
16
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
17
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
18
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
19
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
20
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार

निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 05:50 IST

"महाराष्ट्रात एक कोटी नवे मतदार जादूने तयार"

सासाराम (बिहार) : बिहार विधानसभा निवडणुकीत मतदार याद्यांच्या आडून मतांची चोरी करण्याचा डाव आखला जात आहे. मात्र विरोधी पक्ष  कोणत्याही परिस्थितीत ‘निवडणूक चोरी’ होऊ देणार नाही. निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून संपूर्ण देशात मतांची चोरी करीत असल्याचे आता लपून राहिले नसल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी बिहारमधून मतचोरीच्या विरोधात ‘मतदार हक्क यात्रा’ प्रारंभ केली. त्यावेळी त्यांनी हा निर्धार व्यक्त केला.

राहुल गांधी म्हणाले की, ही संविधान वाचविण्याची लढाई आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप संविधान संपविण्याचा प्रयत्न करत आहेत. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील मतदारसंख्येतील वाढीचा दाखला देत दावा केला की, सर्व नवे मतदार भाजपकडे गेले. तसेच बेंगळुरूतील महादेवपुरा मतदारसंघातील मतदार याद्यांतील घडामोडींचा उल्लेख त्यांनी केला. 

भाजपच्या लोकांकडून कोणतेही प्रतिज्ञापत्र आयोगाने का मागितले नाही, असा सवाल राहुल यांनी केला.

कोण काय म्हणाले?

महाराष्ट्रातील एक्झिट पोल चाचण्या सांगत होत्या की, इंडिया आघाडी निवडणुका जिंकेल. लोकसभेत इंडिया आघाडी जिंकते; पण चार महिन्यांत आपण त्याच भागात हरतो. जेव्हा आम्ही चौकशी केली तेव्हा आम्हाला आढळले की एक कोटी नवीन मतदार जादूने तयार झाले आहेत.- राहुल गांधी, काँग्रेस नेतेसंविधान धोक्यात आहे, भाजप सत्तेत असेपर्यंत लोकांचे अधिकार सुरक्षित नाहीत. आयोग केंद्र सरकारचा एजंट झाले आहे. २०२३ मध्ये सरकारने असा कायदा केला की, आयोगातील सदस्यांनी गडबड केली, तरी त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार नाही.- मल्लिकार्जुन खरगे, अध्यक्ष, काँग्रेसदेशातील सध्याची परिस्थिती आणीबाणीपेक्षाही वाईट आहे. यावेळी भाजपला कोणत्याही किमतीत सत्तेत येऊ देऊ नये. सर्वांनी एकत्र येऊन भाजपला हाकलून लावावे, जेणेकरून आपली लोकशाही मजबूत होईल.- लालूप्रसाद यादव, अध्यक्ष, राजदलोकशाहीची जननी बिहारमधून लोकशाही संपू दिली जाणार नाही. ही  मतचोरी चनाही, तर हा एक भलामोठा दरोडा आहे.-तेजस्वी यादव, विरोधी पक्षनेते

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगBJPभाजपा