शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकात प्रचारतोफा थंडावल्या, काँग्रेस, भाजपाची प्रतिष्ठा पणाला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 05:59 IST

कर्नाटकातील विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराच्या तोफा गुरुवारी थंडावल्या असून, २२३ जागांसाठी शनिवारी मतदान होणार आहे. काँग्रेस व भाजपा यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकांत जनतेने कोणाला कौल दिला, हे मंगळवार, १५ मे रोजी स्पष्ट होईल.

बंगळुरू - कर्नाटकातील विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराच्या तोफा गुरुवारी थंडावल्या असून, २२३ जागांसाठी शनिवारी मतदान होणार आहे. काँग्रेस व भाजपा यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकांत जनतेने कोणाला कौल दिला, हे मंगळवार, १५ मे रोजी स्पष्ट होईल. प्रचारात भाजपासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, तर राहुल गांधी यांनी काँग्रेससाठी जीवाचे रान केले.भाजपाने पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यासह राज्याबाहेरील तब्बल ३४ नेत्यांना प्रचारात उतरवले होते. काँग्रेसतर्फे मात्र राहुल गांधी व मुख्यमंत्री सिद्धरामय्या हेच स्टार प्रचारक होते. सोनिया गांधी व माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी कर्नाटकात प्रचारासाठी एकच दिवस दिला. विविध जनमत चाचण्यांनी तिथे काँग्रेस वा भाजपा यापैकी कोणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नाही, असे म्हटले आहे. मात्र, काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळतील, असे सर्वच चाचण्यांचे निष्कर्ष आहेत. एच. डी. देवेगौडा यांच्या पक्षाचा पाठिंबा ज्याला मिळेल, तेच सरकार स्थापन करू शकतील, असे सांगण्यात येत आहे.प्रचाराच्या अखेरच्या दिवशी पंतप्रधान मोदी यांनी दलित कार्यकर्त्यांशी संवाद साधला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा काँग्रेसने सातत्याने अपमान केल्याचा आरोपही त्यांनी केला. भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी आम्हाला १३0 जागा मिळतील, असा दावा केला. राहुल गांधी व मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही काँग्रेसला बहुमत मिळेल, अशी खात्री व्यक्त केली.जातींना अधिक महत्त्वमोदी व शहा यांनी काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचार, गुन्हेगारी, जातीयवाद व घराणेशाही यांचेच उदाहरण असल्याचा आरोप करीत जोरदार टीकास्त्र चालवले.या निवडणुकांनंतर काँग्रेस केवळ पंजाब, पुडुच्चेरी व परिवार यापुरतीच शिल्लक राहील, असा टोला मोदी यांनी लगावला.मात्र, यंदा प्रथमच निवडणुकीत जातींना अधिक महत्त्व आले आहे. काँग्रेसने ४९ लिंगायत व ४६ वोक्कालिगा समाजाच्या नेत्यांना उमेदवारी दिली आहे. भाजपाने ६८ लिंगायत तसेच ३८ वोक्कालिगा उमेदवार दिले, तर जनता दल (धर्मनिरपेक्ष)ने ४१ लिंगायत व ५५ वोक्कालिगा उमेदवार उभे केले आहेत.हे कोट्यवधी कोणाचे?या निवडणुकांच्या निमित्ताने पैसा, दारू व सोने, चांदी, कपडे यांची राजकीय पक्षांनी जणू मतदारांवर खैरातच केली. निवडणूक आयोग व अन्य तपास यंत्रणांनी रोख, दारू, सोने, चांदी व कपडे मिळून सुमारे १७१ कोटी रुपये जप्त केले. त्यात ८१ कोटी रुपये रोख आहेत.याशिवाय २४ कोटींहून अधिक रकमेची दारू हस्तगत करण्यात आली आणि ४४ कोटींहून अधिक रकमेचे सोने व चांदी पकडण्यात आले. विशेष म्हणजे, नंतर त्यावर कोणीही दावा केलेला नाही; पण प्रत्यक्षात याच्या कितीतरी पट अधिक रक्कम व वस्तू वाटल्या गेल्या आहेत, असे सांगण्यात येते.राहुल यांचा भाजपावर हल्लाया निवडणूक प्रचारात राहुल गांधी यांनी सातत्याने भाजपा व मोदी यांच्यावर हल्ले चढवत, मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार येडियुरप्पा यांचा भ्रष्टाचार, त्यांचे खाण घोटाळ्यातील रेड्डी बंधूंशी असलेले संबंध, भ्रष्ट मंडळींना दिलेली उमेदवारी व दलित तसेच महिलांवरील अत्याचार यांचा उल्लेख केला. तसेच राफेल व्यवहारामुळे मोदींनी ठरावीक उद्योगपतींचा फायदा करून दिला, असे ते वारंवार म्हणाले.मतदानाच्या तीन दिवस आधी बंगळुरूमध्ये सुमारे १0 हजार बोगस मतदार ओळखपत्रे सापडल्याने खळबळ माजली होती. त्यावरून दोन पक्षांत आरोप-प्रत्यारोप झाले. मात्र, चौकशी पूर्ण झाली नसल्याने हे प्रकरण मतदान होईपर्यंत तरी गुलदस्त्यांतच राहील.

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८congressकाँग्रेसBJPभाजपाJanata Dal (Secular)जनता दल (सेक्युलर)