शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

Eknath Shinde vs Uddhav Thackeray Live: ठाकरे सरकारने वर्षभर विधानसभा अध्यक्षांची निवड केली नाही, शिंदेगटाचा कोर्टात युक्तीवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 13:23 IST

Eknath Shinde vs Uddhav Thackeray: आजच्या सुप्रीम सुनावणीवरच शिंदे-फडणवीस सरकारचे भवितव्य ठरणार आहे. 

मुंबई - महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर सर्वोच्च न्यायालयात ५ वेगवेगळ्या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. यात प्रामुख्याने शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार आहे. या निकालाकडे राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे. तर, राज्य मंत्रिमंडळाचा विस्तारही याच निर्णयामुळे लांबल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे, आजच्या सुप्रीम सुनावणीवरच शिंदे-फडणवीस सरकारचे भवितव्य ठरणार आहे. 

विधानसभेच्या उपाध्यक्षांनी आमदारांना अपात्रतेची नोटीस पाठवली आणि उत्तर देण्यासाठी ४८ तासांची मुदत दिली. त्याविरोधात शिंदे गट सुप्रीम कोर्टात गेला आहे. त्यानंतर कोर्टाने ११ जुलैपर्यंत ही सुनावणी पुढे ढकलली होती. मात्र दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर हे प्रकरण घटनापीठाकडे देण्यात यावं असं मत मागील सुनावणीत सुप्रीम कोर्टाने मांडले होते.

- आजच्या सुनावणीत सुप्रीम कोर्ट ५ किंवा त्याहून जास्त न्यायाधीशांचे घटनापीठ स्थापन करू शकतं असं ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी म्हटलं. 

- न्यायालयात न्या. रमण्णा यांच्यासमोर सुनावणीला सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरे गटाकडून अभिषेक मनु संंघवी, राजू धवन, कपिल सिब्बल हे वकील युक्तीवाद करत आहेत. 

- तुुम्ही शिवसेना पक्ष हा तुमचा असल्याचा दावा करु शकत नाहीत. गुवाहटीत बसून तुम्हाला शिवसेना पक्ष ठरवता येणार नाही. निवडणूक आयोग पक्ष ठरवत असते, असा युक्तीवाद कपिल सिब्बल यांनी केला आहे.

- राज्यघटनेतील 10 व्या सूचीनुसार कपिल सिब्बल यांचा युक्तीवाद होत आहे. बहुमत असल्याचा शिंदे गटाचा दावा आहे, पण कोणत्याही प्रकारची फूट ही 10 व्या सूचीचं उल्लंघन असल्याचं सिब्बल यांनी म्हटलं आहे.

- अधिवेशन, सरकार स्थापनेची प्रक्रिया अवैध तर सरकारने घेतलेले सर्व निर्णयही अवैध असल्याचेही सिब्बल यांनी म्हटलं आहे.

- बंडखोरांना इतर कुठल्यातरी पक्षात विलिन व्हावं लागेल, 10 व्या सूचीनुसार हाच पर्याय बंडखोर गटाला असल्याचं अभिषेक मनु सिंघवी यांनी म्हटलं आहे.

शिंदे गटाकडून हरिश साळवे यांचा युक्तीवाद

- मुख्यमंत्री भेटत नसतील तर नेता बदलण्याचा अधिकार आहे, नेता म्हणजे राजकीय पक्ष असाच आपल्या देशात समज - हरिश साळवे

- बंडखोर हे पक्षातच आहेत, बंडखोर म्हणजे वेगळी मतं असलेले पक्षातील नेते - साळवे

- पक्षात फूट पडली असेल तर पक्षांतरबंदी कायदा लागू होत नाही, पक्ष सोडला असेल तरच पक्षांतरबंदी कायदा लागू होतो - साळवे

- निवडणूक आयोगापुढील प्रकरण आणि कोर्टातील याचिकांचा परस्पर संबंध नाही - साळवे

- बंडखोर आमदारांच्या सुरक्षेचा प्रश्न असल्याने आम्ही उच्च न्यायालयात न जाता थेट सुप्रीम कोर्टात आलो - नीरज कौल

- शिंदे गटाचे वकील जो युक्तीवाद होत आहे, त्यातून अर्थबोध होत नाही. त्यामुळे, न्यायाधीशांनी साळवे यांना लिखित स्वरुपात उद्या युक्तीवाद दिला तरी चालेल, असे म्हटले. मात्र, आम्ही आजच लिखित युक्तीवाद देऊ, असे साळवे यांनी सांगितले.

- ठाकरे सरकारने वर्षभरात विधानसभा अध्यक्ष निवडला नव्हता, नवीन सरकारने तात्काळ अध्यक्ष निवडीची प्रक्रिया केली- महेश जेठमलानी

- आजची सुनावणी संपली, महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आता उद्या म्हणजे 4 ऑगस्ट रोजी प्राधान्याने सुनावणीला सुरुवात होणार 

 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाSupreme Courtसर्वोच्च न्यायालय