शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
2
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
3
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
4
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
5
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
6
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
7
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
8
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
9
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
10
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
11
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
12
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
13
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
14
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
15
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
16
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
17
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
18
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
19
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
20
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो

Maharashtra Political Crisis: “बिलकूल!! बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांचंच सरकार”; एकनाथ शिंदेंनी स्वतः दिले स्पष्ट संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 17:53 IST

Maharashtra Political Crisis: आम्ही बंडखोर नाही. आम्हीच शिवसेना असून, बहुमत चाचणीनंतर एक बैठक घेऊन पुढील रणनीति ठरवू, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

गुवाहाटी: शिवसेनेचे बडे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ३५ हून अधिक आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर आठवडाभरापासून राज्यातील राजकीय संघर्ष पराकोटीला पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे. यातच आता सर्व बंडखोर आमदारांनी गुवाहाटी सोडले असून, आता ते गोव्याच्या दिशेने रवाना झाले आहेत. गोवा मार्गे सर्व बंडखोर आमदार मुंबईत येणार आहे. गोव्याला रवाना होण्यापूर्वी बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांचेच सरकार महाराष्ट्रात स्थापन होईल, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. 

आठवडाभराच्या सत्तानाट्यानंतर वेट अँड वॉचच्या भूमिकेत असलेल्या भाजपने मंगळवारी रात्री राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवनावर भेट घेऊन बहुमत चाचणी घेण्यासंदर्भात पत्र दिले. यानंतर राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारला निर्देश देत विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. यानंतर सर्व बंडखोर आमदारांनी गुवाहाटी सोडून गोव्याला येण्याचा निर्णय घेतला.

बिलकूल!! बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांचेच सरकार

गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये आम्हा सर्वांना चांगले सहकार्य मिळाले. उद्या (गुरुवारी) आम्ही सर्वजण मुंबईत येणार आहोत. महाविकास आघाडीच्या विश्वासदर्शक ठरावात आम्ही सहभागी होणार आहोत. विश्वासदर्शक ठरावानंतर आमच्या विधिमंडळ गटाची एक बैठक होणार आहे. त्यामध्ये पुढील रणनीति ठरवण्यात येणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच आम्ही अजूनही शिवसेनेतच आहोत. आम्ही बंडखोर नाही, तर वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत. बाळासाहेब ठाकरे यांचा विचार पुढे घेऊन जात आहोत आणि महाराष्ट्रातही बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांचेच सरकार स्थानप होईल, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. गुवाहाटी विमानतळावर बंडखोर आमदारांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, एकनाथ शिंदे साहेब आप आगे बढो, हम आपके साथ हैं, अशी घोषणाबाजीही केल्याचे सांगितले जात आहे.  

दरम्यान, एकनाथ शिंदे यांचा गट भाजपसोबतच जाऊन सरकार स्थापन करणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तसे संकतेही एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. एकंदरीत ज्या पद्धतीने गेल्या आठवडाभरापासून घडामोडी घडत आहेत, त्या पाहता पडद्यामागून भाजपच या बंडखोरांना पाठिंबा देत असल्याची चर्चा सुरू आहे. सुरुवातीला सूरत आणि नंतर गुवाहाटीत बंडखोर आमदार गेले. दोन्हीकडे भाजपचीच सत्ता असून, आता गोव्यातही भाजपचेच सरकार आहे. तसेच गेल्या अनेक महिन्यापासून भाजपही हिंदुत्वाच्याच विचारांवरून उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टीका करताना पाहायला मिळत आहे. याशिवाय, शिंदे गटानेही शिवसेना आणि भाजप युतीचे सरकार स्थापन करण्याचा आग्रह धरला आहे. त्यामुळे बहुमत चाचणीत महाविकास आघाडी अपयशी ठरल्यास भाजपच्या पाठिंब्यावर किंवा शिंदे गटाची शिवसेना आणि भाजप युतीचे सरकार स्थापन होऊ शकते, असे सांगितले जात आहे. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळShiv Senaशिवसेनाguwahati-pcगौहती