शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

चीनला मात द्यायची असल्यास त्यांच्या वस्तूंवर बहिष्कार घाला, बाबा रामदेव यांचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2020 3:44 PM

शस्त्रापेक्षा चीनला पराभूत करण्यासाठी त्याच्या वस्तूंवर बहिष्कार टाकला पाहिजे, असं रामदेव बाबा म्हणाले आहे.

नवी दिल्लीः सामाजिक, आर्थिक आणि राजकीय स्तरावर चीनचा बहिष्कार केला पाहिजे. आपली सेना देशाच्या सीमांचे रक्षण करण्यास पूर्णपणे सक्षम आहे. शस्त्रापेक्षा चीनला पराभूत करण्यासाठी त्याच्या वस्तूंवर बहिष्कार टाकला पाहिजे, असं बाबा रामदेव म्हणाले आहे. आज तकच्या ई-अजेंटा सुरक्षा सभा या कार्यक्रमात ते बोलत होते. कारण चीन आपल्या देशांत 15 ते 20 लाख कोटींचा व्यवसाय करतो. टॉयलेट सीटपासून खेळण्यांपर्यंत चीनची उत्पादनं आपल्याकडे आयात केली जातात, असंही बाबा रामदेवांनी सांगितलं आहे. चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्यासाठी मोठे ठराव करावे लागतील. मी गेल्या तीन दशकांत कोणतेही चिनी उत्पादन वापरलेले नाही. जर चीनला धडा शिकवायचा असेल तर प्रत्येक भारतीयानं चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचा संकल्प केला पाहिजे. चीनला धडा शिकवण्याचा हा उत्तम मार्ग आहे, असंही बाबा रामदेव यांनी सांगितलं आहे. जवाहरलाल नेहरूंच्या काळापासून भारत-चिनी भाऊ-भाऊचा नारा दिला जात असून, चीन आपल्याला लुटत आहे. अशा परिस्थितीत केवळ चिनी उत्पादनांवर बहिष्कारच नाही, तर त्याच्याविरोधात द्वेषाचे वातावरण देखील निर्माण करावे लागेल.चीनमधून आयात आणि निर्यातीच्या प्रश्नावर बाबा रामदेव म्हणाले की, चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याबरोबरच आपण देशी वस्तूंसाठीही धोरण तयार केले पाहिजे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे घटनात्मक आणि आंतरराष्ट्रीय करारांशी बांधील आहेत. पंतप्रधानांनी राजकीयदृष्ट्या काय केले पाहिजे ते करत आहेत. पण भारताला चीनचा पर्याय बनवण्यासाठी देशात इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, खेळणी यांच्या उत्पादनाचे केंद्र बनवावे लागेल. पतंजली देशात मोठी कंपनी तयार करण्यात आली असून, वेगवेगळी उत्पादने बनवते. देशात इतरही अनेक कंपन्या आहेत, ज्यांना यापूर्वी स्वत: ला स्वदेशी म्हणायला लाज वाटत होती. हे सर्व लोक आज अभिमानाने स्वदेशी म्हणत आहेत. चीनसमोर उभे राहण्यासाठी, संपूर्ण कृती योजना तयार करावी लागेल आणि त्या समान सामग्री तयार करावी लागेल.बाबा रामदेव यांनी सरकारला तीन सूचना दिल्या१. बाबा रामदेव म्हणाले की, चीनविरुद्ध उभे राहण्यासाठी सरकारने विशेष आर्थिक विभाग तयार करावा किंवा देशातील कुठल्याही कंपनीला चीनचा पर्याय म्हणून वस्तू बनवायच्या असतील तर सरकारने त्यास सूट दिली पाहिजे.२. बाबा रामदेव यांनी सरकारला आणखी एक सूचना दिली की, चीनमधून येणा-या सर्व उत्पादनांवर करात प्रचंड वाढ केली पाहिजे, जेणेकरून लोक तिथून सामान आणण्याबद्दल बर्‍याचदा विचार करतील.३. बाबा रामदेव म्हणाले की, सर्व सरकारी यंत्रणेने संयुक्तपणे असे वातावरण तयार केले पाहिजे की भारतातील लोक जास्तीत जास्त स्वदेशी उत्पादने बनवू शकतील आणि लोक ते वापरू शकतील. जपान, दक्षिण कोरियासह बर्‍याच देशांमध्ये या प्रकारचे वातावरण तयार झाले आहे.

हेही वाचा

गर्भवती हत्तिणीच्या मृत्यूप्रकरणी केलेल्या विधानावरून मनेका गांधींविरोधात FIR दाखल

Coronavirus : भीषण वास्तव! लॉकडाऊनमुळे गमावली नोकरी, पदवीधर असूनही तरुणांना करावी लागतेय मजुरी

पंतप्रधानांना हटवलं पाहिजे, असं मी कधी म्हणाले का?, ममतांचा भाजपावर पलटवार

...तर भारताला मर्यादित युद्ध लढावेच लागेल, राहुल गांधींनी शेअर केला 'पनाग'चा लेख 

टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबा