शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

आमच्याही काळात झाले होते सर्जिकल स्ट्राइक, काँग्रेसचा दावा  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2019 3:51 PM

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय सुरक्षा हा मोठा मुद्दा ठरला आहे. दरम्यान, आमच्याही काळात सर्जिकल झाल्या होत्या, असा दावा काँग्रेसने केला आहे.

नवी दिल्ली - यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय सुरक्षा हा मोठा मुद्दा ठरला आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाकडूनसर्जिकल स्ट्राइक आणि एअर स्ट्राइकचा वारंवार उल्लेख केला जात आहे. तर सैन्य दलांच्या पराक्रमावरून सुरू असलेल्या राजकारणावरून विरोधक मोदी आणि भाजपावर टीका करत आहेत. दरम्यान, आमच्याही काळात सर्जिकल झाल्या होत्या, असा दावा काँग्रेसने केला आहे. तसेच आपल्या सरकारच्या काळात झालेल्या सर्जिकल स्ट्राइकची यादीच काँग्रेसकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी काल दिलेल्या एका मुलाखतीत अनेक प्रश्नांवर भाष्य करताना सर्जिकल स्ट्राइकचाही उल्लेख केला होता. ''आमच्या सरकारच्या कार्यकाळात अनेकदा सर्जिकल स्ट्राइक झाल्या.  या कारवाया संरक्षण आणि देशविरोधी शक्तींना प्रत्युत्तर देण्यासाठी करण्यात आल्या होत्या. निवडणुकीत मत मिळवण्यासाठी करण्यात आल्या नव्हत्या,'' असा टोला मनमोहन सिंग यांनी या मुलाखतीतून भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला होता. त्यानंतर आज काँग्रेसकडून आपल्या सरकारच्या काळात झालेल्या सर्जिकल स्ट्राइकची यादी प्रसिद्ध करण्यात आली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजीव शुक्ला यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात झालेल्या सर्जिकल स्ट्राइकची यादी वाचवून दाखवली. या यादीत एकूण सहा सर्जिकल स्ट्राइकचा उल्लेख करण्यात आला आहे. या यादीतील सर्जिकल स्ट्राइक पुढील प्रमाणे आहेत. 19 जून 2008 - भटकल पुंज, पुंछ30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2011 - शारदा सेक्टर, केलमधील नीलम नदीच्या खोऱ्यात6 जानेवारी 2013 - सावन पत्र चेकपोस्ट 27 आणि 28 जुलै 2013 - नाजपीर सेक्टर 6 ऑगस्ट 2013 - नीलम खोरे 14 जानेवारी 2014  - तत्कालीन लष्करप्रमुख विक्रम सिंह यांनी 23 डिसेंबर 2013 रोजी झालेल्या एका सर्जिकल स्ट्राइकचा उल्लेख केला होता.तसेच अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात झालेल्या सर्जिकल स्ट्राइकचा उल्लेखही काँग्रेसकडून करण्यात आला. यात 21 जानेवारी 2000 रोजी नदाला एन्क्लेव्ह आणि 18 सप्टेंबर 2003 रोजी बरोह सेक्टर येथे झालेल्या सर्जिकल स्ट्राइकचा उल्लेख करण्यात आला.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेसsurgical strikeसर्जिकल स्ट्राइकManmohan Singhमनमोहन सिंगNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाIndian Armyभारतीय जवान