शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

वळवाने मोडले कंबरडे भात भुईसपाट तर भुईमुगाला मोड साळाशे हेक्टरवरील काढणी खोळंबली भात, सूर्यफूल, भुईमुगाचे ३० टक्के उत्पन्न घटणार

By admin | Updated: May 9, 2014 18:10 IST

राजाराम लोंढे/कोल्हापूर : गेले आठ दिवस रोज झोडपून काढत असलेल्या वळवाच्यापावसाने शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले आहे. उन्हाळी भात, सूर्यफूल, भुईमूग पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, सोळाशे हेक्टरमधील पिकांची काढणी खोळंबली आहे. धुवाधार पावसाने काढणीला आलेले भात भुईसपाट झाले आहे, तर ढगाळ हवामान व पावसामुळे सूर्यफूल, भुईमुगाचे उत्पन्न ३० टक्के घटणार असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

राजाराम लोंढे/कोल्हापूर : गेले आठ दिवस रोज झोडपून काढत असलेल्या वळवाच्यापावसाने शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले आहे. उन्हाळी भात, सूर्यफूल, भुईमूग पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, सोळाशे हेक्टरमधील पिकांची काढणी खोळंबली आहे. धुवाधार पावसाने काढणीला आलेले भात भुईसपाट झाले आहे, तर ढगाळ हवामान व पावसामुळे सूर्यफूल, भुईमुगाचे उत्पन्न ३० टक्के घटणार असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वळवाने फारच लवकर हजेरी लावल्याने शेतकर्‍यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. गेल्यावर्षी २५ मेला पहिला वळीव पाऊस झाला होता. यावेळी एप्रिलमध्येच वळवाने हजेरी लावून त्यानंतर सातत्य ठेवल्याने शेतकर्‍यांची पंचाईत झाली आहे. गेल्यावर्षीच्या हवामानाच्या अंदाजानुसार शेतकर्‍याने उन्हाळी भात, सूर्यफूल व भुईमुगाची पेरणी केली होती. हातकणंगले व शिरोळ तालुका वगळता जिल्‘ात कमी-जास्त प्रमाणात उन्हाळी भात, सूर्यफूल, मका व भुईमूग घेतले जाते.
जानेवारी महिन्यात पेरणी झालेली पिके काढणीस आलेली आहेत. तर फेबु्रवारीमध्ये पेरलेले सूर्यफूल परिपक्वतेत आहे. गेले आठ-दहा दिवस असलेल्या ढगाळ हवामानामुळे परागीकरणाची गती काहीसी मंदावली आहे. परिणामी सूर्यफूल भरण्याची प्रक्रियाही कमी झाली आहे. काढणीस आलेल्या सूर्यफुलांचेही पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भुईमुगाच्या जाळीभोवती पाणी तुंबल्याने शेंगांना मोड येण्याचा धोका अधिक आहे. सध्या भुईमुगाची काढणी सुरू झाली आहे. आणखी आठ दिवसांत काढणीस गती येणार असून, असाच पाऊस राहिला, तर भुईमूग पिकाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. सर्वच तालुक्यांत साधारणत: उन्हाळी भात हे नदीकाठच्या जमिनीत घेतले जाते. अगोदर पेरणी झालेल्या भाताच्या कापण्या सुरू झाल्या आहेत. रोज वळीव झोडपत असल्याने भाताची मळणी करताना शेतकर्‍यांची दमछाक होत आहे. काढणीनंतर भिजलेले भात उन्हात घालायचे म्हटले, तर दिवसभर ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे भाताबरोबर पिंजरही खराब होऊ लागले आहे. तर वळवाच्या जोरदार तडाक्याने काढणीस आलेले भात अक्षरश: भुईसपाट झाले आहे. भातावर पाणी साचल्याने भात कापायचे कसे? असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे.
वळवाचा रोज तडाका असल्याने साळाशे हेक्टरमधील काढणी खोळंबली आहे. त्याचबरोबर खरीप पेरणीच्या मशागतीची कामेही ठप्प झाली आहेत. त्याचा परिणाम संपूर्ण शेतीच्या कामकाजावर झालेला आहे.
चौकटी-
उसाला पोषक, भाजीपाल्याला मारक
वीजेच्या भारनियमनामुळे एप्रिल-मे महिन्यांत उसाला पाण्याचा फेरा वेळेत बसत नाही. परिणामी उसाची उंची खुंटते, हा पाऊस उसाला पोषक ठरत आहे. धुवाधार पावसाने शेतकर्‍यांचे एक-दोन पाणी देणे वाचले आहे. पण काढणीस आलेल्या पिकांसह भाजीपाल्याला हा पाऊस मारक ठरत आहे.
दुष्काळात तेरावा महिना!
यंदा बनावट सूर्यफूल बियाण्याने शेतकरी हैराण आहे. फुले अर्धवट भरल्याने उत्पन्नात घट येणार आहे. जी अर्धवट आहेत, ती काढणीसाठी आली असताना रोजच्या पावसाने त्याचीही नासाडी होऊ लागल्याने सूर्यफूल उत्पादक शेतकर्‍यांच्या दृष्टीने हे संकट म्हणजे दुष्काळात तेरावा महिना असेच म्हणावे लागेल.
हंगाम लांबल्याचा फटका
साखर कारखान्यांचा हंगाम यंदा तब्बल एक महिन्याने पुढे गेला. परिणाम जानेवारीमधील पेरण्या फेबु्रवारीअखेरपर्यंत चालल्या. ही पिके मे महिन्याच्या अखेरीस काढणीस येणार आहेत. वळवाची अशीच चाल राहिली तर या पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता शेतकर्‍यांमधून व्यक्त होत आहे.
उन्हाळी पिकांचे क्षेत्र हेक्टरमध्ये असे -
सूर्यफूल - ६४४
भुईमूग - ७३०
भात - ३१७
मका - २१७
ज्वारी - ७५
------------------------------------------
कोट -
वळीव पावसाने अगोदर पेरणी झालेल्या सूर्यफूल, भुईमूग, भात पिकांचे नुकसान होत आहे. असाच पाऊस आणखी आठ-दहा दिवस राहिला, तर शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
- सुरेश मगदूम (कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद)
गेले आठ दिवस पाऊस दमवत आहे. रोज झोडपून काढत असल्याने हातातोंडाला आलेली पिके काढायची की तशीच शिवारात ठेवायची, असा प्रश्न शेतकर्‍यांसमोर आहे. या पावसाने भातासह सर्वच पिकांच्या उत्पन्नात किमान ३० टक्के घट होणार आहे.
- बाबूराव बापू खाडे (शेतकरी, सांगरुळ)