शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
2
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
3
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
“इतर पक्ष कसे चालावे हेही देवाभाऊ ठरवतात, सर्वांचे राजकीय गुरू”; भाजपा नेत्यांनी केले कौतुक
5
बाबासाहेबांचा मूलमंत्र आजही मार्गदर्शक; ‘भीम ज्योत’चे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
6
भारतात अनेकदा आले, पण पुतिन पाकमध्ये एकदाही का गेले नाहीत?; जाणकारांनी केला मोठा खुलासा
7
मंदिराने ठेवलेली एफडी बँकांना हडपायची होती, सर्वोच्च न्यायालय म्हणाले, ती देवाची संपत्ती...
8
नाताळ, थर्टीफर्स्टपर्यंत तरी इंडिगोची सेवा सुरु होणार का? CEO पीटर एल्बर्स म्हणाले, 'या' तारखेपर्यंत सेवा पूर्ववत होईल
9
सिगारेट, पान मसाला महागणार! तो पैसा देशाच्या सुरक्षेसाठी, कारगिल सारख्या संकटात वापरला जाणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
10
पुतिन यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्टेट डिनरचे आयोजन; राहुल-खरगे नाही, थरुरांना निमंत्रण
11
'वैभव'शाही वर्ष! १४ वर्षांच्या पोरानं MS धोनी-विराटला मागे टाकत सेट केला आपला ट्रेंड
12
"इम्रान खान 'वेडा', त्याची विधाने देशाविरोधी अन् चिथावणीखोर"; पाकिस्तान आर्मीचा मोठा दावा
13
Vladimir Putin India Visit : नाकावर टिच्चून! "भारताला इंधन पुरवठा सुरूच राहणार", पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं; PM मोदींचीही रशियासाठी मोठी घोषणा
14
IND vs SA वनडेआधी मोठी दुर्घटना टळली, फॅन्सच्या गर्दीमुळे होती चेंगराचेंगरीची भीती (VIDEO)
15
पुतिन यांचा दौरा सुफल, भारत अन् रशियात ७ मोठे अन् महत्त्वाचे करार; पंतप्रधान मोदी म्हणाले...
16
Indigo Crisis: भावाचा मृत्यू, मृतदेह कोलकात्यात; कुटुंबीय विमान रद्द झाल्याने मुंबईत अडकले...
17
“मशिदीला आक्षेप नाही, धार्मिक कारणांसाठी मंदिरे तोडली नाहीत”; शंकराचार्य नेमके काय म्हणाले?
18
एका व्यक्तीने स्वत:ची 'पावर' वापरून इंडिगोला १०० विमाने मिळवून दिलेली; एक वाद अन् आज तोच सोबत नाही...
19
Viral Video : 'क्या खूब लगती हो...'; गाण्यावर रील बनवताना घसरून धपकन पडली महिला, व्हिडीओ बघून लोक म्हणाले-
20
उर्मिला मातोंडकरसोबत जास्त सिनेमे, दोघांचं होतं अफेअर? राम गोपाल वर्मांनी सोडलं मौन; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 09:57 IST

India US Trade War: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या ५० टक्के टॅरिफची अंमलबजावणी बुधवारपासून सुरू झाली आहे. त्यामुळे भारतामधून अमेरिकेला होणाऱ्या निर्यातीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या ५० टक्के टॅरिफची अंमलबजावणी बुधवारपासून सुरू झाली आहे. त्यामुळे भारतामधून अमेरिकेला होणाऱ्या निर्यातीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. यादरम्यान, भारत आणि अमेरिकेमधील व्यापाराबाबतच्या चर्चा अद्याप थांबलेली नाही, असे संकेत सरकारी सूत्रांकडून मिळाले आहेत. तसेच दोन्ही देशांमधील चर्चेचे दरवाजे अद्याप खुले आहेत, असे सांगितले जात आहे.

सूत्रांनी सांगितले की, दोन्ही देशांकडून व्यापार कराराबाबत सकारात्मक संकेत मिळत आहेत. तसेच त्यावर पुढे काम करण्याची गरज आहे. मात्र टॅरिफमुळे दोन्ही देशांमधील व्यापार संकटात आहे. मात्र या टॅरिफचा भारतावर जेवढा प्रभाव पडेल असं बोललं जात होतं तेवढा प्रभाव पडलेला नाही.

सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जागतिक व्यापारामधील भारताची निर्यात ही केवळ अमेरिकेवर अवलंबून नाही आहे. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. तसेच मोठं संकट निर्माण होण्याची शक्यताही कमी आहे. कुठल्याही प्रकारच्या व्यापारी संकटाचे कुठलेही संकेत मिळालेले नाहीत. दरम्यान, टॅरिफ लागू झाल्यानंतरही भारत आणि अमेरिकेमधील चर्चा थांबलेली नाही. भारताने यापूर्वीही जागतिक अर्थव्यवस्थेत मिळालेले अनेक धक्के पचवले आहेत. त्यामुळे या टॅरिफच्या संकटाचा सामना करण्यासाठी भारत सज्ज आहे.

दरम्यान, या अनपेक्षित आव्हानाचं संधीत रूपांतर करून दीर्घकाळासाठी भारताच्या निर्यात व्यापाराला अधिक भक्कम करण्याचा भारताचा प्रयत्न आहे. म्हणजेच अमेरिकेच्या टॅरिफमुळे भारताच्या निर्यात क्षेत्राला धक्का बसला आहे. मात्र त्याला नव्या दिशेमध्ये नेण्यासाठी काही निर्णायक पावलेही उचलली जात आहेत.

सरकारी सूत्रांनी सांगितले की, या परिस्थितीचा सामना करण्यासाठी एक चांगलं आणि संतुलित धोरण बनणं आवश्यक आहे. तसेच सध्या या टॅरिफ संकटावर भारत आणि अमेरिका असं दोघांचंही दीर्घकालीन नुकसान होणार नाही, तोडगा काढण्यावर भारताने लक्ष्य केंद्रित केलं आहे. दरम्यान, ५० टक्के टॅरिफ लागू झाल्याने भारताची अमेरिकेला होणारी निर्यात तब्बल ७० टक्क्यांनी म्हणजेच ५५ अब्ज डॉलरने कमी होण्याची शक्यता आहे. तसेच तिचा अनेक सेक्टरमध्ये प्रभाव पडू शकतो, असेही सांगितले जात आहे.  

टॅग्स :IndiaभारतUnited StatesअमेरिकाTrade Tariff Warटॅरिफ युद्ध