शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
3
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
4
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
5
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
6
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
7
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
10
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
11
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
12
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
13
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
14
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
15
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
16
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
17
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
18
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
19
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
20
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण

टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 05:51 IST

India US Trade War: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या ५० टक्के टॅरिफची अंमलबजावणी बुधवारपासून सुरू झाली आहे. त्यामुळे भारतामधून अमेरिकेला होणाऱ्या निर्यातीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या ५० टक्के टॅरिफची अंमलबजावणी बुधवारपासून सुरू झाली आहे. त्यामुळे भारतामधून अमेरिकेला होणाऱ्या निर्यातीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. यादरम्यान, भारत आणि अमेरिकेमधील व्यापाराबाबतच्या चर्चा अद्याप थांबलेली नाही, असे संकेत सरकारी सूत्रांकडून मिळाले आहेत. तसेच दोन्ही देशांमधील चर्चेचे दरवाजे अद्याप खुले आहेत, असे सांगितले जात आहे.

सूत्रांनी सांगितले की, दोन्ही देशांकडून व्यापार कराराबाबत सकारात्मक संकेत मिळत आहेत. तसेच त्यावर पुढे काम करण्याची गरज आहे. मात्र टॅरिफमुळे दोन्ही देशांमधील व्यापार संकटात आहे. मात्र या टॅरिफचा भारतावर जेवढा प्रभाव पडेल असं बोललं जात होतं तेवढा प्रभाव पडलेला नाही.

सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जागतिक व्यापारामधील भारताची निर्यात ही केवळ अमेरिकेवर अवलंबून नाही आहे. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. तसेच मोठं संकट निर्माण होण्याची शक्यताही कमी आहे. कुठल्याही प्रकारच्या व्यापारी संकटाचे कुठलेही संकेत मिळालेले नाहीत. दरम्यान, टॅरिफ लागू झाल्यानंतरही भारत आणि अमेरिकेमधील चर्चा थांबलेली नाही. भारताने यापूर्वीही जागतिक अर्थव्यवस्थेत मिळालेले अनेक धक्के पचवले आहेत. त्यामुळे या टॅरिफच्या संकटाचा सामना करण्यासाठी भारत सज्ज आहे.

दरम्यान, या अनपेक्षित आव्हानाचं संधीत रूपांतर करून दीर्घकाळासाठी भारताच्या निर्यात व्यापाराला अधिक भक्कम करण्याचा भारताचा प्रयत्न आहे. म्हणजेच अमेरिकेच्या टॅरिफमुळे भारताच्या निर्यात क्षेत्राला धक्का बसला आहे. मात्र त्याला नव्या दिशेमध्ये नेण्यासाठी काही निर्णायक पावलेही उचलली जात आहेत.

सरकारी सूत्रांनी सांगितले की, या परिस्थितीचा सामना करण्यासाठी एक चांगलं आणि संतुलित धोरण बनणं आवश्यक आहे. तसेच सध्या या टॅरिफ संकटावर भारत आणि अमेरिका असं दोघांचंही दीर्घकालीन नुकसान होणार नाही, तोडगा काढण्यावर भारताने लक्ष्य केंद्रित केलं आहे. दरम्यान, ५० टक्के टॅरिफ लागू झाल्याने भारताची अमेरिकेला होणारी निर्यात तब्बल ७० टक्क्यांनी म्हणजेच ५५ अब्ज डॉलरने कमी होण्याची शक्यता आहे. तसेच तिचा अनेक सेक्टरमध्ये प्रभाव पडू शकतो, असेही सांगितले जात आहे.  

टॅग्स :IndiaभारतUnited StatesअमेरिकाTrade Tariff Warटॅरिफ युद्ध