शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

केवळ सिनेकलावंतांच्या मागे हात धुऊन लागू नका; गृह मंत्रालयाचे एनसीबीला आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2020 3:01 AM

NCP Bollywood Drugs News: अमली पदार्थांचे तस्कर, विक्रेत्यांवर कारवाई करण्याच्या सूचना

हरीश गुप्ता नवी दिल्ली : अमली पदार्थांचे व्यसन करणाऱ्या चित्रपट अभिनेत्यांपेक्षा त्या पदार्थांचे विक्रेते व संघटित टोळीवर कारवाई करण्याकडे अधिक लक्ष द्यावे, असा आदेश केंद्र सरकारने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला (एनसीबी) दिला आहे. त्यामुळे या प्रकरणात चित्रपट कलाकारांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमधील ड्रग्ज प्रकरण समोर आले होते. आणखी काही बड्या कलाकारांना एनसीबी चौकशीस बोलाविणार असल्याचे वृत्त वृत्तवाहिन्यांवर झळकले होते. त्याचा एनसीबीने इन्कार न केल्याने कलाकारांमध्ये काहीसे घबराटीचे वातावरण होते. अमली पदार्थ प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्ती व सुशांतसिंह राजपूत याचे काही सहकारी यांच्यासह सुमारे १२ लोकांना एनसीबीने अटक केली आहे. ड्रग्ज टोळीचे सदस्य नसलेल्या व केवळ ते सेवन करत असल्याचा संशय असलेल्या कलाकारांना चौकशीच्या निमित्ताने सळो की पळो करून सोडू नये. त्यापेक्षा ड्रग्जची तस्कर, विक्री करणाऱ्यांना जेरबंद करण्यावर अधिक लक्ष द्यावे, असा आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाने एनसीबीला दिला आहे.कोणत्याही राजकीय लाभाची शक्यता नाहीसुशांतसिंहची गळा दाबून हत्या झाली नसल्याचा निर्वाळा एम्समधील डॉक्टर सुधीर गुप्ता यांनी दिला आहे. या अभिनेत्याने आत्महत्याच केली असा निष्कर्ष गुप्ता यांनी अहवालात मांडला आहे. सुशांतच्या बँक व्यवहारांत मनी लाँडरिंगचा संबंध नसल्याचे अंमलबजावणी संचालनालयाला आढळून आले आहे. या प्रकरणामध्ये चित्रपट कलाकारांची चौकशी करून, कारवाई करून त्यातून भाजपला कोणताही राजकीय लाभ होण्याची शक्यता नसल्याचे पक्षातील काही नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना कळविले आहे.

 

टॅग्स :Home Ministryगृह मंत्रालयDrugsअमली पदार्थNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोbollywoodबॉलिवूडBJPभाजपाSushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूत