शहरं
Join us  
Trending Stories
1
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाकडून मिहीर कोटेचांच्या कार्यालयाची तोडफोड; मुंबईत जोरदार राडा
2
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
3
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
4
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
5
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
6
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
7
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
8
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
9
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
10
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
11
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
12
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
13
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
14
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
15
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
16
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
17
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
18
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
19
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
20
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान

EVM वर शंका नको! VVPAT स्लिप मोजणीसह बॅलेट पेपरवर मतदान घेण्याच्या सर्व याचिका फेटाळल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 12:27 PM

EVM मशीनद्वारेच मतदान होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने या महत्त्वपूर्ण निर्णयात स्पष्ट केलं आहे

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडतंय, त्याचवेळी सुप्रीम कोर्टाने VVPAT पडताळणीची मागणी करणाऱ्या सर्व याचिका फेटाळून लावल्या आहेत. त्यात बॅलेट पेपरवर मतदान करण्याचीही मागणीही कोर्टाने नाकारली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे VVPAT स्लिपसह EVM द्वारे १००% मते मोजण्याच्या मागणीला मोठा धक्का बसला आहे. न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने संमतीने हा निर्णय दिला आहे.

EVM मशीनद्वारेच मतदान होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने या महत्त्वपूर्ण निर्णयात स्पष्ट केलं आहे. EVM-VVPAT ची १०० टक्के पडताळणी केली जाणार नाही. VVPAT स्लिप ४५ दिवस सुरक्षित राहील. या स्लिप उमेदवारांच्या स्वाक्षरीने सुरक्षित ठेवल्या जातील. निवडणुकीनंतर चिन्ह लोडिंग युनिट्सही सील करून सुरक्षित ठेवाव्यात, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. तसेच निकाल जाहीर झाल्यानंतर तांत्रिक पथकाकडून ईव्हीएमचा मायक्रोकंट्रोलर प्रोग्राम तपासण्याचा पर्याय उमेदवारांना असेल, जो निवडणूक निकाल घोषणेच्या सात दिवसांच्या आत करता येईल.

तसेच VVPAT पडताळणीचा खर्च हा उमेदवाराला स्वत: उचलावा लागेल. जर कुठल्या स्थितीत EVM मध्ये काही दोष आढळला तर हा खर्च उमेदवाराला परत केला जाईल असं न्या. खन्ना यांनी म्हटलं. तर कोणत्याही व्यवस्थेवर आंधळेपणाने अविश्वास ठेवल्याने संशय निर्माण होतो. लोकशाही म्हणजे विश्वास आणि सुसंवाद राखणे असंही न्या.दीपांकर दत्ता यांनी निकालात सांगितले.

मार्च २०२३ मध्ये असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) ने EVM मते आणि VVPAT स्लिप्स यांची १०० टक्के मोजणी झाली पाहिजे अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. सध्या, VVPAT पडताळणी अंतर्गत लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील फक्त पाच मतदान केंद्रांची EVM मते आणि VVPAT स्लिप जुळतात का ते पाहिले जाते. या महिन्याच्या सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयाने निवडणूकीत निवडलेल्या पाच ईव्हीएमची पडताळणी करण्याऐवजी सर्व ईव्हीएम मतांची आणि व्हीव्हीपीएटी स्लिप्सची मोजणी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर ईसीआयला नोटीस बजावली होती.

आता कुणालाही शंका नसावी - निवडणूक आयोग

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर निवडणूक आयोगाने प्रतिक्रिया दिली आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर कोणालाही शंका नसावी, आता जुने प्रश्न संपले पाहिजे जे प्रश्न मतदारांच्या मनात निर्माण होत आहेत. भविष्यातही निवडणूक सुधारणा सुरू राहतील असं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Supreme Courtसर्वोच्च न्यायालय