शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
2
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
3
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
4
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
5
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
6
विधान परिषदेच्या निवडणुकीची नवी तारीख जाहीर; शिक्षक, पदवीधर मतदारसंघांसाठी या दिवशी मतदान
7
"सांगली जिल्हाप्रमुखाचं विधान उबाठाला मार्ग दाखवणारं, जर..."; संजय शिरसाटांचा निशाणा
8
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
10
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
11
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग
12
कडक उन्हातून घरी आल्यावर किती वेळानंतर पाणी प्यावं?; जाणून घ्या हेल्थ एक्सपर्टचा सल्ला
13
Narendra Modi : "काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले
14
IPL 2024: दिनेश कार्तिक पाठोपाठ टीम इंडियाच्या आणखी एका स्टार खेळाडूचे निवृत्तीचे संकेत
15
Rituals: मंदिरात घंटा का बांधतात? नवस फेडण्यासाठीही घंटेचा वापर का केला जातो ते जाणून घ्या!
16
प्रिटी वुमन! प्रिती झिंटानेही Cannes मध्ये लावली हजेरी, व्हाईट आऊटफिटमध्ये दिसली परी!
17
कोण कोणाला वाचवतेय! बाळाला पोर्शे कारची चावी कोणी दिली? बिल्डर बाप अन् आजोबा दोघेही म्हणतायत 'मी-मी'
18
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
19
अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
20
“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर

रुग्णाच्या मृत्यूला नेहमी डॉक्टरच जबाबदार नसतात; सर्वोच्च न्यायालयाने केले स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 10:51 AM

नवीन कांत यांच्यावर १२ नोव्हेंबर १९९५ रोजी १२ तज्ज्ञांच्या पथकाने किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केली होती. २४ नोव्हेंबर  १९९५ रोजी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.

डॉ. खुशालचंद बाहेती -

नवी दिल्ली : केवळ रुग्णाला वाचवता आले नाही म्हणून, वैद्यकीय निष्काळजीपणासाठी डॉक्टरांना जबाबदार धरता येणार नाही. डॉक्टरांनी वाजवी काळजी घेणे अपेक्षित आहे, परंतु संकटावर मात करून रुग्ण घरी परत येईलच याची खात्री कोणीही व्यावसायिक देऊ शकत नाही, असे मत सुप्रीम कोर्टाने व्यक्त केले आहे.

नवीन कांत यांच्यावर १२ नोव्हेंबर १९९५ रोजी १२ तज्ज्ञांच्या पथकाने किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केली होती. २४ नोव्हेंबर  १९९५ रोजी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. मूत्रपिंड प्रत्यारोपण करणाऱ्या डॉक्टरांना ९००-१००० पेक्षा जास्त मूत्रपिंड प्रत्यारोपणाचा अनुभव होता. मात्र, नवीन कांत यांचे ३ फेब्रुवारी १९९६ रोजी निधन झाले.

त्यांच्या पत्नीने राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगात पतीचा शस्त्रक्रियेनंतरच्या वैद्यकीय निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप  करत उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि हॉस्पिटलवर  सुमारे ९५ लाखांचा दावा दाखल केला. 

कमिशनने ही तक्रार फेटाळून लावताना डॉक्टरांची तज्ज्ञ टीम त्यांच्या दीर्घ आजारानंतर त्याला वाचवू शकली नाही आणि त्यांचा मृत्यू झाला म्हणजे ऑपरेशन नंतरच्या वैद्यकीय निष्काळजीपणाचे प्रकरण मानले जाऊ शकत नाही, असे मत व्यक्त केले. अपिलात सर्वोच्च न्यायालयाने या निष्कर्षाशी सहमती दर्शवत अपील फेटाळले.

- डाॅक्टरांनी एक  उपचाराऐवजी दुसऱ्याला प्राधान्य दिले म्हणून  त्यांना जबाबदार धरले जाऊ शकत नाही.

- वैद्यकशास्त्रामध्ये, उपचाराचे वेगवेगळे मार्ग असू शकतात. यात  मतभेदही असू शकतात. तथापि, उपचार करताना डाॅक्टरांनी त्यांच्या सर्वोत्तम कौशल्याप्रमाणे उपचार केले काय हे महत्त्वाचे आहे. उपचार करण्यासाठी ते सक्षम व पात्र असणे  आवश्यक आहे.

- डॉक्टर फक्त तेव्हाच जबाबदार ठरतील,  जेव्हा त्यांनी क्षमतेचा व त्यांच्याकडे असलेल्या कौशल्याचा वाजवी वापर  केला नसेल. -न्यायमूर्ती, अजय रस्तोगी आणि अभय एस. ओक 

 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयdocterडॉक्टरDeathमृत्यू