शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ३० मे पासून ५ टक्के, तर ५ जून पासून १० टक्के पाणी कपात
2
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
3
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
4
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
5
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
6
हाताला सलाईन, रुग्णालयाच्या बेडवर झोपलेला दिसला मुनव्वर फारूकी, चाहते चिंतेत
7
Hyundai IPO: दिग्गज कार कंपनी आणणार देशातील सर्वात मोठा IPO, लिस्टिंगचा आहे प्लान
8
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
9
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
10
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
11
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
12
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
13
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
14
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
15
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
16
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
18
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
19
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
20
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या

बापरे! कोरोनावरील लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही डॉक्टर पॉझिटिव्ह; आरोग्य विभागात खळबळ 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 3:05 PM

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशात लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली असून अनेकांनी लसीचा डोस घेतला आहे. याच दरम्यान एक चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे.

नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 1,14,74,605 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 35,871 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 172 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,59,216 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे उपाय केले जात आहेत. देशात लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली असून अनेकांनी लसीचा डोस घेतला आहे. याच दरम्यान एक चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. कोरोना लसीचे दोन डोस घेतल्यावरही डॉक्टर पॉझिटिव्ह आल्याची घटना समोर आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, झारखंडच्या पूर्व सिंहभूम जिल्हा मुख्यालयात कार्यरत असलेल्या एका डॉक्टरांनी कोरोनावरील लसीचे दोन डोस घेतले. मात्र त्यानंतरही त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. डॉक्टरांनी कोरोना लसीवरील पहिला डोस हा 19 जानेवारीला घेतला होता. त्यानंतर दुसरा डोस हा 20 फेब्रुवारीला घेतला होता. लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही डॉक्टरांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. 

डॉक्टरांनी घेतलेल्या पहिला आणि दुसऱ्या डोसमध्ये 45 दिवसांचे अंतर नव्हते. यामुळेच त्यांना कोरोना संसर्ग झाला असं सांगण्यात येत आहे. डॉक्टरांची पत्नीही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे. तर जमशेदपूरमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. काही महिन्यांपासून करोना रुग्णसंख्या घटली होती. पण आता गेल्या काही दिवसांपासून जमशेदपूर शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  देशातही कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा विस्फोट झाला असून देशातील रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली असून चिंता वाढवणारी आकडेवारी पुन्हा एकदा समोर आली आहे.

विस्फोट! देशात कोरोना झपाट्याने वाढतोय, गेल्या 24 तासांत 35,871 नवे रुग्ण, 101 दिवसांनी झाली मोठी वाढ

गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 35,871 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 172 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तब्बल 101 दिवसांत ही मोठी वाढ झाली आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या एक कोटीवर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात आतापर्यंत 1,59,216 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. गुरुवारी (18 मार्च) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 35,871 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1,14,74,605 पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा दीड लाखांवर पोहोचला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतdoctorडॉक्टरCorona vaccineकोरोनाची लसJharkhandझारखंड