शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
4
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
5
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
6
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
7
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
8
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
9
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
10
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
11
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
12
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
13
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
14
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
15
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
16
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
17
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
18
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
19
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
20
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल

बापरे! कोरोनावरील लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही डॉक्टर पॉझिटिव्ह; आरोग्य विभागात खळबळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 15:14 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशात लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली असून अनेकांनी लसीचा डोस घेतला आहे. याच दरम्यान एक चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे.

नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 1,14,74,605 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 35,871 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 172 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,59,216 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे उपाय केले जात आहेत. देशात लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली असून अनेकांनी लसीचा डोस घेतला आहे. याच दरम्यान एक चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. कोरोना लसीचे दोन डोस घेतल्यावरही डॉक्टर पॉझिटिव्ह आल्याची घटना समोर आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, झारखंडच्या पूर्व सिंहभूम जिल्हा मुख्यालयात कार्यरत असलेल्या एका डॉक्टरांनी कोरोनावरील लसीचे दोन डोस घेतले. मात्र त्यानंतरही त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. डॉक्टरांनी कोरोना लसीवरील पहिला डोस हा 19 जानेवारीला घेतला होता. त्यानंतर दुसरा डोस हा 20 फेब्रुवारीला घेतला होता. लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही डॉक्टरांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. 

डॉक्टरांनी घेतलेल्या पहिला आणि दुसऱ्या डोसमध्ये 45 दिवसांचे अंतर नव्हते. यामुळेच त्यांना कोरोना संसर्ग झाला असं सांगण्यात येत आहे. डॉक्टरांची पत्नीही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे. तर जमशेदपूरमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. काही महिन्यांपासून करोना रुग्णसंख्या घटली होती. पण आता गेल्या काही दिवसांपासून जमशेदपूर शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  देशातही कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा विस्फोट झाला असून देशातील रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली असून चिंता वाढवणारी आकडेवारी पुन्हा एकदा समोर आली आहे.

विस्फोट! देशात कोरोना झपाट्याने वाढतोय, गेल्या 24 तासांत 35,871 नवे रुग्ण, 101 दिवसांनी झाली मोठी वाढ

गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 35,871 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 172 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तब्बल 101 दिवसांत ही मोठी वाढ झाली आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या एक कोटीवर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात आतापर्यंत 1,59,216 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. गुरुवारी (18 मार्च) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 35,871 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1,14,74,605 पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा दीड लाखांवर पोहोचला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतdoctorडॉक्टरCorona vaccineकोरोनाची लसJharkhandझारखंड