शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

पत्नी मानसिक आजारी असल्याचं आधी सिद्ध करावं लागेल, तरच मिळेल घटस्फोट - न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2024 08:11 IST

Allahabad High Court : याचिकाकर्त्याला आधी पत्नीची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे सिद्ध करावे लागेल, त्यानंतरच त्याला घटस्फोट मिळेल, असे न्यायालयाने सांगितले.

पती-पत्नी आपल्या घटस्फोटासाठी विविध कारणं देत असल्याची अनेक उदाहरणं तुम्ही आतापर्यंत पाहिली असतील. मात्र, असेच एक प्रकरण आता समोर आले आहे. यामध्ये पतीने आपल्या पत्नीसोबत घटस्फोट घेण्यासाठी तिला मानसिक आजार असल्याचे कारण पुढे करत न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला आहे. याचिकाकर्त्याला आधी पत्नीची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे सिद्ध करावे लागेल, त्यानंतरच त्याला घटस्फोट मिळेल, असे न्यायालयाने सांगितले.

सोमवारी अलाहाबाद उच्च न्यायालयात यासंदर्भातील सुनावणी झाली. यावेळी पतीने पत्नीच्या मानसिक आजाराचे कारण देत घटस्फोटासाठी दाखल केलेला अर्ज फेटाळला. न्यायालयाने सांगितले की, याचिकाकर्त्याला हे सिद्ध करावे लागेल की त्याची पत्नी असाध्य मानसिक आजाराने ग्रस्त आहे. यावेळी हा दावा याचिकाकर्ता सिद्ध करू शकला नाही. त्यामुळे अलाहाबाद उच्च न्यायालयाने त्याच्या अर्ज फेटाळला आणि सांगितले की, पतीला आधी पत्नीची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे सिद्ध करावे लागेल, त्यानंतरच घटस्फोट मिळेल.

शिवसागर यांचे २००५ मध्ये लग्न झाले. दोघे पती-पत्नी सुमारे सात वर्षे एकत्र राहत होते. त्यांना दोन मुलीही आहेत. वादामुळे पती-पत्नी गेल्या १२ वर्षांपासून म्हणजेच जानेवारी २०१२ पासून वेगळे राहत होते. पती शिवसागर याने पत्नीला मानसिक आजार आणि क्रूरतेच्या कारणावरून कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. कौटुंबिक न्यायालयाने हा अर्ज फेटाळला. त्यानंतर या आदेशाला अलाहाबाद उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले.

अलाहाबाद उच्च न्यायालयाने सांगितले की, याचिकाकर्त्याला आधी सिद्ध करावे लागेल की त्याची पत्नी असाध्य मानसिक आजाराने ग्रस्त आहे. घटस्फोटासाठी मेंदूचा अपूर्ण विकास किंवा मानसिक अपंगत्व असा आजार असला पाहिजे. याशिवाय, असा मानसिक विकार ज्यामुळे पीडित व्यक्ती असामान्यपणे आक्रमक किंवा गंभीरपणे बेजबाबदारपणे वागते, असे न्यायालयाने म्हटले आहे. 

पुढे न्यायालयाने सांगितले की, याचिकाकर्त्याची पत्नी ही सुशिक्षित आणि सुशिक्षित महिला आहे. तिने ग्रॅज्युएशन पूर्ण केले होते. पती-पत्नी सात वर्षे एकत्र राहिले आहेत. पतीने दाखल केलेल्या अर्जात असे कोणतेही तथ्य किंवा पुरावे दिलेले नाहीत, ज्यामुळे कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशात कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करता येईल, असे म्हणत अलाहाबाद उच्च न्यायालयाने अर्ज फेटाळून लावला आहे. 

टॅग्स :Divorceघटस्फोटHigh Courtउच्च न्यायालयCourtन्यायालय