शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

मोदींनी ज्या जिल्ह्यात लाँच केली PM रोजगार योजना, तिथंच मजुरांना काम मिळेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2020 16:08 IST

पंतप्रधान मोदींच्या श्रमिक कल्याण रोजगार योजनेंतर्गत कामगारांचे शिक्षण आणि कौशल्याधारित काम देण्याचं सांगण्यात आलं.

ठळक मुद्दे पंतप्रधान मोदींच्या श्रमिक कल्याण रोजगार योजनेंतर्गत कामगारांचे शिक्षण आणि कौशल्याधारित काम देण्याचं सांगण्यात आलं.खगडिया जिल्ह्यातील सर्वात कमी विकसित असलेल्या अलौली विभागातील 3 गावांमधून माहिती घेण्यास सुरुवात केली.

पाटणा - देशात गेल्या 3 महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या लॉकडाऊनचा सर्वाधित विपरित परिणाम सर्वसामान्य नागरिक आण मजूर, कामगार वर्गावर झाला. आपल्या रोजगारावर बेकारीची कुऱ्हाड कोसळ्यानंतर मोठ्या शहरांतून, महानगरांतून मजूर आणि कामगार वर्ग आपल्या गावी स्थलांतरीत झाला. आपल्या राज्यात परतलेल्या नागरिकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी बिहारमधील नितीश कुमार सरकारने पुढाकार घेतला. त्यात, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 20 जून रोजी श्रमिक कल्याण रोजगार अभियानाचं उद्घाटनही केलं.  

पंतप्रधान मोदींच्या श्रमिक कल्याण रोजगार योजनेंतर्गत कामगारांचे शिक्षण आणि कौशल्याधारित काम देण्याचं सांगण्यात आलं. कामगारांना 125 दिवसांचे काम देण्याचं या योजनेत नमूद करण्यात आलंय. मात्र, ज्या जिल्ह्यात या योजनेचा मोठ्या थाटामाटात शुभारंभ करण्यात आला. त्याच जिल्ह्यातील कामगारांना अद्यापही रोजगार मिळाला नाही. 

द इंडियन एक्सप्रेसने पंतप्रधान रोजगार अभियानांतर्गत मिळणाऱ्या रोजगारासंदर्भात खगडिया जिल्ह्यातील सर्वात कमी विकसित असलेल्या अलौली विभागातील 3 गावांमधून माहिती घेण्यास सुरुवात केली. हरिपूर, मेघौना आणि सहसी या गावात रोजगार अभियनांतर्गत उपलब्ध झालेल्या रोजगारासंबंधीची माहिती घेण्यास सुरुवात केली. त्यानुसार, हरिपूरमध्ये पावसामुळे काम बंद झाल्याचे दिसून आले, त्यामुळे 100 मजुरांवर बिकट परिस्थिती आली असून 20 मजूर हे स्थलांतरीत आहेत. तर, येथील मनरेगा अधिकारी रामकेबल पंडित पीएम गरिब कल्याण अभियानांतर्गत पुरविण्यात येणाऱ्या रोजागाराची माहिती देण्यात असमर्थ ठरले. 

दुसरीकडे गिद्ध गावातील परिस्थितीही वेगळी नाही, येथे वाड्यांचे काम पूर्ण करण्यात आले. मात्र, या कामातून केवळ 6 जणांना 20 दिवसांचे काम मिळाल्याचं मनरेगाच्या अधिकाऱ्याने सांगितले. तर, मैघौना पंचायत विभागात अद्यापही पीएम रोजगार अभियानांतर्गत रोजगार उपलब्ध झाला नाही. अलौली येथे 21 ग्रामपंचायत क्षेत्र असून त्यापैकी 10 गावातही अद्याप या योजनेतून कामे देण्यात आली नाहीत. अलौली चे विस्तार अधिकारी म्हणाले की, या विभागात केवळ 3 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यामध्ये, 21 सार्वजनिक शौचालय बनविण्यात येणार आहेत. त्याअंतर्गत 30 दिवसांचे काम निर्माण होईल. त्यासाठी 300 रुपये रोजगार देण्यात येणार आहे.  

टॅग्स :prime ministerपंतप्रधानBiharबिहारNitish Kumarनितीश कुमारMigrationस्थलांतरणLabourकामगार