शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

कोलकाता बंदराच्या नामांतरावरून उफाळला वाद; डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींचे नाव देण्यास विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 01:55 IST

केंद्र सरकारच्या योजनांची पश्चिम बंगालमध्ये अंमलबजावणी करण्यास सरकार तयार नाही.

कोलकाता : कोलकाता बंदराला जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे नाव देण्याचा समारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी पार पडला. त्यावरून मोदी हे गेमचेंजरपेक्षा नेमचेंजरच अधिक आहेत, अशी टीका माकपने केली आहे. या नामांतर कार्यक्रमाला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उपस्थित राहिल्या नाहीत.

कोलकाता बंदराच्या १५०व्या वर्धापन दिनी झालेल्या या सोहळ्यात मोदी म्हणाले की, देशामध्ये झपाट्याने औद्योगिकीकरण व्हावे, यासाठी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी भगीरथ प्रयत्न केले होते. एक देश, एक राज्यघटना या तत्त्वासाठी त्यांनी बलिदान केले. त्यामुळेच त्यांचे नाव कोलकाता बंदराला देण्यात आले आहे.

मोदी म्हणाले की, केंद्र सरकारच्या योजनांची पश्चिम बंगालमध्ये अंमलबजावणी करण्यास सरकार तयार नाही. या योजनांच्या लाभापासून पश्चिम बंगालमधील जनता यापुढे फार काळ वंचित राहाणार नाही. पंतप्रधान मोदी हे गेमचेंजरपेक्षा नेमचेंजरच अधिक आहेत, अशी टीका माकपच्या पॉलिट ब्युरोचे सदस्य मोहम्मद सलीम यांनी केली आहे. कोलकाता बंदराचे नाव बदलले असले, तरी बंदराच्या कारभारामध्ये सुधारणा होण्याची शक्यता नाही, असेही मोहम्मद सलीम म्हणाले. कोलकातातील व्हिक्टोरिया मेमोरियल या प्रख्यात इमारतीला झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांचे नाव द्या, अशी मागणी भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीwest bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जी