शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

भक्तिरसांनी सजलेला ‘गोपाला को समर्पण’, भक्तिपर रचलेल्या गाण्यांच्या कार्याचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 01:50 IST

भजनरत्न कवी नारायण अग्रवाल तथा ‘दास नारायण’ लिखित ‘गोपाला को समर्पण’ भजन अल्बमचे प्रकाशन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बॉलीवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या प्रमुख उपस्थितीत ९ आॅगस्ट रोजी दिल्ली येथील पंतप्रधान कार्यालयात करण्यात आले.

भजनरत्न कवी नारायण अग्रवाल तथा ‘दास नारायण’ लिखित ‘गोपाला को समर्पण’ भजन अल्बमचे प्रकाशन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बॉलीवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या प्रमुख उपस्थितीत ९ आॅगस्ट रोजी दिल्ली येथील पंतप्रधान कार्यालयात करण्यात आले. १३ आॅगस्ट रोजी जुहू येथील इस्कॉन मंदिरातही अल्बमचे प्रकाशन करण्यात आले. या सोहळ्याला पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्यासह भूषण लखांडरी, गायक शंकर महादेवन, गायक अनू मलिक, गायक सुरेश वाडकर, विवेक प्रकाश आणि जी. सुरदास उपस्थित होते. याच अल्बम प्रकाशनाच्या निमित्तासह त्यांनी भक्तिपर रचलेल्या गाण्यांच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी, भजनरत्न कवी नारायण अग्रवाल यांच्याशी ‘लोकमत’ने साधलेला खास संवाद वाचकांसाठी.‘गोपाला को समर्पण’ चे वैशिष्ट्य काय आहे?‘गोपाला को समर्पण’ हा भजन अल्बम म्हणजे, केवळ आठ भजनांची सीडी नाही, तर ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांची भगवान श्रीकृष्ण यांच्या प्रति असलेली भक्तिपर श्रद्धा आहे. अल्बमधील गाण्यातून ही भक्तिपर श्रद्धा प्रकट झाली आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, हेमा मालिनी या व्यावसायिक गायिका नाहीत, त्यामुळे ही गोष्ट अधोरेखित करण्यासारखी आहे.‘गोपाला को समर्पण’साठी हेमा मालिनी यांचे सहकार्य लाभले?खासदार असलेल्या हेमा मालिनी या श्रेष्ठ शास्रीय नृत्यांगना आहेत, शिवाय मनुष्य भावनांप्रती त्यांना आदर आहे. त्या संवेदनशील आहेत. संवेदनांना अभिव्यक्त करणारी अभिनेत्री म्हणून त्यांची ओळख आहे. खासदार असतानाच त्या सामाजिक कार्यही करत आहेत. आणि आता त्या श्रीकृष्णाला समर्पित अशा ‘दासी हेमा’देखील झाल्या आहेत.शास्त्रीय गायक आणि संगीतकारांचे सहकार्य लाभले?‘गोपाला को समर्पण’ या अल्बममध्ये भगवान श्रीकृष्ण यांच्या जन्मापासून, राधाराणी विरह आणि द्वारकानाथ प्रवेशापर्यंतच्या भावपूर्ण भजनांचा समावेश आहे. याच भजनांचे लिखाण श्रीकृष्णाच्या कृपेने करण्यात आले आहे. आठ भक्तिपदांची रचना ज्येष्ठ-श्रेष्ठ अशा चार शास्त्रीय गायक आणि संगीतकारांनी केली आहे. यात संगीत मार्तंड पंडित जसराज, पंडित शिवकुमार शर्मा, पंडित हरिप्रसाद चौरसिया, पंडित राजन साजन मिश्रा यांचा समावेश आहे.ज्येष्ठ-श्रेष्ठांच्या सानिध्याबद्दल काय सांगाल?भारत सरकारने ‘भजन रत्न’ असा माझा गौरव केला आहे. उत्साद बिस्मिला खाँ यांनीही भजनांना साथ दिली असून, लता मंगेशकर, पंडित भीमसेन जोशी, पंडित जसराज, किशोरी अमोणकर, अनुप जलोटा, जगजित सिंग यांच्यासारख्या दिग्गजांचीही माझ्या भजनांना साथ लाभली आहे. सरस्वती पुरस्कार, भजन रत्न, कवी श्रेष्ठ, कवी शिरोमणी यासारख्या पुरस्कारांनी मला सन्मानित करण्यात आले असून, ज्येष्ठ अभिनेत अमिताभ बच्चन यांच्या हस्तेही गौरविण्यात आले आहे. प्रबुद्ध भक्ती कला सर्वोच्च सन्मान, राष्ट्रीय महामंडळेश्वर सन्मान यासारख्या पुरस्कारांसह तीन राष्ट्रपतींसह चार पंतप्रधानांच्या हस्तेही मला गौरविण्यात आले आहे.कुटुंबाबद्दल काय सांगाल?अल्लाहाबादमधील एका संस्कृतीच्या आणि आध्यात्मिकरीत्या प्रतिष्ठित कुटुंबात माझा जन्म झाला. वडील सोने आणि चांदीचे व्यापारी होते. दिवंगत पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे आश्वासक मित्र होते. मी संगीत, क्रीडा, चित्रकला, साहित्य, खेळ, सामाजिक सेवा अशा विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे.श्रोत्यांना काय संदेश द्याल?‘पलना झुलै नंदलाल’ आणि ‘नयनो की तुम ज्योत बने हो’ ही दोन पदे हेमा मालिनी यांना अधिक आवडली असून, सर्व भक्तिपद भक्त आणि श्रोत्यांना आवडतील, अशी आशा आहे. पाचशेहून अधिक भजन लिहिले असून, शंभरहून अधिक भजन अल्बमचे प्रकाशन करण्यात आले आहे. दरम्यान, मी ‘बेगर फ्री इंडिया’ ही चळवळ हाती घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट त्यांच्याकडे या चळवळीचे महत्त्व विषद केले आहे. बंजर जमीन म्हणजे पडीक जमीन हाती घेत, त्यावर एखादे ‘टाउन’ वसवित, तिथे पायाभूत सेवा-सुविधा देणे, हा चळवळीचा प्रमुख उद्देश आहे.

टॅग्स :Hema Maliniहेमा मालिनी