शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

भक्तिरसांनी सजलेला ‘गोपाला को समर्पण’, भक्तिपर रचलेल्या गाण्यांच्या कार्याचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 01:50 IST

भजनरत्न कवी नारायण अग्रवाल तथा ‘दास नारायण’ लिखित ‘गोपाला को समर्पण’ भजन अल्बमचे प्रकाशन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बॉलीवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या प्रमुख उपस्थितीत ९ आॅगस्ट रोजी दिल्ली येथील पंतप्रधान कार्यालयात करण्यात आले.

भजनरत्न कवी नारायण अग्रवाल तथा ‘दास नारायण’ लिखित ‘गोपाला को समर्पण’ भजन अल्बमचे प्रकाशन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बॉलीवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या प्रमुख उपस्थितीत ९ आॅगस्ट रोजी दिल्ली येथील पंतप्रधान कार्यालयात करण्यात आले. १३ आॅगस्ट रोजी जुहू येथील इस्कॉन मंदिरातही अल्बमचे प्रकाशन करण्यात आले. या सोहळ्याला पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्यासह भूषण लखांडरी, गायक शंकर महादेवन, गायक अनू मलिक, गायक सुरेश वाडकर, विवेक प्रकाश आणि जी. सुरदास उपस्थित होते. याच अल्बम प्रकाशनाच्या निमित्तासह त्यांनी भक्तिपर रचलेल्या गाण्यांच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी, भजनरत्न कवी नारायण अग्रवाल यांच्याशी ‘लोकमत’ने साधलेला खास संवाद वाचकांसाठी.‘गोपाला को समर्पण’ चे वैशिष्ट्य काय आहे?‘गोपाला को समर्पण’ हा भजन अल्बम म्हणजे, केवळ आठ भजनांची सीडी नाही, तर ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांची भगवान श्रीकृष्ण यांच्या प्रति असलेली भक्तिपर श्रद्धा आहे. अल्बमधील गाण्यातून ही भक्तिपर श्रद्धा प्रकट झाली आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, हेमा मालिनी या व्यावसायिक गायिका नाहीत, त्यामुळे ही गोष्ट अधोरेखित करण्यासारखी आहे.‘गोपाला को समर्पण’साठी हेमा मालिनी यांचे सहकार्य लाभले?खासदार असलेल्या हेमा मालिनी या श्रेष्ठ शास्रीय नृत्यांगना आहेत, शिवाय मनुष्य भावनांप्रती त्यांना आदर आहे. त्या संवेदनशील आहेत. संवेदनांना अभिव्यक्त करणारी अभिनेत्री म्हणून त्यांची ओळख आहे. खासदार असतानाच त्या सामाजिक कार्यही करत आहेत. आणि आता त्या श्रीकृष्णाला समर्पित अशा ‘दासी हेमा’देखील झाल्या आहेत.शास्त्रीय गायक आणि संगीतकारांचे सहकार्य लाभले?‘गोपाला को समर्पण’ या अल्बममध्ये भगवान श्रीकृष्ण यांच्या जन्मापासून, राधाराणी विरह आणि द्वारकानाथ प्रवेशापर्यंतच्या भावपूर्ण भजनांचा समावेश आहे. याच भजनांचे लिखाण श्रीकृष्णाच्या कृपेने करण्यात आले आहे. आठ भक्तिपदांची रचना ज्येष्ठ-श्रेष्ठ अशा चार शास्त्रीय गायक आणि संगीतकारांनी केली आहे. यात संगीत मार्तंड पंडित जसराज, पंडित शिवकुमार शर्मा, पंडित हरिप्रसाद चौरसिया, पंडित राजन साजन मिश्रा यांचा समावेश आहे.ज्येष्ठ-श्रेष्ठांच्या सानिध्याबद्दल काय सांगाल?भारत सरकारने ‘भजन रत्न’ असा माझा गौरव केला आहे. उत्साद बिस्मिला खाँ यांनीही भजनांना साथ दिली असून, लता मंगेशकर, पंडित भीमसेन जोशी, पंडित जसराज, किशोरी अमोणकर, अनुप जलोटा, जगजित सिंग यांच्यासारख्या दिग्गजांचीही माझ्या भजनांना साथ लाभली आहे. सरस्वती पुरस्कार, भजन रत्न, कवी श्रेष्ठ, कवी शिरोमणी यासारख्या पुरस्कारांनी मला सन्मानित करण्यात आले असून, ज्येष्ठ अभिनेत अमिताभ बच्चन यांच्या हस्तेही गौरविण्यात आले आहे. प्रबुद्ध भक्ती कला सर्वोच्च सन्मान, राष्ट्रीय महामंडळेश्वर सन्मान यासारख्या पुरस्कारांसह तीन राष्ट्रपतींसह चार पंतप्रधानांच्या हस्तेही मला गौरविण्यात आले आहे.कुटुंबाबद्दल काय सांगाल?अल्लाहाबादमधील एका संस्कृतीच्या आणि आध्यात्मिकरीत्या प्रतिष्ठित कुटुंबात माझा जन्म झाला. वडील सोने आणि चांदीचे व्यापारी होते. दिवंगत पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे आश्वासक मित्र होते. मी संगीत, क्रीडा, चित्रकला, साहित्य, खेळ, सामाजिक सेवा अशा विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे.श्रोत्यांना काय संदेश द्याल?‘पलना झुलै नंदलाल’ आणि ‘नयनो की तुम ज्योत बने हो’ ही दोन पदे हेमा मालिनी यांना अधिक आवडली असून, सर्व भक्तिपद भक्त आणि श्रोत्यांना आवडतील, अशी आशा आहे. पाचशेहून अधिक भजन लिहिले असून, शंभरहून अधिक भजन अल्बमचे प्रकाशन करण्यात आले आहे. दरम्यान, मी ‘बेगर फ्री इंडिया’ ही चळवळ हाती घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट त्यांच्याकडे या चळवळीचे महत्त्व विषद केले आहे. बंजर जमीन म्हणजे पडीक जमीन हाती घेत, त्यावर एखादे ‘टाउन’ वसवित, तिथे पायाभूत सेवा-सुविधा देणे, हा चळवळीचा प्रमुख उद्देश आहे.

टॅग्स :Hema Maliniहेमा मालिनी