शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
2
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
3
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
4
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
5
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
6
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
7
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
8
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
9
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
10
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
11
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
12
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
13
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
15
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
16
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
17
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
18
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
19
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
20
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार

Delhi Voilence: पती आल्यानंतरच जेवण करणार; हिंसाचारात मृत्यू झालेल्या पोलीस पत्नीचा हट्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2020 1:36 PM

Delhi Voilence News: रतनलाल यांच्या आईला अद्याप आपला मुलगा गेलाय याची कल्पनाही नाही

ठळक मुद्देरतनलाल यांना शहीद दर्जा देण्यात यावा, नातेवाईकांची मागणी दिल्ली हिंसाचारात पोलीस हेड कॉन्स्टेबल रतनलाल यांचा मृत्यू २२ फेब्रुवारीलाच रतनलाल यांनी पत्नी पूनमसह साजरा केला होता लग्नाचा वाढदिवस

नवी दिल्ली - सीएएविरोधातील आंदोलनाला दिल्लीत हिंसक वळण लागलं आहे. सीएए समर्थक आणि विरोधक एकमेकांना भिडल्याने दगडफेक, जाळपोळ सुरु झाली. या हिंसाचारात आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पोलीस शिपाई रतनलाल यांचाही मृत्यू झाला. मात्र या घटनेनंतर रतनलाल यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. 

रतनलाल यांच्या आईला अद्याप आपला मुलगा गेलाय याची कल्पनाही नाही. गावात शांतता पसरली आहे. रतनलाल यांचे नातेवाईक डॉ. हेमबारी म्हणाले की, दिल्लीवरुन रतनलाल यांचा मृतदेह रवाना झाला आहे. त्यांच्यावर पैतुक येथील तिहावली गावात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अलीकडेच २२ फेब्रुवारीला रतनलाल यांनी पत्नीसह लग्नाचा वाढदिवस साजरा केला. मात्र या घटनेमुळे त्यांची पत्नी पूनम सुन्न झाली आहे. पती परतल्यानंतरच मी जेवण करणार असा हट्ट तिने धरला आहे. 

रतनलाल यांना शहीद दर्जा देण्यात यावा, तसेत पूनम यांना नोकरी, ३ मुलांना केंद्रीय विद्यालयात मोफत शिक्षण, २ कोटी आर्थिक मदत द्यावी, तसेच आरोपींना फाशी देण्याची मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येते. वडिलांच्या मृत्यूनंतर रतनलाल यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आली. कुटुंबात २ लहान भाऊ, एक बहिण आहे. 

रतनलाल यांनी २२ फेब्रुवारीला कुटुंबासह दिल्लीत लग्नाचा वाढदिवस साजरा केला होता. दिल्लीत रतनलाल यांच्या मृत्यूनंतर पत्नी पूनमला धक्का बसला आहे. याबाबत लहान भाऊ दिनेश यांनी सांगितले की, सध्या तीन मुलांचा सांभाळ शेजारचे करत आहेत. मोठी मुलगी रिद्धी हिला वडिलांच्या निधनाची माहिती नाही. रतनलाल सोमवारी उपवास ठेवायचे, घटनेच्या दिवशी सोमवार असल्याने त्यांचे व्रत होते. सकाळी घरातून ११ वाजता ते निघाले ते परतलेच नाही.

दरम्यान, दिल्लीत सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी मंगळवारी रात्री उशिरा उत्तर-पूर्व दिल्लीत घटनास्थळावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर सीलमपूरमध्ये उत्तर-पूर्वचे डीसीपी वेद प्रकाश सुर्या यांच्या कार्यालयाबैठक घेतली. दिल्लीतील परिस्थितीवर डोवाल लक्ष ठेवून आहेत. डोवाल आणि अन्य अधिकाऱ्यांनी मौजपूर, जाफराबाद, गोकुलपुरी येथे जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला. दिल्लीतील आंदोलनाने हिंसक वळण घेतल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.  

टॅग्स :delhi violenceदिल्लीPoliceपोलिसcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक