शहरं
Join us  
Trending Stories
1
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
2
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
3
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
4
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
5
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
6
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
7
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
8
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
9
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
10
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
11
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
12
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
13
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
14
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
15
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
16
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
17
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
18
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
19
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
20
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
Daily Top 2Weekly Top 5

Delhi Violence: रस्ते निर्मनुष्य, तणाव मात्र कायम; दगडफेक, आगीच्या तुरळक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2020 06:59 IST

कडक सुरक्षा यंत्रणा असतानाही काही भागात दुकाने जाळण्यात आली आणि काही ठिकाणी दगडफेक झाली.

- विकास झाडे नवी दिल्ली : गेल्या तीन दिवसांत हिंसाचाराने २४ बळी घेतले. पोलीस व निमलष्करी दलाने परिस्थितीवर नियंत्रण मिळविल्याचे चित्र असले तरी गल्लीबोळात धग कायम आहे. कडक सुरक्षा यंत्रणा असतानाही काही भागात दुकाने जाळण्यात आली आणि काही ठिकाणी दगडफेक झाली.या भागात फेरफटका मारताना पुढच्या क्षणी काय होईल? अशी भीती मनात असते. प्रत्येकाचीच अशी अवस्था आहे. सोनिया विहार, गोकुळपुरी भागातील एका टायरच्या व भंगार दुकानांना आज आगी लावण्यात आल्या. जाफराबाद, कबीरनगर, विजयपार्क, मौजपुर, करावल नगर इथेही काहीशी दगडफेक झाली. उपद्रवी व असामाजिक व्यक्तींकडून सोशल मीडियात हिंसाचाराच्या आणि दिशाभूल करणाऱ्या पोस्ट टाकल्या जात असल्याने हिंसाचार होत आहे.ईशान्य दिल्लीतील हिंसाग्रस्त भागात बुधवारी सकाळी पोलीस व निमलष्करी दलाचा फ्लॅगमार्च झाला. तिथे सशस्त्र पोलीस आहेत. शिवाय अग्निशमन दलाच्या गाड्या, दंगलविरोधी ‘वज्र’ वाहन आणि आकस्मिक मदतीसाठी रुग्णवाहिका सज्ज आहेत. रस्ते निर्मनुष्य आहेत. सर्वत्र जाणवतो केवळ तणावच. हिंसाचाराच्या भीतीने लोक रस्त्यावर यायला तयार नाहीत. गल्लीबोळात मात्र ते गटांमध्ये दिसून येत आहेत. मौजपूरजवळील कबीरनगर परिसरात दोन दिवस जाळपोळ झाली. समाजकंटकांनी घरे व दवाखान्यांच्या खिडक्यांचा चुराडा केल्याने तिथे दहशत आहे. मंगळवारी इथे गोळीबार करण्यात आला. दोनशेवर लोक जखमी झाले आहेत. त्यामुळेच आज पोलिसांचा बंदोबस्त अगदी चोख होता.शांततेसाठी आवाहन!सर्वाधिक हिंसा झालेल्या जाफराबाद येथील मस्जिदीतून बुधवारी सायंकाळी शांततेचे आवाहन करण्यात आले. मुस्लिमांनी हिंसाचारात सहभागी होऊ नका, घराबाहेर पडू नका आणि पोलिसांना सहकार्य करण्याचे करा, असे हे आवाहन होते.मंगळवारी रात्री असंख्य तरूण या भागात लोखंडी सळाखी, चाकू, लाठ्या घेऊन गल्लीबोळात फिरत होते. या मस्जिदीसमोर राहणारे ताहीर म्हणाले, आम्हाला हिंसा नको, सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन आम्ही करीत आहोत.

टॅग्स :delhi violenceदिल्ली