शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

Delhi Violence: मानवाधिकाऱ्यांच्या संरक्षणासाठी मोदीजींनी CAA आणला- अमित शाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2020 00:37 IST

Delhi Violence: पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातील धार्मिक पीडितांच्या मानवी हक्कांचे संरक्षण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सीएए कायदा घेऊन आले आहेत.

ठळक मुद्देकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी ओडिशाची राजधानी असलेल्या भुवनेश्वरमध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्या(CAA)च्या समर्थनार्थ काढलेल्या रॅलीला संबोधित केलं. पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातील धार्मिक पीडितांच्या मानवी हक्कांचे संरक्षण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सीएए कायदा घेऊन आले आहेत. काँग्रेस पार्टी, समाजवादी पार्टी (सपा), बहुजन समाज पार्टी (बसपा) डावे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 

नवी दिल्लीः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी ओडिशाची राजधानी असलेल्या भुवनेश्वरमध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्या(CAA)च्या समर्थनार्थ काढलेल्या रॅलीला संबोधित केलं. पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातील धार्मिक पीडितांच्या मानवी हक्कांचे संरक्षण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सीएए कायदा घेऊन आले आहेत. यावेळी त्यांनी काँग्रेस पार्टी, समाजवादी पार्टी (सपा), बहुजन समाज पार्टी (बसपा) डावे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. अमित शाह म्हणाले, नागरिकत्व सुधारणा कायद्यासंदर्भात खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. ज्यात मुस्लिमांचं नागरिकत्व काढून घेतलं जाईल, अशा प्रकारच्याही अफवा आहेत. त्यात कोणतंही तथ्य नाही. नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून विरोधक खोटं बोलून लोकांना चिथावणी देत आहेत. गैरसमज निर्माण करून दंगली घडवल्या जात आहेत. नागरिकत्व सुधारणा कायद्यानं मुस्लिम अल्पसंख्याकांचं नागरिकत्व जाणार नाही. लोकांचं नागरिकत्व काढून घेण्यासाठी नागरिकत्व सुधारणा कायदा आणलेला नसल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी स्पष्ट केलं आहे. देशाच्या विभाजनादरम्यान हिंदू, शीख, ख्रिश्चन, बौद्ध, जैन आणि पारशी समुदायातील लोक पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशात धर्माच्या आधारे विखुरले गेले होते. त्यांना भारताचं नागरिकत्व मिळवून देण्यासाठी हा कायदा आणला आहे. या समुदायातील लोकांना पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशात धर्माच्या आधारे त्रास दिला जात आहे. त्यांचं जोरजबरदस्तीनं धर्म परिवर्तन केलं जात आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्यात कोणाचंही नागरिकत्व काढून घेण्याची तरतूद कुठे आहे. आपण सत्यासाठी पाऊल उचलण्यास धजावतो आहोत. भुवनेश्वरमधल्या रॅलीला संबोधित करताना अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं आहे. मोदी सरकारनं गेल्या 70 वर्षांत अडगळीत पडलेले मुद्दे उचलून धरून ते सुधारण्याचं काम केलं आहे. तुम्ही मोदी सरकारची ताकद असल्यानंही हे शक्य झालं आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवणं गरजेचं होतं की नाही?, मोदी सरकारनं ट्रस्ट तयार करून अयोध्येत भव्य राम मंदिर निर्माणाचा मार्ग मोकळा केला आहे. 

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या

Delhi Violence : देशातून धर्मनिरपेक्षता, समाजवाद अन् लोकशाही संपुष्टात, मित्रपक्षाकडून भाजपाला घरचा आहेरDelhi Violence : पाकिस्तान्यांनो या, तुम्हाला भारताचं नागरिकत्व देतो म्हणत BSF जवानाचं घर पेटवलंDelhi Violence : आतापर्यंत १२३ गुन्हे दाखल अन् ६३० जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात...म्हणून राणेंनी केले उद्धव ठाकरे यांचे मनापासून अभिनंदनपाच दिवसांचा आठवडा करण्याविरोधात न्यायालयात याचिका, ठाकरे सरकारच्या अडचणीत वाढ

टॅग्स :Amit Shahअमित शहाcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकdelhi violenceदिल्ली