शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

भाजप म्हणाला- शेतकऱ्यांनी लाल किल्ला 'अपवित्र' केला; काँग्रेसनं करून दिली 'दुर्योधना'ची आठवण!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2021 2:38 PM

राजधानी दिल्लीत प्रजासत्ताक दिनप्रसंगी शेतकरी आंदोलकांच्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचारात 300 हून अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतशेतकरी आंदोलकांच्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान लाल किल्ल्यात झालेल्या हिंसाचारासंदर्भात भाजप आणि काँग्रेसने प्रतिक्रिया दिल्या आहेत. यासंदर्भा बोलताना, प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच शेतकऱ्यांनी लाल किल्ला अपवित्र केला, असे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता शाहनवाज हुसैन यांनी म्हटले आहे. तर, काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी 'दुर्योधना'चा उल्लेख करत नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. 

काय आली भाजपची प्रतिक्रिया...?भाजप नेते शाहनवाज हुसैन म्हणाले, ''जी शंका होती, ते खरे ठरले. शेतकरी संघटना मोठ-मोठ्या गप्पा मारत होत्या, की शिस्त राखली जाईल. आम्ही आनंदोत्सवात सहभागी होत आहोत. हा आनंदोत्सव होता, की प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी भारतावर हल्ला होता? यांनी लाल किल्ला अपवित्र केला आहे. यासंर्वांविरोधात कठोर कारवाई व्हायला हवी.'' एवढेच नाही, तर ''भडकावण्याचे काम तर शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी केले. शेतकरी संघटनेचे नेते केवळ भडकावण्याचेच काम करत होते आणि आता घटना घडून गेल्यानंतर ते आपले ज्ञान पाझळत आहेत,'' असेही शाहनवाज हुसैन  म्हणाले.

काँग्रेसची प्रतिक्रिया -काँग्रेस प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी महाभारताचा उल्लेख करत म्हणाले आहे, ''महात्मा विदूर यांच्या सारखे मंत्री, कृपाचार्यांसारखे राजगुरू, द्रोणाचार्यांसारखे महारथी आणि भीष्मांसारखे "मार्गदर्शक" असतानाही हस्तिनापूरचा सर्वनाश कसा झाला? कारण दुर्योधनाच्या अहंकारापुढे सर्व मौन राहिले आणि या मौनाची "किंमत" सर्वांनाच चुकवावी लागली. वाटले, आठवन करून द्यावी. #Farmer''

सरकारने या हिंसाचाराला गांभीर्याने घ्यावे - मायावतीयासंदर्भात, बसपाच्या सर्वेसर्वा मायावती म्हणाल्या, ''देशाच्या राजधानीत काल प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान जे काही घडले, ते कदापी व्हायला नको होते. हे अत्यंत दुर्दैवी आहे. केंद्रातील सरकारनेही हे गांभीर्याने घ्यायला हवे. याच बरोबर, बसपा केंद्र सरकारला पुन्हा विनंती करते, की त्यांनी हे तीनही कृषी कायदे विलंब न करता परत घ्यावेत आणि शेतकऱ्यांचे आंदोलन संपवावे, जेनेकरून पुन्हा अशा प्रकारची घटना घडू नये.''

दिल्ली हिंसाचारात 300 पोलीस कर्मचारी जखमी -राजधानी दिल्लीत प्रजासत्ताक दिनप्रसंगी शेतकरी आंदोलकांच्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचारात 300 हून अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. हे पोलीस कर्मचारी लाल किल्ला, आयटीओ आणि नांगलौईसह इतर ठिकाणी झालेल्या हिंसाचारात जखमी झाले आहेत. या हिंसाचारानंतर पोलिसांनी 22 एफआयआर नोंदवल्या आहेत. हिंसाचाराशी संबंधित प्रकरणांचा तपास क्राइम ब्रांच, स्पेशल सेलकडे सोपविण्यात आला आहे.

टॅग्स :delhi violenceदिल्लीFarmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरीBJPभाजपाcongressकाँग्रेस