शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

अरे देवा! परीक्षा टाळण्यासाठी विद्यार्थ्याचा २००० किमी प्रवास; झोपडपट्टीत राहून केली मजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 10:47 IST

विद्यार्थ्याने ट्रेन पकडली आणि २००० किलोमीटरचा प्रवास करून बंगळुरूला पोहोचला.

मुलांना बऱ्याचदा अभ्यास आवडत नाही. त्यामुळे ते त्यापासून सुटका मिळवण्याचे मार्ग शोधू लागतात. दिल्लीतील एका प्रसिद्ध ठिकाणी शिकणाऱ्या अकरावीच्या विद्यार्थ्याने असंच काहीसं केलं आहे. परीक्षा टाळण्यासाठी तो घरातून पळून गेला.

विद्यार्थ्याने ट्रेन पकडली आणि २००० किलोमीटरचा प्रवास करून बंगळुरूला पोहोचला. मग तिथून बस आणि ऑटोने कृष्णगिरीला पोहोचला. अभ्यास करावा लागू नये म्हणून १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलाने बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत मजूर म्हणून काम करायला सुरुवात केली आणि तिथे झोपडीत राहू लागला.

दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेचे डीसीपी विक्रम सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ फेब्रुवारी रोजी एका व्यक्तीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली की त्यांचा १७ वर्षांचा अल्पवयीन मुलगा कुठेतरी गेला आहे. घराबाहेर पडताना त्याने त्याच्या वडिलांना एक मेसेज पाठवला होता. मी घरातून जात आहे आणि मला शोधण्याचा कोणताही प्रयत्न करू नये असं मेसेजमध्ये लिहिलं होतं.

मुलगा अल्पवयीन होता, म्हणून वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला आणि मुलाचा शोध घेण्यासाठी एक पथक तयार केलं. तपासादरम्यान, पोलिसांना कळलं की तो मुलगा तामिळनाडूमध्ये आहे. तो मुलगा ट्रेनने आधी बंगळुरूला पोहोचला होता. त्यानंतर पोलिसांचं पथक ताबडतोब बंगळुरूला गेलं. तिथून माहिती गोळा केल्यानंतर, पोलिसृी पथक कृष्णागिरी येथे पोहोचले जिथून निर्मल दिन साईड येथे मुलगा सापडला.

तो मुलगा तिथल्या एका झोपडपट्टीत राहत होता आणि रोजंदारीवर काम करायचा. तपासादरम्यान, पोलिसांना कळलं की, १७ वर्षांचा मुलगा अकरावीत शिकत होता. पण त्याला परीक्षा द्यायची नव्हती. म्हणून, २१ फेब्रुवारी रोजी तो घरातून निघाला आणि थेट बंगळुरूला गेला आणि नंतर कृष्णागिरीला पोहोचला. पोलिसांनी मुलाला त्याच्या पालकांच्या स्वाधीन केलं आणि मुलाचं समुपदेशनही करण्यात आलं आहे. 

टॅग्स :examपरीक्षाStudentविद्यार्थी