शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

अरे देवा! परीक्षा टाळण्यासाठी विद्यार्थ्याचा २००० किमी प्रवास; झोपडपट्टीत राहून केली मजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 10:47 IST

विद्यार्थ्याने ट्रेन पकडली आणि २००० किलोमीटरचा प्रवास करून बंगळुरूला पोहोचला.

मुलांना बऱ्याचदा अभ्यास आवडत नाही. त्यामुळे ते त्यापासून सुटका मिळवण्याचे मार्ग शोधू लागतात. दिल्लीतील एका प्रसिद्ध ठिकाणी शिकणाऱ्या अकरावीच्या विद्यार्थ्याने असंच काहीसं केलं आहे. परीक्षा टाळण्यासाठी तो घरातून पळून गेला.

विद्यार्थ्याने ट्रेन पकडली आणि २००० किलोमीटरचा प्रवास करून बंगळुरूला पोहोचला. मग तिथून बस आणि ऑटोने कृष्णगिरीला पोहोचला. अभ्यास करावा लागू नये म्हणून १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलाने बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत मजूर म्हणून काम करायला सुरुवात केली आणि तिथे झोपडीत राहू लागला.

दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेचे डीसीपी विक्रम सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ फेब्रुवारी रोजी एका व्यक्तीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली की त्यांचा १७ वर्षांचा अल्पवयीन मुलगा कुठेतरी गेला आहे. घराबाहेर पडताना त्याने त्याच्या वडिलांना एक मेसेज पाठवला होता. मी घरातून जात आहे आणि मला शोधण्याचा कोणताही प्रयत्न करू नये असं मेसेजमध्ये लिहिलं होतं.

मुलगा अल्पवयीन होता, म्हणून वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला आणि मुलाचा शोध घेण्यासाठी एक पथक तयार केलं. तपासादरम्यान, पोलिसांना कळलं की तो मुलगा तामिळनाडूमध्ये आहे. तो मुलगा ट्रेनने आधी बंगळुरूला पोहोचला होता. त्यानंतर पोलिसांचं पथक ताबडतोब बंगळुरूला गेलं. तिथून माहिती गोळा केल्यानंतर, पोलिसृी पथक कृष्णागिरी येथे पोहोचले जिथून निर्मल दिन साईड येथे मुलगा सापडला.

तो मुलगा तिथल्या एका झोपडपट्टीत राहत होता आणि रोजंदारीवर काम करायचा. तपासादरम्यान, पोलिसांना कळलं की, १७ वर्षांचा मुलगा अकरावीत शिकत होता. पण त्याला परीक्षा द्यायची नव्हती. म्हणून, २१ फेब्रुवारी रोजी तो घरातून निघाला आणि थेट बंगळुरूला गेला आणि नंतर कृष्णागिरीला पोहोचला. पोलिसांनी मुलाला त्याच्या पालकांच्या स्वाधीन केलं आणि मुलाचं समुपदेशनही करण्यात आलं आहे. 

टॅग्स :examपरीक्षाStudentविद्यार्थी