शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत हाजीर हो...; दिल्ली हायकोर्टाचं समन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 13:33 IST

या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या १७ एप्रिलला दिल्ली हायकोर्टात पार पडणार आहे.

नवी दिल्ली - शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दिल्ली हायकोर्टात दाखल केलेल्या मानहानी प्रकरणात कोर्टाने तिघांना समन्स बजावले आहे. खासदार राहुल शेवाळे यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर कोर्टाने तिघांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. 

काय आहे प्रकरण? खासदार राहुल शेवाळे यांनी दिल्ली हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं होतं की, ज्या आमदार, खासदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला त्यांच्याविरोधात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांनी आक्षेपार्ह विधाने केली होती. त्यावर मानहानीचा दावा करण्यात आला आहे. ही याचिका दिल्ली हायकोर्टाने दाखल करून घेत तिन्ही नेत्यांना प्रत्यक्ष कोर्टात आवश्यक ती कागदपत्रांसह हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्याबाबत समन्स जारी केला आहे. 

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेच्या ४० आमदार, १३ खासदारांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला. त्यानंतर सातत्याने उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत या आमदार-खासदारांवर आक्रमक टीका करत आहेत. अनेक ठिकाणी खोके उल्लेख करून डिवचण्यात येते. आजही सोशल मीडियावर शिंदे गटातील आमदार,खासदारांवर केलेली विधाने आहेत. त्यामुळे दिल्ली हायकोर्टाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मविरोधातही नोटीस काढली आहे. या पोस्ट का हटवण्यात आल्या नाहीत असा खुलासा कोर्टाने मागितला आहे. 

या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या १७ एप्रिलला दिल्ली हायकोर्टात पार पडणार आहे. दिल्ली हायकोर्टाच्या आजच्या सुनावणीत मानहानीच्या दाव्याची याचिका दाखल करण्यात आली. राहुल शेवाळे यांच्याकडून बाजू मांडणाऱ्या वकिलांनी कोर्टात ठाकरेंकडून केलेले बदनामीकारक विधाने सादर केली. या विधानाचे गांभीर्य ओळखून कोर्टाने ही याचिका स्वीकारली. न्यायालयाने प्रतिवाद्यांना नोटीस बजावत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात मनाई आदेश काढू नयेत यासाठी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तुमचे जे काही म्हणणे असेल ते लेखी दाखल करा असं कोर्टाने आदेशात म्हटलं आहे. 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयUddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊतAaditya Thackerayआदित्य ठाकरेRahul Shewaleराहुल शेवाळे