शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
5
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
6
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
7
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
8
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
9
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
10
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
11
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
12
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
20
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग

भारतात रस्ते अपघातांमधील मृतांच्या आकड्यात मोठी घट, महाराष्ट्र पहिल्या स्थानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2017 09:10 IST

रस्ते अपघातांमुळे होणाऱ्या लोकांच्या मृत्यूच्या आकडेवारीत गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठी घट झाली आहे.

ठळक मुद्दे रस्ते अपघातांमुळे होणाऱ्या लोकांच्या मृत्यूच्या आकडेवारीत गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठी घट झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षातील पहिल्या नऊ महिन्यांमध्ये (जानेवारी ते सप्टेंबर) रस्ते अपघातातील मृतांचा आकडा ५ हजारांनी घटला आहे.

नवी दिल्ली- रस्ते अपघातांमुळे होणाऱ्या लोकांच्या मृत्यूच्या आकडेवारीत गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठी घट झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षातील पहिल्या नऊ महिन्यांमध्ये (जानेवारी ते सप्टेंबर) रस्ते अपघातातील मृतांचा आकडा ५ हजारांनी घटला आहे. सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेल्या रस्ते सुरक्षा समितीला राज्य सरकारांनी दिलेल्या माहितीमधून ही आकडेवारी समोर आली आहे. रस्ते अपघातांमधील मृतांची आकडेवारी राज्य सरकारांनी दिलेल्या माहितीवरुन समोर आली आहे. 

राज्य सरकारने जाहीर केलेल्या माहितीवरून टक्केवारीनुसार पंजाब पहिल्या क्रमांकावर आहे. पंजाबमधील रस्ते अपघातात मृत्यू झालेल्यांचं प्रमाण 14.4 टक्क्यांनी घटलं आहे. तर त्यानंतर पश्चिम बंगालचा क्रमांक लागतो. पश्चिम बंगालमध्ये रस्ते अपघातांमुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण 13.7 टक्क्यांनी घटलं आहे. अपघातातील मृतांचा घटलेला आकडा लक्षात घेतल्यास महाराष्ट्र अव्वल स्थानावर आहे. गेल्या वर्षातील पहिल्या तीन तिमाहींचा (जानेवारी ते सप्टेंबर) विचार करता, यंदाच्या वर्षात महाराष्ट्रात रस्ते अपघातातील मृतांची संख्या 807 ने कमी झाली आहे. यानंतर गुजरात दुसऱ्या क्रमांकावर आहे. गुजरात रस्ते अपघाताताली मृतांची संख्या 775 ने कमी झाली आहे. केंद्रशासित प्रदेशांच्या आकडेवारीनुसार, राजधानी दिल्लीत अपघातांमध्ये मृत पावलेल्यांची संख्या 1 हजार 93 इतकी आहे. गेल्या वर्षी हाच आकडा 1 हजार 212 इतका होता. तर चंदिगढमधील रस्ते अपघातात दगावलेल्यांच्या संख्येत 25.2 टक्क्यांची घट झाल्याचं नोंदविण्यात आलं आहे.

दुसरीकडे बिहारमधील परिस्थिती चिंताजनक असल्याचं निदर्शनास आलं आहे. बिहारमध्ये यावर्षी अपघातांमध्ये मृत्यू झालेल्यांचा आकडा 378 ने वाढला आहे. यानंतर या यादीत ओडिशाचा क्रमांक लागतो. ओडिशात 2016 मधील पहिल्या नऊ महिन्यांमध्ये रस्ते अपघातात 3 हजार 306 जणांचा बळी गेला होता. यंदा हा आकडा वाढला असून 3 हजार 495 इतका झाला आहे.

रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, देशभरात रस्ते दुर्घटनेमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये झालेली घट ही राज्यांकडून केलेल्या योग्य उपाययोजनांचं उदाहरण आहे. अपघातांमुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण कमी करण्यासाठी आम्ही कटीबद्ध होतो, असंही ते पुढे म्हणाले. रस्त्यावर झालेल्या अपघातामुळे व्यक्तीच्या होणाऱ्या मृत्यूचा त्याच्या संपूर्ण कुटुंबावर परिणाम होतो. विविध संघटनांच्या माध्यमातून आम्ही रस्ते अपघात टाळायला जागृकता निर्माण केली, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.  

टॅग्स :AccidentअपघातIndiaभारतMaharashtraमहाराष्ट्र