शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
5
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
6
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
7
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
8
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
9
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
10
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
11
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
12
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
13
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
14
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
15
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
16
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
17
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
18
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
19
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
20
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज

टवाळखोरांकडून सुरक्षा जवानांना अपशब्द; काश्मीरातील हेल्पलाइन नंबरवर पाकमधून आले कॉल्स 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 2:32 PM

लोक या हेल्पलाइनच्या सहाय्याने आपल्या कुटुंबातील आणि नातेवाईकांची विचारपूस करतात.

नवी दिल्ली - जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटविल्यानंतर काश्मीर खोऱ्यातील लोकांसाठी सीआरपीएफकडून हेल्पलाइन नंबर जारी करण्यात आला आहे. सामान्य जनतेच्या मदतीसाठी ही हेल्पलाइन चालविली जाते. मात्र या नंबरचा पाकिस्तानच्या काही टवाळखोरांनी गैरवापर करत असल्याचं समोर येतंय. हेल्पलाइन नंबरवर ७ हजार ०७१ कॉल्स ११ ऑगस्ट ते १६ ऑगस्ट दरम्यान आले. त्यातील १७१ कॉल्स भारताच्या बाहेरुन आले आहेत. 

लोक या हेल्पलाइनच्या सहाय्याने आपल्या कुटुंबातील आणि नातेवाईकांची विचारपूस करतात. मात्र पाकिस्तानमधील काही लोक सुरक्षा यंत्रणांच्या जवानांसोबत अपशब्द व्यक्त करुन त्यांचा राग काढतात. मदतीसाठी देण्यात येणाऱ्या हेल्पलाइनवर २ हजार ७०० कॉल्स सुरक्षा दलाच्या जवानांचे परिवाराकडून तर २ हजार ४४८ कॉल्स काश्मीरच्या बाहेरील लोक त्यांच्या कुटुंबाच्या काळजीपोटी करतात. १ हजार ७५२ कॉल्स गैरकाश्मिरी लोक राज्यातील स्थिती जाणण्यासाठी करतात. 

टोल फ्री नंबर १४४११ वर सऊदी अरबवरुन ४५ कॉल्स आले तर जगातील २२ देशांमधून काश्मीरमधील परिस्थिती जाणून घेण्यासाठी कॉल्स आलेले आहे. यात ३९ यूएई, १२ कुवैत, ८ इस्त्राईल, मलेशिया ७, तसेच यूके, सिंगापूर आणि बांग्लादेश याठिकाणाहून कॉल्स आलेले आहेत. ३ फोन कॉल्स कॅनडा, बहरीन, जर्मनी, फिलीपींस आणि थायलँडमधूनही फोन कॉल्स आले. 

जम्मू काश्मीरचे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी सांगितले की, पाकिस्तानी नंबरवरुनही काही फोन कॉल्स येत आहेत. त्यातील काही कॉल्स त्यांच्या नातेवाईकांची चौकशी करण्यासाठी आले होते. तर बहुतांश कॉल्स आपला राग व्यक्त करण्यासाठी सुरक्षा जवानांना अपशब्द देण्यासाठी आले होते. राज्यात तैनात असणाऱ्या सुरक्षा दलाच्या जवानांसाठी हेल्पलाइन नंबर फायदेशीर ठरतोय. कारण त्यांच्या कुटुंबीयांकडून आलेल्या कॉल्समुळेही जवानांचे मनोबल उंचावत आहे.

५ ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने जम्मू काश्मीर पूनर्रचना विधेयक आणि कलम ३७० हटविण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यानंतर जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम हटविण्यात आलं. मात्र भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तान सैरभैर झालं. अनेक देशांकडे पाकिस्तानने मदतीची याचना केली मात्र चीनशिवाय इतर कोणत्याही देशांनी पाकिस्तानला पाठिंबा दिला नाही. त्यामुळे पाकिस्तानकडून धर्माच्या नावाखाली धमकविण्याचे प्रकार सुरु झाले आहेत.   

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तानIndiaभारत