शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

बापरे! अचानक एक्स्प्रेसचे झाले दोन भाग; एक हिस्सा मागे राहिला तर दुसरा 1 किमी धावला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2021 15:22 IST

SaptKranti Express : एक्स्प्रेसचे अचानक दोन भाग झाले आणि यातील एक भाग रुळावर धावत राहिला तर एक जागीच उभा राहिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली - लखनऊमध्ये एक मोठी दुर्घटना टळली आहे. एका एक्स्प्रेसचे अचानक दोन भाग झाले आणि यातील एक भाग रुळावर धावत राहिला तर एक जागीच उभा राहिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सप्तक्रांती सुपरफास्ट एक्स्प्रेस असं या ट्रेनचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कपलिंग तुटल्याने सप्तक्रांती सुपरफास्ट एक्स्प्रेस ही अचानक (SaptKranti Express) दोन भागात विभागली गेली. यानंतर अर्धी ट्रेन जवळपास एक किलोमीटर पुढे निघून गेली. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे कंट्रोलमध्ये याबाबत सूचना दिली गेली. 

सप्तक्रांती सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या मोटरमनच्या सावधगिरीमुळे थोडक्यात मोठी दुर्घटना टळली आहे. आनंद विहार येथून मुझफ्फरपूरकडे जाणारी सप्तक्रांती सुपरफास्ट एक्स्प्रेस रात्री 10:45 ला लखनऊला येते आणि 10 मिनिटांनी बिहारच्या मुझफ्फरपूरकडे निघते. मात्र, काकोरी स्टेशनवर येताच दोन कोचला जोडणारी कपलिंग अचानक निघाली. यामुळे अर्धी ट्रेन मधूनच वेगळी होऊन पुढे निघून गेली आणि अर्धी मागेच राहिल्य़ाची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. 

गार्डच्या सुचनेनंतर जवळपास एक किलोमीटर पुढे गेलेल्या ट्रेनच्या चालकाने ट्रेन थांबवण्यासाठी कंट्रोल रुमला संपर्क केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोटरमन आणि गार्डच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. यानंतर रात्री उशिरापर्यंत कपलिंग जोडण्याचं काम सुरू होतं. लखनऊचे डीआरएम एनआर संजय त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक्स्प्रेसमध्ये साधारण कपलिंग लावली गेली होती, जी अचानक तुटली. यामुळे ट्रेनचा पुढील भाग बराच पुढे निघून गेला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

बापरे! इंजिनवरील ताबा सुटला, 70 प्रवासी असलेली ट्रेन अचानक उलट दिशेने धावली अन्... 

काही दिवसांपूर्वी उत्तराखंड (Uttarakhand) मध्ये एक मोठी रेल्वे दुर्घटना (Train Accident) टळली होती. नवी दिल्ली येथून टनकपूर येथे जाणारी पूर्णागिरी जनशताब्दी एक्सप्रेस (Purnagiri Jansatabdi) अचानक रेल्वे रुळांवरून उलट्या दिशेने धावल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. मात्र काही किलोमीटर अंतर पार केल्यानंतर ती थांबवण्यात यश आले . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना घडली तेव्हा पूर्णागिरी जनशताब्दी एक्सप्रेसमधून जवळपास 60 ते 70 प्रवासी प्रवास करत होते. त्यांना चकरपूर येथे सुरक्षितरित्या उतरवण्यात आलं असून बसने त्यांच्या गावी पाठवण्यात आले होते. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेIndiaभारतrailwayरेल्वेUttar Pradeshउत्तर प्रदेश