शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

बापरे! अचानक एक्स्प्रेसचे झाले दोन भाग; एक हिस्सा मागे राहिला तर दुसरा 1 किमी धावला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2021 15:22 IST

SaptKranti Express : एक्स्प्रेसचे अचानक दोन भाग झाले आणि यातील एक भाग रुळावर धावत राहिला तर एक जागीच उभा राहिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली - लखनऊमध्ये एक मोठी दुर्घटना टळली आहे. एका एक्स्प्रेसचे अचानक दोन भाग झाले आणि यातील एक भाग रुळावर धावत राहिला तर एक जागीच उभा राहिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सप्तक्रांती सुपरफास्ट एक्स्प्रेस असं या ट्रेनचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कपलिंग तुटल्याने सप्तक्रांती सुपरफास्ट एक्स्प्रेस ही अचानक (SaptKranti Express) दोन भागात विभागली गेली. यानंतर अर्धी ट्रेन जवळपास एक किलोमीटर पुढे निघून गेली. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे कंट्रोलमध्ये याबाबत सूचना दिली गेली. 

सप्तक्रांती सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या मोटरमनच्या सावधगिरीमुळे थोडक्यात मोठी दुर्घटना टळली आहे. आनंद विहार येथून मुझफ्फरपूरकडे जाणारी सप्तक्रांती सुपरफास्ट एक्स्प्रेस रात्री 10:45 ला लखनऊला येते आणि 10 मिनिटांनी बिहारच्या मुझफ्फरपूरकडे निघते. मात्र, काकोरी स्टेशनवर येताच दोन कोचला जोडणारी कपलिंग अचानक निघाली. यामुळे अर्धी ट्रेन मधूनच वेगळी होऊन पुढे निघून गेली आणि अर्धी मागेच राहिल्य़ाची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. 

गार्डच्या सुचनेनंतर जवळपास एक किलोमीटर पुढे गेलेल्या ट्रेनच्या चालकाने ट्रेन थांबवण्यासाठी कंट्रोल रुमला संपर्क केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोटरमन आणि गार्डच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. यानंतर रात्री उशिरापर्यंत कपलिंग जोडण्याचं काम सुरू होतं. लखनऊचे डीआरएम एनआर संजय त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक्स्प्रेसमध्ये साधारण कपलिंग लावली गेली होती, जी अचानक तुटली. यामुळे ट्रेनचा पुढील भाग बराच पुढे निघून गेला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

बापरे! इंजिनवरील ताबा सुटला, 70 प्रवासी असलेली ट्रेन अचानक उलट दिशेने धावली अन्... 

काही दिवसांपूर्वी उत्तराखंड (Uttarakhand) मध्ये एक मोठी रेल्वे दुर्घटना (Train Accident) टळली होती. नवी दिल्ली येथून टनकपूर येथे जाणारी पूर्णागिरी जनशताब्दी एक्सप्रेस (Purnagiri Jansatabdi) अचानक रेल्वे रुळांवरून उलट्या दिशेने धावल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. मात्र काही किलोमीटर अंतर पार केल्यानंतर ती थांबवण्यात यश आले . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना घडली तेव्हा पूर्णागिरी जनशताब्दी एक्सप्रेसमधून जवळपास 60 ते 70 प्रवासी प्रवास करत होते. त्यांना चकरपूर येथे सुरक्षितरित्या उतरवण्यात आलं असून बसने त्यांच्या गावी पाठवण्यात आले होते. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेIndiaभारतrailwayरेल्वेUttar Pradeshउत्तर प्रदेश