शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

बापरे! अचानक एक्स्प्रेसचे झाले दोन भाग; एक हिस्सा मागे राहिला तर दुसरा 1 किमी धावला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2021 15:22 IST

SaptKranti Express : एक्स्प्रेसचे अचानक दोन भाग झाले आणि यातील एक भाग रुळावर धावत राहिला तर एक जागीच उभा राहिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली - लखनऊमध्ये एक मोठी दुर्घटना टळली आहे. एका एक्स्प्रेसचे अचानक दोन भाग झाले आणि यातील एक भाग रुळावर धावत राहिला तर एक जागीच उभा राहिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सप्तक्रांती सुपरफास्ट एक्स्प्रेस असं या ट्रेनचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कपलिंग तुटल्याने सप्तक्रांती सुपरफास्ट एक्स्प्रेस ही अचानक (SaptKranti Express) दोन भागात विभागली गेली. यानंतर अर्धी ट्रेन जवळपास एक किलोमीटर पुढे निघून गेली. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे कंट्रोलमध्ये याबाबत सूचना दिली गेली. 

सप्तक्रांती सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या मोटरमनच्या सावधगिरीमुळे थोडक्यात मोठी दुर्घटना टळली आहे. आनंद विहार येथून मुझफ्फरपूरकडे जाणारी सप्तक्रांती सुपरफास्ट एक्स्प्रेस रात्री 10:45 ला लखनऊला येते आणि 10 मिनिटांनी बिहारच्या मुझफ्फरपूरकडे निघते. मात्र, काकोरी स्टेशनवर येताच दोन कोचला जोडणारी कपलिंग अचानक निघाली. यामुळे अर्धी ट्रेन मधूनच वेगळी होऊन पुढे निघून गेली आणि अर्धी मागेच राहिल्य़ाची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. 

गार्डच्या सुचनेनंतर जवळपास एक किलोमीटर पुढे गेलेल्या ट्रेनच्या चालकाने ट्रेन थांबवण्यासाठी कंट्रोल रुमला संपर्क केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोटरमन आणि गार्डच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. यानंतर रात्री उशिरापर्यंत कपलिंग जोडण्याचं काम सुरू होतं. लखनऊचे डीआरएम एनआर संजय त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक्स्प्रेसमध्ये साधारण कपलिंग लावली गेली होती, जी अचानक तुटली. यामुळे ट्रेनचा पुढील भाग बराच पुढे निघून गेला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

बापरे! इंजिनवरील ताबा सुटला, 70 प्रवासी असलेली ट्रेन अचानक उलट दिशेने धावली अन्... 

काही दिवसांपूर्वी उत्तराखंड (Uttarakhand) मध्ये एक मोठी रेल्वे दुर्घटना (Train Accident) टळली होती. नवी दिल्ली येथून टनकपूर येथे जाणारी पूर्णागिरी जनशताब्दी एक्सप्रेस (Purnagiri Jansatabdi) अचानक रेल्वे रुळांवरून उलट्या दिशेने धावल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. मात्र काही किलोमीटर अंतर पार केल्यानंतर ती थांबवण्यात यश आले . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना घडली तेव्हा पूर्णागिरी जनशताब्दी एक्सप्रेसमधून जवळपास 60 ते 70 प्रवासी प्रवास करत होते. त्यांना चकरपूर येथे सुरक्षितरित्या उतरवण्यात आलं असून बसने त्यांच्या गावी पाठवण्यात आले होते. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेIndiaभारतrailwayरेल्वेUttar Pradeshउत्तर प्रदेश