सोशल मीडियावरून दूर राहणारे दाम्पत्य जास्त सुखी; नात्यात सुसंवाद, समुपदेशकांचे निरीक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 12:55 IST2025-08-21T12:55:17+5:302025-08-21T12:55:49+5:30

खरी मजा ऑफलाइनच असं रिलेशनशिप काउन्सिलर मंडळी सांगतात

Couples who stay away from social media are happier harmonious communication in the relationship, counselors observe | सोशल मीडियावरून दूर राहणारे दाम्पत्य जास्त सुखी; नात्यात सुसंवाद, समुपदेशकांचे निरीक्षण

सोशल मीडियावरून दूर राहणारे दाम्पत्य जास्त सुखी; नात्यात सुसंवाद, समुपदेशकांचे निरीक्षण

जयपूर : बदलत्या काळात सोशल मीडिया हा जीवनाचा अविभाज्य भाग झाला असला तरी आता अनेक विवाहित जोडपी आपले वैवाहिक आयुष्य या आभासी दुनियेतून दूर ठेवू लागली आहेत. “जे पती-पत्नी आपले वैयक्तिक क्षण सोशल मीडियावर मांडत नाहीत, ते तुलनेत जास्त आनंदी व समाधानी असतात”, असे शहरातील मॅरेज काउन्सिलर्स सांगतात.

जीवनातील प्रत्येक क्षण फेसबुक-इन्स्टाग्रामवर दाखविण्याच्या प्रयत्न करतात. सतत सोशल मीडियावर आपले खासगी जीवन जगासमोर मांडणारे सरासरी १० ते १५ जोडपी दररोज समस्या घेऊन समुपदेशकांकडे येतात. 

नाते टिकवण्यासाठी...

  • आठवणी मनात साठवा, सोशल मीडियावर नाही. छोट्या गोष्टींमध्येही आनंद शोधा.
  • एकत्र वेळ घालवा, एकमेकांच्या
  • भावना ऐका. अडचणी आल्या तर संवाद साधा, जगासमोर उघड करू नका.


खरी मजा ऑफलाइनच

रिलेशनशिप काउन्सिलर दीपशिखा गोखले यांनी सांगितले, “आमच्याकडे येणाऱ्या दररोजच्या जोडप्यांपैकी ४-५ जोडपी अशी असतात, जी सोशल मीडियावर ‘परफेक्ट कपल’चे चित्र उभे करतात. 

‘लाइक-रिॲक्शन’वर मोजतात नात्यांचा आनंद

रिलेशनशिप काउन्सिलर म्हणाल्या, “जोडपी जितकी जास्त आपली वैयक्तिक जीवनशैली सोशल मीडियावर शेअर करतात, तितकी त्यांच्यात असुरक्षितता व तुलना करण्याची भावना वाढते. एखाद्या फोटोवरील लाईक वा कमेंट नात्यातील आनंदाचे मोजमाप ठरते. ५० जोडप्यांपैकी ३० टक्क्यांवर सोशल मीडिया प्रतिक्रियांचा थेट परिणाम दिसतो.”

Web Title: Couples who stay away from social media are happier harmonious communication in the relationship, counselors observe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.