शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

'माझ्याच पक्षाचं सरकार असल्यानं अनेकदा बोलता यायचं नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2019 08:36 IST

'भाजपा खासदार असल्यानं अनेक विषयांवर बोलता यायचं नाही'

इंदूर: राज्यात भाजपाचं सरकार असताना महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करण्यासाठी काँग्रेस नेत्यांची मदत घ्यायचे, असं लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी सांगितलं. भाजपा खासदार असल्यानं आणि राज्यात भाजपाचीच सत्ता असल्यानं मला अनेक गोष्टी बोलता यायच्या नाहीत. त्यामुळे काँग्रेस नेत्यांच्या माध्यमातून मी महत्त्वाचे विषय उपस्थित करायचे, असं महाजन म्हणाल्या. राज्यपाल लालजी टंडन यांच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. मध्य प्रदेशात काँग्रेसची सत्ता येण्यापूर्वी भाजपाचं सरकार होतं. आपल्याच पक्षाचं सरकार असल्यानं मला अनेक गोष्टी बोलता यायच्या नाहीत. मात्र इंदूरमधील जनहिताचे प्रश्न उपस्थित करायला हवेत, असं मला कायम वाटायचं. त्यावेळी मी काँग्रेस नेत्यांची मदत घ्यायचे. त्यांच्या माध्यमातून अनेकदा जनतेच्या जिव्हाळ्याचे मुद्द उचलायचे, असं महाजन यांनी सांगितलं. महाजन यांनी लोकसभेत आठ वेळा इंदूरचं प्रतिनिधीत्व केलं आहे. इंदूरच्या समस्या आणि प्रश्न उपस्थित करण्यासाठी मी काँग्रेस नेते जीतू पटवारी आणि तुलसी सिलावट यांनी विनम्रपणे निवेदन द्यायचे. तत्कालीन मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यामध्ये लक्ष घालतील, असं आश्वासन मी काँग्रेस नेत्यांना द्यायचे. इंदूरच्या विकासासाठी मी अशा प्रकारे काम केलं. इंदूरचा विकास हाच ध्यास असल्यानं पक्षीय राजकारण कायम बाजूला ठेवलं, असं महाजन यांनी सांगितलं. भाजपाचे शिवराजसिंह चौहान यांनी २००५ ते २०१८ या कालावधीत मध्य प्रदेशचं मुख्यमंत्रीपद भूषवलं. गेल्या डिसेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजपाला पराभव पत्करावा लागला. यानंतर मध्य प्रदेशात काँग्रेसचं सरकार आलं. सलग आठ वेळा इंदूर लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेल्या सुमित्रा महाजन यांनी यंदा लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. यानंतर शंकर लालवाणी यांनी इंदूरमधून निवडणूक लढवत लोकसभा गाठली.  

टॅग्स :Sumitra Mahajanसुमित्रा महाजनBJPभाजपाcongressकाँग्रेस