शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

देशात घरोघरी खो खो खोकला; कोरोनानंतर आता नवे संकट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2023 06:20 IST

रुग्णसंख्या माेठ्या प्रमाणात वाढली; काळजी घेण्याचे ‘आयसीएमआर’चे निर्देश

गेल्या दोन महिन्यांपासून देशभरात ‘इन्फ्लुएन्झा ए’ या विषाणूचा उपप्रकार असलेल्या ‘एच३एन२’चा झपाट्याने प्रादुर्भाव वाढत आहे. परिणामी खोकला आणि ताप यांचे प्रमाण वाढीस लागले आहे. या विषाणूची बाधा होऊ नये यासाठी विशेष काळजी घेण्याचे निर्देश भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) दिले आहेत. घराघरांत खोकल्याची लागण झाल्याचे चित्र सध्या आहे. आयसीएमआरचे वैज्ञानिक श्वसनाशी संबंधित उद्भवणाऱ्या या आजाराकडे विविध विषाणू संशोधन प्रयोगशाळा माध्यमांतून लक्ष ठेवून आहेत. तसेच या विषाणूच्या  संसर्गात अँटिबायोटिकचा अतिरेक करू नये. रुग्णाची तपासणी करून गरज असेल तरच त्याचा वापर करावा, अशा सूचना इंडियन मेडिकल असोसिएशनने केल्या आहेत. गेल्या काही महिन्यांत मुंबईसह राज्यात नागरिकांना मोठ्या प्रमाणात खोकला येत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाच्या उद्रेकानंतर अशा पद्धतीच्या रुग्णांत वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.  

काय आहे नेमका हा प्रकार?

  • सर्वसाधारणपणे थंडी आणि पावसाळ्यात इन्फ्लुएंझा आढळून येत असतो. 
  • या इन्फ्लुएंझा विषाणूचे ए, बी, सी असे तीन प्रकार आहेत. त्यांपैकी ‘इन्फ्लुएंझा ए’  या विषाणूच्या प्रकारामुळे  खोकला आणि ताप येत असतो. 
  • हा एका विशिष्ट हंगामात दिसणारा विषाणू आहे. 
  • या आजाराला घाबरण्याची गरज नसली तरी डॉक्टरांचा सल्ला वेळेत घेणे गरजेचे आहे. 

खोकल्याचे रुग्ण वाढले आहेत. मात्र विषाणूंसोबत वातावरणात प्रदूषण असल्याने त्याचा परिणामही दिसून येत आहे. हा हवेतून पसरणारा विषाणू आहे. त्यामुळे मास्क घाला. तसेच रोगप्रतिकारकी शक्ती चांगली राहण्यासाठी हिरव्या पालेभाज्यांचा वापर आहारात करावा. घरी आल्यावर कोमट पाण्याच्या गुळण्या कराव्यात. त्यात थोडे मीठ टाकावे. आता उन्हाळा सुरू झाला असून पाणी जास्त प्रमाणात ठेवावे. लहान मुलांना ताप-खोकला येत असल्यास शाळेत पाठवू नये. या खोकल्याचा संसर्ग होण्याची शक्यता असते, त्यामुळे कोरोनाकाळात ती काळजी घेतली ती घ्यावी. 

डॉ. श्रीनिवास चव्हाण, कान, नाक, घसा विभागप्रमुख, सर जे. जे. रुग्णालय.

आयसीएमआरने काय सांगितले?

  • साबणाने नियमित हात धुवून घ्या. 
  • जर तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या आजाराचे लक्षणे आढळली तर मास्क वापरा.
  • खोकताना तसेच शिंकताना नाक आणि तोंडावर रुमाल धरा. 
  • द्रवरूप पदार्थांचे मोठ्या प्रमाणात सेवन करा. 
  • ताप तसेच अंगदुखीचा त्रास होत असेल तर पॅरासिटामॉल घ्या.  

‘एच३ एन२’ विषाणू ‘इन्फ्लुएंझा ए’चा उपप्रकार नवीन नाही. सद्य:स्थितीत १० ते २० टक्के  वातावरणात हा विषाणू  पसरला आहे. सध्याचा हंगाम या विषाणूला पोषक असा आहे.  डॉ. नितीन आंबाडेकर,     संचालक, आरोग्य विभाग 

सध्या बहुतांश लोकांना ताप, सर्दी, घसादुखी, अंगदुखी आदी त्रास होत आहेत. हे सर्व इन्फ्ल्युएंझामुळे होत आहे. या आजारांमध्ये रुग्णाला अँटिबायोटिक्स अजिबात देऊ नका.

टॅग्स :Medicalवैद्यकीयIndiaभारतHealthआरोग्य