शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याला फडणवीस,अजित पवारांचा विरोध होता"
2
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
3
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
4
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
5
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
6
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
7
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
8
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
9
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
10
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
11
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
12
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
13
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
14
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
15
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
16
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
17
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
18
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
19
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
20
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 

coronavirus: लॉकडाऊनवरून WHOच्या प्रमुख संशोधकांचा इशारा; म्हणाल्या, याचे परिणाम... 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2021 10:08 AM

coronavirus & lockdown News Update : कोरोनाच्या वाढत्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी कठोर लॉकडाऊनबाबत विचार सुरू आहे. मात्र यादरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेमधील मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी लॉकडाऊनबाबत मोठे विधान केले आहे.

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे सध्या भारतात बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे काही राज्यांमध्ये वीकेंड लॉकडाऊनसह रात्रीच्या संचारबंदीसारख्या निर्बंधांची अंमलबजावणी सुरूझाली आहे. तर काही ठिकाणी कठोर लॉकडाऊनबाबत विचार सुरू आहे. (Coronavirus in Maharashtra) मात्र यादरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेमधील (World health organisation ) मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी लॉकडाऊनबाबत मोठे विधान केले आहे. लॉकडाऊनचे परिणाम गंभीर होतील, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला नियंत्रित करण्यासाठी जनतेची भूमिका महत्त्वाची असेल असेही त्यांनी सांगितले. (WHO's researcher Dr. Soumya Swaminathan warns of lockdown;  That said, the consequences will be serious)

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार डॉ. स्वामिनाथन यांनी सांगितले की, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत विचार करण्यापूर्वी आणि पुरेशा लोकांचे लसीकरण पूर्ण होईपर्यंत आपल्याला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करावा लागणार आहे. या साथीच्या अनेक लाटा येऊ शकतात, असे खात्रीशीररीत्या सांगता येईल, असेही त्या म्हणाल्या. डब्ल्यूएचओने कोविशिल्ड लसीच्या दोन डोसांमध्ये ८ ते १२ आठवड्यांचे अंतर ठेवण्याचा सल्ला दिला आहे. यावर स्वामिनाथन यांनी सांगितले की, सध्या मुलांना कोरोनावरील लस देण्याचा सल्ला देण्यात आलेला नाही. मात्र लसीच्या दोन डोसमधील अंतर हे ८ ते १२ आठवड्यांपर्यंत वाढवता येऊ शकेल. 

दरम्यान, डब्ल्यूएचओच्या विभागीय संचालक डॉ. पूनम खेत्रीपाल यांनीही लसीकरणावर भर देण्याचा सल्ला दिला आहे. कोरोनाच्या संसर्गाची नवी लाट संपूर्ण प्रदेशात पसरली आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, असे त्या म्हणाल्या. उल्लेखनीय बाब म्हणजे भारतामध्ये दररोज सरासरी २६ लाख लसी दिल्या जात आहेत. लसीकरणाबाबत केवळ अमेरिका भारताच्या पुढे आहे. अमेरिकेत सरासरी ३० लाख डोस दिले जात आहेत. 

 दरम्यान, पुण्यातील तज्ज्ञानी लॉकडाऊनवर आक्षेप घेतला आहे. प्रा. एल. एस. शशिधरा यांनी सांगितले की, गतवर्षी लॉकडाऊन दरम्यान, पुण्यामध्ये अनेक हॉटस्पॉट होते. लॉकडाऊन हटवण्यात आल्यावर हे आकडे पुन्हा वाढू लागले. तेव्हा १० दिवसांचे लॉकडाऊनही निरुपयोगी ठरले होते. लॉकडाऊन दरम्यानही समूह संसर्गामुळे विषाणू लहान लहान समुहांमध्ये पसरतो. तसेच लॉकडाऊन हटवण्यात आल्यावर तो अधिक वेगाने पसरतो, असे त्या म्हणाल्या.   

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसWorld health organisationजागतिक आरोग्य संघटनाHealthआरोग्य