शहरं
Join us  
Trending Stories
1
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
2
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
3
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
4
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
5
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
6
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
7
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
8
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
9
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
10
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
11
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
12
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
13
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
14
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!
15
दिवाळीनिमित्त राहुल गांधी पोहोचले मिठाईच्या दुकानात, स्वत: बनवली इमरती आणि बेसनाचे लाडू
16
भोजपुरी स्टार पवन सिंहची पत्नी ज्योती यांनी भरला नामांकन अर्ज, कुठल्या पक्षाकडून लढणार?
17
EDला सापडले २५० पासपोर्ट, ७ पाकिस्तानी नागरिकांचा शोध सुरू, बंगाल कनेक्शन समोर   
18
"गेल्या १० वर्षात साबणाला हातही लावला नाही"; बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं 'बाथरूम सीक्रेट'
19
१५ वर्षांनी लहान पुतण्यावर जडला २ मुलांच्या आईचा जीव; नकार देताच पोलिसांसमोर भयंकर कृत्य
20
दिवाळीच्या फटाक्यांमुळे कार किंवा बाइकला आग लागली तर इन्शुरन्स क्लेम करू शकता का? जाणून घ्या

Coronavirus: भारतातून कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे कधी ओसरणार? केंब्रिज विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी सांगितली नेमकी तारीख 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2021 17:39 IST

Coronavirus in India : देशातील दैनंदिन रुग्णवाढ घटू लागली असतानाच केंब्रिज जज बिझनेस स्कूल आणि नॅशनल इंस्टिट्युट ऑफ इकॉनॉमिक अँड सोशल रिसर्चने अजून एक दिलासादायक माहिती दिली आहे.

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने सध्या देशात थैमान घातले आहे. मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढल्याने आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. (Coronavirus in India) दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोनाबाधितांच्या एकूण संख्येत किंचीत घट झाल्याचे दिसल्याने काहीसा दिलासा मिळत आहे. यादरम्यान आता केंब्रिज जज बिझनेस स्कूल आणि नॅशनल इंस्टिट्युट ऑफ इकॉनॉमिक अँड सोशल रिसर्चने अजून एक दिलासादायक माहिती दिली आहे. भारतामध्ये कोरोनाचा पीक येऊन गेला असून, आता नव्या रुग्णांचे प्रमाण घटत जाईल, असे सांगितले. या दोन्ही संस्थ्या केंब्रिज विद्यापीठाचा भाग आहेत. ( When will the second wave of coronavirus completely disappear from India? Cambridge University experts say the exact date) 

मात्र तज्ज्ञांनी हेही सांगितले की, आता देशातील विविध राज्यांमधील कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या प्रमाणात तफावत आहे. काही राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. तर आसाम, हिमाचल प्रदेश, तामिळनाडू आणि त्रिपुरा यासारख्या राज्यात पुढच्या दोन आठवड्यांमध्ये साथीचा पीक येऊ शकतो. 

यादरम्यान, संसर्गजन्य आजारांचे तज्ज्ञ शाहिद जमील यांनी सांगितले की, सध्यातरी कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे ओसरायला काही महिन्यांचा अवधी लागू शकतो. साधारणपणे जुलै महिन्याच्या अखेरीस भारताता आलेली कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे ओसरेल.  दरम्यान, आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी सांगितले की, देशातील नऊ राज्यांमध्ये कोरोनाच्या नव्या रुग्णांचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. यामध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि दिल्ली या कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या राज्यांचाही समावेश आहे. मात्र सध्या देशातील कोरोना रुग्णांची संख्या घटत असली तरी दुसऱ्या लाटेची अखेर होण्यास काही महिन्यांचा अवधी लागेल. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रचंड प्रकोपासाठी कोरोना विषाणूचे नवे व्हेरिएंट्स कारणीभूत असू शकतात. मात्र हे व्हेरिएंट्स अधिक धोकादायक असल्याचे कुठलेही संकेत मिळालेले नाहीत. मात्र भारतातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमधील रुग्ण हे सर्वसामान्यपणे दुसऱ्या वा तिसऱ्या लाटेत ज्याप्रमाणे कमी होतात त्या वेगाने कमी होणार नाहीत, अशी शक्यताही शाहीद जमील यांनी वर्तवली. 

भारतात आलेल्या कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये देशात एका दिवसांतील सर्वाच्च रुग्णसंख्या ही ९६-९७ हजार एवढी नोंदवली गेली होती. मात्र दुसऱ्या लाटेमध्ये ती सुमारे चार लाखांवर पोहोचली आहे. त्यामुळे या लाटेला ओसरण्यासाठी वेळ लागेल. तसेच सध्या अशी काही राज्ये आहेत. जिथे कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे, असेही त्यांनी सांगितले.   

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीयHealthआरोग्य