शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
2
'बापजाद्यांची पायवाट मोडू नका!'; मनोज जरांगेंचा पंकजा मुंडे,अजित पवारांना आपुलकीचा सल्ला!
3
दिवाळीसाठी गावी निघाले अन् एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! 'थार'च्या धडकेत पती-पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू
4
Bihar Election 2025 India Alliance: हेमंत सोरेन यांचा इंडिया आघाडीला 'टाटा', 'या' जागा स्वबळावर लढणार
5
'अदीना मशीद नाही, आदिनाथ मंदिर', खासदार युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा निशाणा; प्रकरण काय?
6
Bihar Election: ती चूक  भोवली, मतदानापूर्वीच एक जागा गमावली, बिहारमध्ये NDA ला मोठा धक्का
7
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
8
भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार, मेट्रो स्टेशनच्या नावांवरून काँग्रेसची बोचरी टीका
9
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार
10
कोर्टाची नोटीस नाकारणे भोवले! IAS सुजाता सौनिक यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट; २६ नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश
11
Bigg Boss 19: क्रिकेटपटू दीपक चहरच्या बहिणीवर संतापला सलमान खान, सारेच झाले अवाक्, कारण काय? 
12
Diwali Sale: ७०००mAh बॅटरी आणि ३ कॅमेरे असलेला फोन ६७९ रुपयांच्या ईएमआयमध्ये उपलब्ध
13
Viral Video: "दात आहेत की वेटलिफ्टिंग मशीन?" तरुणाचा व्हिडीओ पाहून नेटकरी शॉक!
14
२७ महिन्यांपासून पगार नाही, सुट्टी मागितल्यास..., वैतागलेल्या कर्मचाऱ्याने सरकारी ऑफिससमोरच संपवलं जीवन 
15
संसदेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ब्रह्मपुत्र अपार्टमेंटला भीषण आग, इथेच आहेत अनेक खासदारांची निवासस्थाने
16
सोमवती अमावस्या आणि लक्ष्मी पूजनाचा दुर्मिळ योग; 'या' ७ राशींच्या आयुष्याला मिळणार कलाटणी
17
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर हा फक्त ट्रेलर, आता पाकिस्तानची एक-एक इंच जमीन ब्रह्मोसच्या रेंजमध्ये..."
18
Mohammed Shami: शमीनं निवड समितीची केली बोलती बंद, रणजी स्पर्धेत ७ विकेट्स घेऊन दिला फिटनेसचा पुरावा!
19
"अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्या": पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, चतुर्वेदींचा BCCI-सरकारला टोला
20
'मिआ बाय तनिष्क'ची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून अनीत पड्डाची निवड, 'प्रेशियस, एव्हरी डे' या फेस्टिव्ह मोहिमेतून केले पदार्पण

coronavirus: कोरोनावरची लस कधीपर्यंत येणार? राहुल गांधींच्या प्रश्नाला हॉवर्डच्या प्राध्यापकांनी दिलं असं उत्तर... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2020 12:33 IST

आज राहुल गांधींनी जागतिक स्तरावरील दोन तज्ज्ञांशी चर्चा केली. यावेळी राहुल गांधींनी हॉवर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक आशिष झा यांच्याशी संवाद साधताना कोरोनावरची लस कधीपर्यंत येणार? असा प्रश्न विचारला.

ठळक मुद्दे तीन देशांमध्ये संशोधनाला मिळत असलेल्या यशामुळे अपेक्षा आहे की, अशी लस लवकरच उपलब्ध होईल.पुढील वर्षापर्यंत कोरोनावरील लस येऊ शकेल अशी आपण अपेक्षा बाळगू शकतो. भारताला यासाठी एक मोठी योजना आखावी लागेल. कारण भारताला ५० कोटी पेक्षा अधिक लसींची निर्मिती करावी लागेल.   

नवी दिल्ली - देशातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी सक्रिय झाले आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठीच्या उपाययोजना आणि कोरोनानंतर येणाऱ्या आर्थिक संकटाबाबत ते सातत्याने तज्ज्ञांशी चर्चा करत आहेत. आज राहुल गांधींनी जागतिक स्तरावरील दोन तज्ज्ञांशी चर्चा केली. यावेळी राहुल गांधींनी हॉवर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक आशिष झा यांच्याशी संवाद साधताना कोरोनावरची लस कधीपर्यंत येणार? असा प्रश्न विचारला. त्यानंतर प्राध्यापक झा यांनीही त्याला तितक्याच सफाईदार पद्धतीने उत्तर दिले.

आज झालेल्या चर्चेदरम्यान राहुल गांधींनी विचारले की, भावा, कोरोनावरची लस कधीपर्यंत मिळेल असं वाटतं? त्यावर उत्तर देताना प्राध्यापक झा म्हणाले की, तीन देशांमध्ये संशोधनाला मिळत असलेल्या यशामुळे अपेक्षा आहे की, अशी लस लवकरच उपलब्ध होईल. मात्र पुढील वर्षापर्यंत कोरोनावरील लस येऊ शकेल अशी आपण अपेक्षा बाळगू शकतो. भारताला यासाठी एक मोठी योजना आखावी लागेल. कारण भारताला ५० कोटी पेक्षा अधिक लसींची निर्मिती करावी लागेल.   

सद्यस्थितीत अमेरिका, युनायटेड किंग्डम इस्राइल यासारख्या देशांमध्ये कोरोनावरील लसीबाबत संशोधन सुरू आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठात याबाबतची चाचणीही सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत या वर्षाच्या अखेरीपर्यंत कोरोनावरील लस येईल, अशी अपेक्षा बाळगण्यास हरकत नाही, असे प्राध्यापक झा यांनी सांगितले.

मात्र कोरोनाची लस व्यापक प्रमाणावर उपलब्ध होण्यास वर्षभर वाट पाहावी लागेल. कारण यशस्वी चाचणी आणि इतर प्रक्रिया पार पाडल्यानंतर तातडीने अशा प्रकारच्या लसीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणे खूप कठीण असेल.  

दुसरीकडे भारतातही कोरोनावरील लस शोधण्यासाठी संशोधकांची अनेक पथके कार्यरत आहेत. त्याला भारत सरकारकडूनही सातत्याने मदत मिळत आहे. त्यामुळे जर भारतात कोरोनाची लस तयास झाली, तरी ते आश्चर्यकारक नसेल.

इतर महत्त्वाच्या बातम्या   

शास्त्रज्ञांनी लावला कोरोना विषाणूला निष्क्रीय करणाऱ्या जीवाणूंचा शोध

गरज पडल्यास आमचे सैन्य लढण्यास तयार, नेपाळच्या संरक्षणमंत्र्यांची भारताला धमकी

लॉकडाऊन न करताच या मोठ्या देशाने कोरोनाला दिली मात, नागरिकांची ही सवय ठरली उपयुक्त 

कोरोनामुळे निर्माण झालेल्या तणावादरम्यान अमेरिकेचा चीनला तगडा धक्का, केली मोठी कारवाई 

लॉकडाऊन आणि मंदीचे सावट असतानाही ही कंपनी करणार ५० हजार कर्मचाऱ्यांची मेगाभरती 

दरम्यान, कोरोनानंतरचे जग पूर्णपणे बदललेले असेल. ही साथ लोकांना एकत्र येण्यास मदत करेल. कारण आज प्रत्येक जण जात-धर्म विसरून कोरोना विषाणूविरोधात लढाई लढत आहे. सध्याच्या परिस्थितीत केंद्र आणि राज्य सरकारने  एक धोरण ठरवून काम केले पाहिजे. कारण कोरोनाविरोधातील खरी लढाई जमिनीवर लढली जात आहे, असे राहुल गांधी यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसIndiaभारत